शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

स्वामी विवेकानंद विज्ञाननिष्ठ समाजवादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : स्वामी विवेकानंद यांनी धर्म व विज्ञानाची सांगड घातली. ते धर्मातील रुढी-परंपरा, अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धेत रुतलेल्या जनतेच्या मुक्तीचा मार्ग शोधणारे विज्ञाननिष्ठ समाजवादी होते, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी सोमवारी व्यक्त केले.सांगलीतील मराठा समाजच्यावतीने अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथा निर्मूलन उपक्रमांतर्गत आयोजित ‘स्वामी विवेकानंदांची खरी ओळख’ ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : स्वामी विवेकानंद यांनी धर्म व विज्ञानाची सांगड घातली. ते धर्मातील रुढी-परंपरा, अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धेत रुतलेल्या जनतेच्या मुक्तीचा मार्ग शोधणारे विज्ञाननिष्ठ समाजवादी होते, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी सोमवारी व्यक्त केले.सांगलीतील मराठा समाजच्यावतीने अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथा निर्मूलन उपक्रमांतर्गत आयोजित ‘स्वामी विवेकानंदांची खरी ओळख’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. दाभोलकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील होते. यावेळी राज्यस्तरीय ‘अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता’ पुरस्कार नाशिकचे कृष्णा चांदुगडे यांना, तर जिल्हास्तरीय पुरस्कार आटपाडीचे सुनील भिंगे यांना देण्यात आला.दाभोलकर म्हणाले की, स्वामी विवेकानंद हिंदू धर्माचे अभ्यासक, विचारवंत होते, अशी ओळख निर्माण केली गेली. ही ओळख एकांगी, अपुरी व विकृत आहे. त्यांच्या लेख-पत्रांवरुन ते सप्रमाण सिध्द करता येते. त्यांनी भविष्य, चमत्कार नाकारला होता. विज्ञान व धर्म यांचा कार्यकारण भाव एकच असला तरी, विज्ञान मात्र ‘का’ व ‘कसे’ हे सांगते, अशी त्यांची विचारधारा होती. ते विज्ञाननिष्ठ होते. रुढी बदलल्या तरी धर्म बदलत नाही. चमत्कार हा सत्यप्राप्तीच्या मार्गातील अडथळा आहे, यावर त्यांचा विश्वास होता. रुढी-परंपरा बदलल्या नाहीत, तर देश रसातळाला जाईल. धर्मग्रंथातील एखादी गोष्ट, विचार पटला नाही, तर तो नाकारावा, असे ते सांगत. गोहत्येबाबत त्यांचे विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांशी मिळतेजुळते होते. स्त्रीमुक्तीबाबत त्यांचे विचार स्पष्ट होते. स्त्री-पुरूष समतोल असल्याशिवाय घर, राष्ट्राची उभारणी होऊ शकत नाही. मंदिरांची दारे वारांगनांसाठी उघडी असली पाहिजेत, हे त्यांचे विचार, आजच्या स्त्रीमुक्ती आंदोलनातील महिलांसाठी प्रेरणादायी आहेत.जातीअंताच्या लढ्यातही विवेकानंदांचे योगदान आहे. मुस्लिम, ख्रिश्चनांपेक्षा उच्चवर्णियांच्या अत्याचारामुळे धर्मांतरे झाली आहेत. त्यांनी हिंदू-मुस्लिमात समन्वय साधण्यासाठी पुढाकार घेतला. धर्माचा आधार घेऊन त्यांनी अनिष्ट रुढीवर आघात केला. माणसाला जिवंत राहण्यासाठी केवळ पाणी, अन्न, हवा या गोष्टींसोबतच आचार, उच्चार आणि विचारस्वातंत्र्य हवे, अशी त्यांची धारणा होती. ज्ञानगत, कर्मगत व अर्थगत ही जातीव्यवस्थेपेक्षाही वाईट आहे, असे ते मानत. मानवजातीने शोधलेल्या विविध वादात समाजवाद त्यांना चांगला वाटत होता. तो परिपूर्ण नसला तरी, गरीब, दलितांची स्थिती समाजवादामुळे सुधारेल, असे त्यांना वाटत होते, असेही दाभोलकर यावेळी म्हणाले.यावेळी जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनीही मार्गदर्शन केले. प्रारंभी मराठा समाजचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रा. पी. आर. आर्डे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी मराठा समाजतर्फे घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वाटप करण्यात आले.या स्पर्धेतील विजेता अक्षय पाटील याचे ‘सोशल मीडियाचा अतिरेक’ या विषयावर भाषण झाले. सुधीर सावंत यांनी आभार मानले, तर प्रा. शशिकांत जाधव यांनी सूत्रसंचालन केले.