शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील ३१ हजार रहिवासी आणि ९ हजार जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवले, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 14:48 IST

नागरिकांच्या सुरक्षिततेला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून नागरिकांनी घाबरून जावू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये

सांगली - सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी होत असून यामुळे 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सुमारे 6 हजार 526 कुटुंबांतील 31 हजार 782 लोक व 9 हजार 728 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. यामध्ये प्रशासकीय शिबिरामध्ये 3 हजार 981 कुटुंबांतील 17 हजार 719 लोक व 4 हजार 648 जनावरे यांचे तात्पुरते पुनर्वसन केले आहे. तर नातेवाईक व सोयीनुसार 2 हजार 545 कुटुंबांतील 14 हजार 64 लोक व 5 हजार 80 जनावरांचे तात्पुरते पुनर्वसन केले आहे. पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन अत्यंत गांभीर्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून नागरिकांनी घाबरून जावू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

यामध्ये वाळवा तालुक्यातून 28 गावातील 1 हजार 480 कुटुंबांतील 6 हजार 441 लोक तर 2 हजार 986 जनावरे विस्थापित झाले असून त्यांचे विविध सुरक्षित ठिकाणी तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील 14 गावातील 106 कुटुंबांतील 489 लोक विस्थापित झाले आहेत. तर 1 हजार 306 जनावरे विस्थापित झाली आहेत. त्यांचे नातेवाईक व गावातील उंच ठिकाणी तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. पलूस तालुक्यातील 21 गावातील 1 हजार 958 कुटुंबांतील 8 हजार 2 लोक विस्थापित झाले असून तर 2 हजार 293 जनावरे विस्थापित झाली आहेत. त्यांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे. मिरज तालुक्यातील 17 गावातील 2 हजार 150 कुटुंबांतील 12 हजार 848 लोक व 2 हजार 896 जनावरे विस्थापित झाली आहेत. तर सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील 832 कुटुंबांतील 4 हजार 2 व्यक्ती व 247 जनावरे विस्थापित झाली आहेत. एकूण जिल्ह्यातील सुमारे 6 हजार 526 कुटुंबांतील 31 हजार 782 लोक व 9 हजार 728 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात, नातेवाईक, गावातील उंच ठिकाणी, शाळा, समाज मंदिरे या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे.सांगली जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सध्या हा कक्ष २४ तास सुरू आहे. त्याचा संपर्क क्रमांक ०२३३२६००५०० किंवा टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क साधता येईल. जिल्ह्यात पडणारा पाऊस व इतर अनुषंगिक माहिती या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. त्याशिवाय पोलीस नियंत्रण कक्ष (संपर्क क्रमांक ०२३३ २६७२१००), पाटबंधारे नियंत्रण कक्ष (संपर्क क्रमांक ०२३३ २३०१८२०) आणि महानगरपालिका कक्ष (संपर्क क्रमांक ०२३३ २३७३३३३) या ठिकाणी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कोणत्याही पध्दतीने मदतीची आवश्यकता असल्यास या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

टॅग्स :floodपूरSangliसांगली