शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
2
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
4
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
5
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
6
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
7
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
8
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
9
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
10
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
12
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
13
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
14
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
15
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
16
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
17
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
18
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
19
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
20
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?

संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST

विटा : पाडळी, बामणी, धामणी व हातनोलीच्या सरहद्दीवर असलेल्या संत ज्ञानेश्वर विद्यालयाने मुख्याध्यापक के. के. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक ...

विटा : पाडळी, बामणी, धामणी व हातनोलीच्या सरहद्दीवर असलेल्या संत ज्ञानेश्वर विद्यालयाने मुख्याध्यापक के. के. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वाढीसाठी ‘शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी’ हा अभिनव उपक्रम सुरू केला असून, शासनाच्या सेतू अभ्यासक्रमाचा भाग असलेल्या या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाचे श्री स्वामी दौलतगिरीजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी स्वागत केले आहे.

मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनाची उजळणी व्हावी, तसेच नवीन शैक्षणिक वर्षात शिकाव्या लागणाऱ्या अभ्यासक्रमाची पूर्व तयारी, हा दुहेरी उद्देश ठेवून शासनाने ४५ दिवसांचा सेतू अभ्यासक्रम मागील वर्षाच्या इयत्तेवर तयार केला आहे. शाळांमध्ये ऑनलाईन अभ्यासक्रम पाठविला जात आहे. परंतु, ग्रामीण भागातील बहुतेक पालकांकडे स्मार्टफोन नाहीत, तसेच काही पालकांकडे स्मार्टफोन असला, तरी त्याला इंटरनेट रेंज मिळत नसते किंवा दर महिन्याला महाग रिचार्ज करणे त्यांना शक्य होत नाही.

त्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्याचाच विचार करून खानापूर व तासगाव तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या पाडळी, बामणी, धामणी व हातनोली संयुक्त हद्दीवरील संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे अध्यक्ष हेमंत पाटील व मुख्याध्यापक के. के. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या दारी पोहोचून शैक्षणिक क्षमता वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

याव्दारे शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरात जात असून, तेथे ऑनलाईन तासिकांचा आढावा घेणे, सेतू अभ्यासक्रमांतील अडचणी समजावून घेणे, स्वाध्याय तपासणे, विद्यार्थी व पालकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यालयातील शिक्षिका छाया शेंडगे, सीमा गुरव, पूनम शिंदे, जयनी लवटे, किरण पाटील, संभाजी गोसावी उपस्थित होते.

फोटो - १६०७२०२१-विटा-पाडळी : पाडळी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाने ‘शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी’ हा उपक्रम सुरू केला असून, शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरात जाऊन शैक्षणिक क्षमता वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत.