शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

सांगली जिल्ह्यातील ३१ हजार रहिवासी आणि ९ हजार जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवले, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 14:48 IST

नागरिकांच्या सुरक्षिततेला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून नागरिकांनी घाबरून जावू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये

सांगली - सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी होत असून यामुळे 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सुमारे 6 हजार 526 कुटुंबांतील 31 हजार 782 लोक व 9 हजार 728 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. यामध्ये प्रशासकीय शिबिरामध्ये 3 हजार 981 कुटुंबांतील 17 हजार 719 लोक व 4 हजार 648 जनावरे यांचे तात्पुरते पुनर्वसन केले आहे. तर नातेवाईक व सोयीनुसार 2 हजार 545 कुटुंबांतील 14 हजार 64 लोक व 5 हजार 80 जनावरांचे तात्पुरते पुनर्वसन केले आहे. पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन अत्यंत गांभीर्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून नागरिकांनी घाबरून जावू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

यामध्ये वाळवा तालुक्यातून 28 गावातील 1 हजार 480 कुटुंबांतील 6 हजार 441 लोक तर 2 हजार 986 जनावरे विस्थापित झाले असून त्यांचे विविध सुरक्षित ठिकाणी तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील 14 गावातील 106 कुटुंबांतील 489 लोक विस्थापित झाले आहेत. तर 1 हजार 306 जनावरे विस्थापित झाली आहेत. त्यांचे नातेवाईक व गावातील उंच ठिकाणी तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. पलूस तालुक्यातील 21 गावातील 1 हजार 958 कुटुंबांतील 8 हजार 2 लोक विस्थापित झाले असून तर 2 हजार 293 जनावरे विस्थापित झाली आहेत. त्यांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे. मिरज तालुक्यातील 17 गावातील 2 हजार 150 कुटुंबांतील 12 हजार 848 लोक व 2 हजार 896 जनावरे विस्थापित झाली आहेत. तर सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील 832 कुटुंबांतील 4 हजार 2 व्यक्ती व 247 जनावरे विस्थापित झाली आहेत. एकूण जिल्ह्यातील सुमारे 6 हजार 526 कुटुंबांतील 31 हजार 782 लोक व 9 हजार 728 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात, नातेवाईक, गावातील उंच ठिकाणी, शाळा, समाज मंदिरे या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे.सांगली जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सध्या हा कक्ष २४ तास सुरू आहे. त्याचा संपर्क क्रमांक ०२३३२६००५०० किंवा टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क साधता येईल. जिल्ह्यात पडणारा पाऊस व इतर अनुषंगिक माहिती या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. त्याशिवाय पोलीस नियंत्रण कक्ष (संपर्क क्रमांक ०२३३ २६७२१००), पाटबंधारे नियंत्रण कक्ष (संपर्क क्रमांक ०२३३ २३०१८२०) आणि महानगरपालिका कक्ष (संपर्क क्रमांक ०२३३ २३७३३३३) या ठिकाणी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कोणत्याही पध्दतीने मदतीची आवश्यकता असल्यास या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

टॅग्स :floodपूरSangliसांगली