शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Sangli: मोडणारा संसार पुन्हा लोकअदालतीत उभा राहिला, मुलांना पुन्हा मिळाली आई-वडिलांची छत्र छाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 12:54 IST

विकास शहा शिराळा : शिराळा येथे पार पडलेल्या लोक न्यायालयात एक संसार पुन्हा उभा राहिला तर या मुलांना आई ...

विकास शहा

शिराळा : शिराळा येथे पार पडलेल्या लोक न्यायालयात एक संसार पुन्हा उभा राहिला तर या मुलांना आई वडिलांची छत्र छाया पुन्हा मिळाली आहे. याचबरोबर ९५ प्रलंबित प्रकरणे तसेच ३०० वादपूर्व प्रकरणे अशी एकूण ३९५ प्रकरणे मिटवण्यात आली यातून ६२ लाख ३९ हजार २६६ रुपये वसूल करण्यात आले.रेश्मा कदम (रा.सुपणे, ता. कराड , जि. सातारा) यांचा शरद कदम ( रा.भटवाडी , ता.शिराळा ) यांच्याशी विवाह झाला होता मात्र कौटुंबिक वादातून २०२१ पासून शिराळा येथील न्यायालयात खटला सुरू होता. त्यांना एक मुलगाही आहे. आज शनिवारी पार पडलेल्या लोक न्यायालयात हा वाद संपुष्टात येऊन रेश्मा या पुन्हा नांदण्यासाठी तयार झाल्या. यामुळे एक संसार पुन्हा उभा राहिला तसेच मुलाला आपले आई वडिलांची छत्र छाया ही मिळाली.हा वाद मिटल्यावर न्यायाधीश एस एस सुरजुसे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.यावेळी दोन्ही कुटुंबातील व्यक्तींच्या तोंडावर समाधानाचे हास्य पसरले होते. यावेळी न्यायाधीश एस एस सुरजुसे, न्यायाधीश विनया देसाई, ए एस घाटगे, ऍड जी एल पाटील, ऍड सुधीर पाटील, ऍड पी बी थोरात, आरती पाटील आदी उपस्थित होते.या लोक न्यायालयात १ हजार १२६ प्रलंबित प्रकरणे तसेच १ हजार ८८४  वादपूर्व प्रकरणे असे एकूण ३ हजार १० प्रकरणे  ठेवण्यात आली होती. यापैकी ९५ प्रलंबित प्रकरणे तसेच ३०० वादपूर्व प्रकरणे अशी एकूण ३९५ प्रकरणे मिटवण्यात आली. यातून ६२ लाख ३९ हजार २२६६ रुपये रक्कम वसूल करण्यात आली.

टॅग्स :SangliसांगलीCourtन्यायालय