शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

स्वामी विवेकानंद विज्ञाननिष्ठ समाजवादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : स्वामी विवेकानंद यांनी धर्म व विज्ञानाची सांगड घातली. ते धर्मातील रुढी-परंपरा, अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धेत रुतलेल्या जनतेच्या मुक्तीचा मार्ग शोधणारे विज्ञाननिष्ठ समाजवादी होते, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी सोमवारी व्यक्त केले.सांगलीतील मराठा समाजच्यावतीने अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथा निर्मूलन उपक्रमांतर्गत आयोजित ‘स्वामी विवेकानंदांची खरी ओळख’ ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : स्वामी विवेकानंद यांनी धर्म व विज्ञानाची सांगड घातली. ते धर्मातील रुढी-परंपरा, अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धेत रुतलेल्या जनतेच्या मुक्तीचा मार्ग शोधणारे विज्ञाननिष्ठ समाजवादी होते, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी सोमवारी व्यक्त केले.सांगलीतील मराठा समाजच्यावतीने अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथा निर्मूलन उपक्रमांतर्गत आयोजित ‘स्वामी विवेकानंदांची खरी ओळख’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. दाभोलकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील होते. यावेळी राज्यस्तरीय ‘अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता’ पुरस्कार नाशिकचे कृष्णा चांदुगडे यांना, तर जिल्हास्तरीय पुरस्कार आटपाडीचे सुनील भिंगे यांना देण्यात आला.दाभोलकर म्हणाले की, स्वामी विवेकानंद हिंदू धर्माचे अभ्यासक, विचारवंत होते, अशी ओळख निर्माण केली गेली. ही ओळख एकांगी, अपुरी व विकृत आहे. त्यांच्या लेख-पत्रांवरुन ते सप्रमाण सिध्द करता येते. त्यांनी भविष्य, चमत्कार नाकारला होता. विज्ञान व धर्म यांचा कार्यकारण भाव एकच असला तरी, विज्ञान मात्र ‘का’ व ‘कसे’ हे सांगते, अशी त्यांची विचारधारा होती. ते विज्ञाननिष्ठ होते. रुढी बदलल्या तरी धर्म बदलत नाही. चमत्कार हा सत्यप्राप्तीच्या मार्गातील अडथळा आहे, यावर त्यांचा विश्वास होता. रुढी-परंपरा बदलल्या नाहीत, तर देश रसातळाला जाईल. धर्मग्रंथातील एखादी गोष्ट, विचार पटला नाही, तर तो नाकारावा, असे ते सांगत. गोहत्येबाबत त्यांचे विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांशी मिळतेजुळते होते. स्त्रीमुक्तीबाबत त्यांचे विचार स्पष्ट होते. स्त्री-पुरूष समतोल असल्याशिवाय घर, राष्ट्राची उभारणी होऊ शकत नाही. मंदिरांची दारे वारांगनांसाठी उघडी असली पाहिजेत, हे त्यांचे विचार, आजच्या स्त्रीमुक्ती आंदोलनातील महिलांसाठी प्रेरणादायी आहेत.जातीअंताच्या लढ्यातही विवेकानंदांचे योगदान आहे. मुस्लिम, ख्रिश्चनांपेक्षा उच्चवर्णियांच्या अत्याचारामुळे धर्मांतरे झाली आहेत. त्यांनी हिंदू-मुस्लिमात समन्वय साधण्यासाठी पुढाकार घेतला. धर्माचा आधार घेऊन त्यांनी अनिष्ट रुढीवर आघात केला. माणसाला जिवंत राहण्यासाठी केवळ पाणी, अन्न, हवा या गोष्टींसोबतच आचार, उच्चार आणि विचारस्वातंत्र्य हवे, अशी त्यांची धारणा होती. ज्ञानगत, कर्मगत व अर्थगत ही जातीव्यवस्थेपेक्षाही वाईट आहे, असे ते मानत. मानवजातीने शोधलेल्या विविध वादात समाजवाद त्यांना चांगला वाटत होता. तो परिपूर्ण नसला तरी, गरीब, दलितांची स्थिती समाजवादामुळे सुधारेल, असे त्यांना वाटत होते, असेही दाभोलकर यावेळी म्हणाले.यावेळी जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनीही मार्गदर्शन केले. प्रारंभी मराठा समाजचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रा. पी. आर. आर्डे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी मराठा समाजतर्फे घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वाटप करण्यात आले.या स्पर्धेतील विजेता अक्षय पाटील याचे ‘सोशल मीडियाचा अतिरेक’ या विषयावर भाषण झाले. सुधीर सावंत यांनी आभार मानले, तर प्रा. शशिकांत जाधव यांनी सूत्रसंचालन केले.