शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

दुष्काळी तालुक्यांमध्ये पाणी आले.. पण प्रश्न नाही सुटले, पाणी संघर्ष परिषदेचे निमंत्रक वैभव नायकवडींचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 13:56 IST

शेतकरी संघटित असल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत. नागनाथअण्णांनी सुरुवातीला दुष्काळी भागात पाणी देण्याचे स्वप्न बघितले. लोकांना विश्वासात घेतले. आज ते स्वप्न सत्यात उतरले आहे.

आटपाडी : टेंभूचे पाणी सध्या बहुतांश दुष्काळी तालुक्यामध्ये आले असले तरी, पाणी आल्यामुळे प्रश्न सुटले नाहीत. यासाठी शेतकऱ्यांना संघटित ठेवून चळवळीच्या रेट्यातून दुष्काळी भागाचे प्रश्न सोडविण्याला यापुढील काळात प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन तेरा दुष्काळी तालुक्यांच्या पाणी संघर्ष परिषदेचे निमंत्रक वैभव नायकवडी यांनी केले.राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने कृष्णा खोऱ्यातील तेरा दुष्काळी तालुक्यांची २९ वी पाणी संघर्ष परिषद रविवारी आटपाडी येथे पार पडली. यावेळी डॉ. बाबूराव गुरव, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, चंद्रकांत देशमुख, प्रा. शिवाजीराव काळुंगे, सुभाष पाटील, आर. एस. चोपडे, डॉ. अनिकेत देशमुख, महादेव देशमुख, शिवाजीराव पाटील, सावंता पुसावळे, सचिन देशमुख उपस्थित होते.वैभव नायकवडी म्हणाले, शेतकरी संघटित असल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत. नागनाथअण्णांनी सुरुवातीला दुष्काळी भागात पाणी देण्याचे स्वप्न बघितले. लोकांना विश्वासात घेतले. आज ते स्वप्न सत्यात उतरले आहे. तेरा दुष्काळी तालुक्यांतील अपुरी कामे पूर्ण होण्यासाठी पैसे उपलब्ध होणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी गरजेप्रमाणे धडक मारण्याची तयारी ठेवली पाहिजे. चळवळीच्या रेट्यामुळे काही योजना कार्यान्वित झाल्या आहेत. त्या यशस्वीरीत्या चालविण्यासाठी यापुढील काळात लढा असेल.पाणी आलेल्या भागातील शेतकऱ्यांनी चळवळीत सहभाग होणे गरजेचे आहे. २९ वर्षांपूर्वी जे स्वप्न होते, ते आता सत्यात यायला लागले आहे. नवीन पिढीला सामावून घेणे व त्यांच्यापुढे इतिहास मांडणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या संघटित ताकदीशिवाय प्रश्न सुटणार नाहीत. यामुळे आपल्याला संघटनेची ताकद वाढवणे गरजेचे आहे. भविष्यातील संघर्षासाठी आपण तयार राहूया.डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, आज दुष्काळी भागात पाणी आले आहे. मात्र ते शेतकऱ्याच्या बांधापर्यंत अजून पाेहाेचले नाही. समन्यायी पाणी वाटप योजनेचे अद्याप शासनाने नियोजन केले नाही. यासाठी चळवळीच्या माध्यमातून जनरेटा उभा करावा लागेल.

राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, सध्या निसर्ग लहरी बनला आहे. शासनही लहरी बनले आहे. त्यांच्या लहरीप्रमाणेच पाण्याचे आवर्तन सुरू आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. आवर्तनाच्या नियोजनासाठी चळवळीच्या माध्यमातून प्रयत्न करणे गरजेचे आहे.प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दादासाहेब ढेरे, शिवाजीराव पाटील, सुभाष पाटील, आर. एस. चोपडे, चंद्रकांत देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, प्रा. शिवाजीराव काळुंगे आदींनी मनोगत व्यक्त केले.

नागनाथअण्णांच्या स्मारकासाठी एक एकर जागा

आमच्या आटपाडीसारख्या दुष्काळी भागावर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचे फार मोठे ऋण आहेत. त्यांचा दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठीचा लढा मोठा आहे, हे येणाऱ्या नवीन पिढीला उमजावे यासाठी आटपाडीमध्ये डॉ. नागनाथअण्णांचे स्मारक उभारण्याचा संकल्प आहे. यासाठी एक एकर जागा देणार असल्याचे राजेंद्रअण्णा देशमुख यांनी यावेळी जाहीर केले.

टॅग्स :Sangliसांगली