शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सांगली जिल्ह्यातील दहा कारखान्यांनी दिली १०० टक्के एफआरपी, 'या' चार कारखान्यांकडे 'इतके' कोटी थकीत 

By अशोक डोंबाळे | Updated: March 30, 2023 17:16 IST

शंभर टक्के एफआरपी दिलेले कारखाने कोणते...जाणून घ्या

सांगली : जिल्ह्यातील सद्गुरू श्री श्री शुगर, क्रांती, दत्त इंडिया आणि हुतात्मा या चार साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या एफआरपीचे १६० कोटी रुपये थकीत आहेत. उर्वरित दहा साखर कारखान्यांनी दि. २३ मार्चपर्यंतची १०० टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पण, ज्या शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे बिले मिळाली नाहीत, ते शेतकरी बँकाकडे फेऱ्या मारत आहेत.जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी २०२२-२३ वर्षाचा गळीत हंगाम घेतला होता. यापैकी सर्वच कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप संपवून हंगाम बंद केले आहेत. राजारामबापू पाटील साखराळे, वाटेगाव, कारंदवाडी आणि जत डफळे, सोनहिरा, विश्वासराव नाईक, मोहनराव शिंदे, दालमिया शुगर, उदगिरी शुगर आणि केन ॲग्रो या दहा साखर कारखान्यांनी दि. २३ मार्चपर्यंतची शेतकऱ्यांच्या खात्यावर १०० टक्के एफआरपी जमा केली आहे. श्रीपती शुगर कारखान्याने पहिलाच गळीत हंगाम घेतला असून केवळ ५६ हजार ८३५ टन उसाचे गाळप केले. तसेच केन ॲग्रो शुगरनेही शेवटच्या टप्प्यातच गळीत हंगाम सुरू केला. परंतु, या कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे जमा केले आहेत. सद्गुरू श्री श्री शुगरने ३४ कोटी २८ लाख, क्रांती कारखाना ५५ कोटी ९४ लाख, दत्त इंडिया २४ कोटी आणि हुतात्मा कारखान्याकडे ३३ कोटी ८० लाख रूपये असे एकूण १६० कोटी रूपये शेतकऱ्यांच्या एफआरपीचे कारखान्यांकडे थकीत आहेत. या कारखान्यांकडून एफआरपीची रक्कम तातडीने शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे.

शंभर टक्के एफआरपी दिलेले कारखानेराजारामबापू पाटील चारही युनिट, सोनहिरा, विश्वासराव नाईक, मोहनराव शिंदे, दालमिया शुगर, उदगिरी शुगर, केन ॲग्रो आदी दहा साखर कारखान्यांनी दि. २३ मार्चपर्यंत गाळपास आलेल्या उसाची १०० टक्के एफआरपीनुसार रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. या शेतकऱ्यांना कारखाना व्यवस्थापनाकडून दिलासा मिळाला आहे. पण, एफआरपीच्या वरच्या रकमेचे काय होणार, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नियमाने १४ दिवसांत एफआरपीनुसार पैसे मिळाले पाहिजेत. याबद्दल सर्व साखर कारखान्यांना तशा सूचनाही दिल्या आहेत. यातूनही काही कारखान्यांनी एफआरपीनुसार १०० टक्के पैसे शेतकऱ्यांना दिले नसतील तर त्यांच्यावर कारवाई करावी लागेल. -शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने