शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

जयंत पाटलांच्या दबावामुळेच माणगंगा कारखान्यात घात, अमरसिंह देशमुखांचा आरोप 

By श्रीनिवास नागे | Updated: June 1, 2023 14:29 IST

निवडणुकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घातले नाही

आटपाडी : माणगंगा साखर कारखान्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी षडयंत्र आखले. त्यांनी काँग्रेस, शिवसेनेच्या साथीने शेकापवर राजकीय दबाव टाकला, असा आरोप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कारखान्यातील मावळत्या सत्ताधारी गटाचे नेते अमरसिंह देशमुखयांनी गुरुवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता केला. या दबावामुळे सांगोल्याच्या देशमुख गटाने अचानक अर्ज मागे घेतले. त्या निर्णयाने विश्वासघात झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. येथील माणगंगा कारखान्याच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेत विरोधकांच्या ताब्यात सत्ता दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.देशमुख म्हणाले की, साखर कारखाना उभारण्यापूर्वी १९८० पासून आटपाडीचे बाबासाहेब देशमुख व सांगोल्याचे गणपतराव देशमुख यांचे नैसर्गिक नाते होते. दोन्ही गटांकडून अर्ज भरले जात होते. यावेळी दिवंगत गणपतराव देशमुखांचे नातू डॉ. बाबासाहेब यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगोला तालुक्यातून, तर आटपाडीमधून आम्ही अर्ज दाखल केले होते. मात्र माघारीच्या दिवशी अचानक दोन वाजता त्यांनी अर्ज काढून घेत नात्याला तडा दिला. त्यांची भूमिका संशयास्पद असून राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना (शिंदे गट) यांच्या दबावाखाली त्यांनी निर्णय घेतला.  राज्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आमच्या कुटुंबावर अन्याय झाला असून आम्ही राष्ट्रवादीमध्ये असतानाही उपेक्षितच ठेवले गेले. भाजपमध्ये गेल्यावर राष्ट्रवादीने जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून आजअखेर सूड घेण्याचे काम केले, असा आरोप त्यांनी जयंत पाटील यांचे नाव न घेता केला.

विरोधकांकडून चुकीचा प्रचार

विरोधकांनी कारखाना खासगी होणार असल्याच्या अफवा पसरवल्या. जिल्हा बँकेने कारखाना विक्रीसाठी काढला होता, त्यावेळीच खासगीकरण झाले असते. मात्र कोणीच निविदा भरली नाही. बँकेने कारखाना चालवण्यास देण्यासाठी निविदा काढल्यानंतर आम्ही एकट्यानेच भरली. त्यावेळीही बँकेने तीन महिने ती खुली न करताच पैसे परत केले होते. ते राष्ट्रवादीचेच षडयंत्र होते.

आमदारांनी गटाला थांबवले नाही

शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांची भेट घेतली असता त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले होते. त्यांनी या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही, मात्र आपल्या गटाला निवडणूक लढवण्यापासून ते परावृत्त का करू शकले नाहीत, असे देशमुख म्हणाले.

भाजपची साथ नाहीच!

निवडणुकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घातले नाही. त्यांची साथ असती तर वेगळे चित्र दिसले असते. विधानसभेवेळी बाबर यांना सहकार्यासाठी भाजप व वरिष्ठ नेत्यांनी साकडे घातले गेले, मात्र कारखान्याबाबत सहकार्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही, असे देशमुख म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकJayant Patilजयंत पाटील