शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
4
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
5
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
6
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
7
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
8
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
9
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
10
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
11
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
12
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
13
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
14
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
15
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
16
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
17
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
18
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
19
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
20
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी

स्वामी विवेकानंद विज्ञाननिष्ठ समाजवादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : स्वामी विवेकानंद यांनी धर्म व विज्ञानाची सांगड घातली. ते धर्मातील रुढी-परंपरा, अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धेत रुतलेल्या जनतेच्या मुक्तीचा मार्ग शोधणारे विज्ञाननिष्ठ समाजवादी होते, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी सोमवारी व्यक्त केले.सांगलीतील मराठा समाजच्यावतीने अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथा निर्मूलन उपक्रमांतर्गत आयोजित ‘स्वामी विवेकानंदांची खरी ओळख’ ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : स्वामी विवेकानंद यांनी धर्म व विज्ञानाची सांगड घातली. ते धर्मातील रुढी-परंपरा, अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धेत रुतलेल्या जनतेच्या मुक्तीचा मार्ग शोधणारे विज्ञाननिष्ठ समाजवादी होते, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी सोमवारी व्यक्त केले.सांगलीतील मराठा समाजच्यावतीने अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथा निर्मूलन उपक्रमांतर्गत आयोजित ‘स्वामी विवेकानंदांची खरी ओळख’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. दाभोलकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील होते. यावेळी राज्यस्तरीय ‘अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता’ पुरस्कार नाशिकचे कृष्णा चांदुगडे यांना, तर जिल्हास्तरीय पुरस्कार आटपाडीचे सुनील भिंगे यांना देण्यात आला.दाभोलकर म्हणाले की, स्वामी विवेकानंद हिंदू धर्माचे अभ्यासक, विचारवंत होते, अशी ओळख निर्माण केली गेली. ही ओळख एकांगी, अपुरी व विकृत आहे. त्यांच्या लेख-पत्रांवरुन ते सप्रमाण सिध्द करता येते. त्यांनी भविष्य, चमत्कार नाकारला होता. विज्ञान व धर्म यांचा कार्यकारण भाव एकच असला तरी, विज्ञान मात्र ‘का’ व ‘कसे’ हे सांगते, अशी त्यांची विचारधारा होती. ते विज्ञाननिष्ठ होते. रुढी बदलल्या तरी धर्म बदलत नाही. चमत्कार हा सत्यप्राप्तीच्या मार्गातील अडथळा आहे, यावर त्यांचा विश्वास होता. रुढी-परंपरा बदलल्या नाहीत, तर देश रसातळाला जाईल. धर्मग्रंथातील एखादी गोष्ट, विचार पटला नाही, तर तो नाकारावा, असे ते सांगत. गोहत्येबाबत त्यांचे विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांशी मिळतेजुळते होते. स्त्रीमुक्तीबाबत त्यांचे विचार स्पष्ट होते. स्त्री-पुरूष समतोल असल्याशिवाय घर, राष्ट्राची उभारणी होऊ शकत नाही. मंदिरांची दारे वारांगनांसाठी उघडी असली पाहिजेत, हे त्यांचे विचार, आजच्या स्त्रीमुक्ती आंदोलनातील महिलांसाठी प्रेरणादायी आहेत.जातीअंताच्या लढ्यातही विवेकानंदांचे योगदान आहे. मुस्लिम, ख्रिश्चनांपेक्षा उच्चवर्णियांच्या अत्याचारामुळे धर्मांतरे झाली आहेत. त्यांनी हिंदू-मुस्लिमात समन्वय साधण्यासाठी पुढाकार घेतला. धर्माचा आधार घेऊन त्यांनी अनिष्ट रुढीवर आघात केला. माणसाला जिवंत राहण्यासाठी केवळ पाणी, अन्न, हवा या गोष्टींसोबतच आचार, उच्चार आणि विचारस्वातंत्र्य हवे, अशी त्यांची धारणा होती. ज्ञानगत, कर्मगत व अर्थगत ही जातीव्यवस्थेपेक्षाही वाईट आहे, असे ते मानत. मानवजातीने शोधलेल्या विविध वादात समाजवाद त्यांना चांगला वाटत होता. तो परिपूर्ण नसला तरी, गरीब, दलितांची स्थिती समाजवादामुळे सुधारेल, असे त्यांना वाटत होते, असेही दाभोलकर यावेळी म्हणाले.यावेळी जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनीही मार्गदर्शन केले. प्रारंभी मराठा समाजचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रा. पी. आर. आर्डे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी मराठा समाजतर्फे घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वाटप करण्यात आले.या स्पर्धेतील विजेता अक्षय पाटील याचे ‘सोशल मीडियाचा अतिरेक’ या विषयावर भाषण झाले. सुधीर सावंत यांनी आभार मानले, तर प्रा. शशिकांत जाधव यांनी सूत्रसंचालन केले.