शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

टेंभू, ताकारीसह विस्तारित म्हैसाळही सौर ऊर्जेवर येणार; माजी खासदार संजय पाटील यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 16:45 IST

म्हैसाळ सौर ऊर्जेचे तीन महिन्यांत काम सुरू होणार

सांगली : म्हैसाळ योजनेतील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात एक हजार ५९४ कोटींची तरतूद केली आहे. येणाऱ्या तीन महिन्यांत सौर ऊर्जेच्या कामाला सुरुवात होणार आहे. म्हैसाळनंतर टेंभू, ताकारी आणि विस्तारित म्हैसाळ योजनाही सौर ऊर्जेवर येणार आहेत, अशी माहिती माजी खासदार संजय पाटील यांनी सांगलीत मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.संजय पाटील म्हणाले, म्हैसाळ पथदर्शी उपक्रम राबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिली. देशातील सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालणारा पहिला प्रकल्प आहे.टप्प्याटप्प्याने टेंभू आणि ताकारी, आरफळ योजनादेखील सौरऊर्जा प्रकल्प राबवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. म्हैसाळ योजना सौर ऊर्जेवर आल्यामुळे मिरज, कवठेमहांकाळ, जत आणि सांगोला, मंगळवेढा तालुक्यांतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.सिंचन योजना चालवताना शेतकऱ्यांवर वीज बिलाचा बोजा जास्त असतो. योजना चालवताना अडचणी येतात, म्हैसाळ योजनेचे सुमारे ५० ते ५५ कोटी रुपयांचे बिल येत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आता सौर ऊर्जेच्या प्रकल्पाची मागणी केली होती. त्याला मान्यता मिळून राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात यासाठी मान्यता दिली आहे. जर्मन बँक ७० टक्के आणि राज्य सरकार ३० टक्के निधी देणार आहे.म्हैसाळ योजनेच्या सौर ऊर्जा प्रकल्पास एक हजार ५९४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सौर ऊर्जेमुळे वीज बिल थकबाकीचा प्रश्न सुटणार आहे. जत तालुक्यातील संख येथे २०० हेक्टरवर होणार प्रकल्प होणार आहे. २०० मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प होणार आहे. सर्व प्राथमिक सर्वेक्षण, तपासण्या केल्या आहेत. त्यामुळे तीन महिन्यांत काम सुरू होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रथमच ४० टीएमसी पाणी उचललेजिल्ह्यातील दुष्काळी भागात यावर्षी उन्हाळ्यात आपण आजपर्यंत कधीच मिळाले नाही, इतके पाणी सोडले. टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या माध्यमातून इतिहासात प्रथमच ४० टीएमसी पाणी मिळालेे. उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोयनेच्या वीजनिर्मितीसाठी लागणारे ८ टीएमसी अतिरिक्त पाणी सांगली जिल्ह्याला दिले आहे, असा दावाही संजय पाटील यांनी केला.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीsanjaykaka patilसंजयकाका पाटील