शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सदाभाऊ खोत यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून आमदारकी रद्द करा : अ‍ॅड. अमित शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 20:53 IST

यावेळी प्रहारचे सुनिल सुतार, वंचितचे डॉ. विवेक गुरव, शाकिर तांबोळी, दिग्विजय पाटील उपस्थित होते. 

ठळक मुद्दे एसआयटी नेमावी अशी मागणी सुधार समितीचे अध्यक्ष  अ‍ॅड. अमित शिंदे यांनी केली. कडकनाथ कोंबडी चा घोटाळा हा अनेक राज्यामध्ये पसरला आहे. पोलिसांनी २४ तासात ही कारवाई न केल्यास नाईलाजास्तव पोलिसांविरुद्ध न्यायालयात जावे लागेल.

सांगली - कडकनाथ घोटाळ्याबद्दल आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पत्रकार परिषद घेऊन खालच्या पातळीची भाषा वापरत मंत्री सदाभाऊ खोत यांनी धमकावले आहे. हा प्रकार अतिशय धक्कादायक असून याची गंभीर दखल घेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून मंत्रीपद व आमदारकी रद्द करावी तसेच कडकनाथ घोटाळा अनेक राज्यात पसरला असल्याने त्याबाबत एसआयटी नेमावी अशी मागणी सुधार समितीचे अध्यक्ष  अ‍ॅड. अमित शिंदे यांनी केली. यावेळी प्रहारचे सुनिल सुतार, वंचितचे डॉ. विवेक गुरव, शाकिर तांबोळी, दिग्विजय पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना अ‍ॅड. अमित शिंदे म्हणाले की, कडकनाथ कोंबडी चा घोटाळा हा अनेक राज्यामध्ये पसरला आहे. छत्तीसगड मधील शेतकऱ्यांनी त्याबाबत सांगलीमध्ये पोलीस अधिक्षक यांचेकडे तक्रार दाखल केली आहे. त्याबाबत सामाजिक संघटनांनी आंदोलन पुकारलेले आहे. याबाबत मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते हे महारयतच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना दमबाजी करत आहेत. त्याबाबतचे विडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सदाभाऊ खोत यांनीच गुन्हे दाखल करावेत अशी भूमीका आंदोलनकर्त्यांनी घेतली. आपला संबंध जोडल्यामुळे चिडून जाऊन  मंत्री सदा खोत यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनकर्त्याविरुध्द अतिशय घाणेरडी भाषा वापरली. तुमच्या श्राद्धच जेवण मी जेवणार, सावज टप्यात आल्यावर शिकार करणार, तुमच्या छाताडावर नाचणार अशी असंसदीय भाषा वापरून जाहीररित्या आंदोलनकर्त्यांनी धमक्या दिल्या आहेत. हा प्रकार अतिशय गंभीर असून महाराष्ट्राच्या इतिहासात कोणाही मंत्र्याने इतक्या खालच्या पातळीची भाषा वापरली नाही. या धमकीची दखल घेऊन पोलिसांनी मंत्री सदा खोत यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. आंदोलनकर्त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी त्याला मंत्री सदाभाऊ खोत हे जबाबदार असतील. पोलिसांनी २४ तासात ही कारवाई न केल्यास नाईलाजास्तव पोलिसांविरुद्ध न्यायालयात जावे लागेल. तसेच या प्रकाराची दखल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी घेऊन सदाभाऊ खोत यांचे मंत्रिपद व आमदारकी रद्द करावी अशीही मागणी यावेळी त्यांनी केली. तसेच छत्तीसगड, राजस्थान व इतर राज्यातील शेतकऱ्यांची देखील या प्रकरणात फसवणूक झाली असल्याने याची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमावी तसेच या घोटाळ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना विशेष अनुदान देऊन त्यांना खाद्य व इतर सोइ पुरवाव्यात अशीही मागणी त्यांनी केली.या पत्रकार परिषदेला अ‍ॅड. सुभाष पाटील, नामदेव करगणे, प्रा. वासुदेव गुरव, जयंत जाधव, महालिंग हेगडे, संतोष शिंदे, अल्ताफ पटेल उपस्थित होते.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत advocateवकिलSangliसांगलीMLAआमदार