शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

सांगली जिल्ह्यातील दहा कारखान्यांनी दिली १०० टक्के एफआरपी, 'या' चार कारखान्यांकडे 'इतके' कोटी थकीत 

By अशोक डोंबाळे | Updated: March 30, 2023 17:16 IST

शंभर टक्के एफआरपी दिलेले कारखाने कोणते...जाणून घ्या

सांगली : जिल्ह्यातील सद्गुरू श्री श्री शुगर, क्रांती, दत्त इंडिया आणि हुतात्मा या चार साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या एफआरपीचे १६० कोटी रुपये थकीत आहेत. उर्वरित दहा साखर कारखान्यांनी दि. २३ मार्चपर्यंतची १०० टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पण, ज्या शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे बिले मिळाली नाहीत, ते शेतकरी बँकाकडे फेऱ्या मारत आहेत.जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी २०२२-२३ वर्षाचा गळीत हंगाम घेतला होता. यापैकी सर्वच कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप संपवून हंगाम बंद केले आहेत. राजारामबापू पाटील साखराळे, वाटेगाव, कारंदवाडी आणि जत डफळे, सोनहिरा, विश्वासराव नाईक, मोहनराव शिंदे, दालमिया शुगर, उदगिरी शुगर आणि केन ॲग्रो या दहा साखर कारखान्यांनी दि. २३ मार्चपर्यंतची शेतकऱ्यांच्या खात्यावर १०० टक्के एफआरपी जमा केली आहे. श्रीपती शुगर कारखान्याने पहिलाच गळीत हंगाम घेतला असून केवळ ५६ हजार ८३५ टन उसाचे गाळप केले. तसेच केन ॲग्रो शुगरनेही शेवटच्या टप्प्यातच गळीत हंगाम सुरू केला. परंतु, या कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे जमा केले आहेत. सद्गुरू श्री श्री शुगरने ३४ कोटी २८ लाख, क्रांती कारखाना ५५ कोटी ९४ लाख, दत्त इंडिया २४ कोटी आणि हुतात्मा कारखान्याकडे ३३ कोटी ८० लाख रूपये असे एकूण १६० कोटी रूपये शेतकऱ्यांच्या एफआरपीचे कारखान्यांकडे थकीत आहेत. या कारखान्यांकडून एफआरपीची रक्कम तातडीने शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे.

शंभर टक्के एफआरपी दिलेले कारखानेराजारामबापू पाटील चारही युनिट, सोनहिरा, विश्वासराव नाईक, मोहनराव शिंदे, दालमिया शुगर, उदगिरी शुगर, केन ॲग्रो आदी दहा साखर कारखान्यांनी दि. २३ मार्चपर्यंत गाळपास आलेल्या उसाची १०० टक्के एफआरपीनुसार रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. या शेतकऱ्यांना कारखाना व्यवस्थापनाकडून दिलासा मिळाला आहे. पण, एफआरपीच्या वरच्या रकमेचे काय होणार, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नियमाने १४ दिवसांत एफआरपीनुसार पैसे मिळाले पाहिजेत. याबद्दल सर्व साखर कारखान्यांना तशा सूचनाही दिल्या आहेत. यातूनही काही कारखान्यांनी एफआरपीनुसार १०० टक्के पैसे शेतकऱ्यांना दिले नसतील तर त्यांच्यावर कारवाई करावी लागेल. -शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने