शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

..अखेर कल्याणकारी मंडळ स्थापन; सांगली जिल्ह्यातील दहा हजार रिक्षा-टॅक्सी चालकांना होणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 18:07 IST

सांगली : राज्यात अखेर ‘धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ’ स्थापन झाले आहे. ...

सांगली : राज्यात अखेर ‘धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ’ स्थापन झाले आहे. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी चालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील ८ हजार रिक्षा चालक व २८०० टॅक्सी चालक यांना याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.रिक्षा व टॅक्सी चालकांचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची अनेक वर्षांपासून मागणी सुरू होती. त्यासाठी वेगवेगळी आंदोलने सुरू होती. अखेर शासनाने १६ मार्च २०२४ रोजी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ‘धर्मवीर आनंद दिघेसाहेब’ नावाने मंडळ स्थापन करण्यात आले आहे. कल्याणकारी मंडळाचा सभासद होण्यासाठी रिक्षा व टॅक्सी चालकांकडे परवाना व बॅज असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आरटीओ कार्यालयाकडे ८ हजार १९२ रिक्षांची नोंद आहे. तसेच टॅक्सींची संख्या २८१० आहे. त्यामुळे जवळपास दहा हजारहून अधिक जणांना मंडळाच्या योजनेचा लाभ मिळू शकतो.

कल्याणकारी मंडळाकडे वार्षिक वर्गणी, शासकीय अनुदान, नोंदणी शुल्क आणि इतर मार्गाने निधी संकलित होईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा कार्यालयात अर्ज करावा लागेल.नोंदणी करणे आवश्यकऑटो रिक्षा परवाना धारक, टॅक्सी चालक यांची नोंदणी आरटीओ कार्यालयामार्फत केली जाईल. नोंदणी केलेल्यांना ओळखपत्र दिले जाईल. मंडळाचा सभासद होण्यासाठी ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी परवाना, बॅज असणे बंधनकारक राहील. पात्र अर्जदाराच्या कुटुंबातील चार सदस्यांना मंडळाच्या योजनांचा लाभ मिळेल.

पाचशे रुपये नोंदणी शुल्क

योजनेचा लाभ घेण्यासाठी सभासद नोंदणी आणि ओळखपत्र शुल्क पाचशे रूपये असेल. त्यानंतर वार्षिक सभासद शुल्क तीनशे रूपये राहणार आहे.विविध योजनांचा लाभजीवनविमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्य विषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास ५० हजारांपर्यंत अर्थसहाय्य, पाल्याच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, ६५ वर्षांवरील परवानाधारकांसाठी निवृत्ती सन्मान योजनेंतर्गत सानुग्रह अनुदान आदी योजनांचा लाभ मिळू शकेल.

जिल्हास्तरीय समिती स्थापन होणारकल्याणकारी मंडळाची जिल्हा व राज्यस्तरीय समिती असेल. समित्यांची रचना शासन निर्णयानुसार असेल. मुख्य कार्यालय मुंबईत असेल. तसेच जिल्ह्यात देखील समितीचे कार्यालय कार्यरत राहील.

टॅग्स :Sangliसांगली