शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
2
आजोबा, वडील एक्स आर्मी... पतीही मेजर! कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी...
3
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
4
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
5
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
6
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
7
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
8
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
9
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
10
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
13
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
14
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
15
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
16
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
17
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
18
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
19
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
20
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम

सांगलीत कॉँगे्रसच्या बैठकीत स्वबळाचा नारा

By admin | Updated: April 15, 2015 00:29 IST

जिल्हा बॅँक निवडणूक : मदन पाटील, मोहनराव कदम यांना उमेदवार निवडीचे सर्वाधिकार

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीशी कोणतीही तडजोड न करता स्वबळावर कॉँग्रेसने लढावे, अशी मागणी कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत केली. निवडणुकीबाबतचे धोरण आणि उमेदवार ठरविण्याचे सर्वाधिकार माजी मंत्री मदन पाटील आणि मोहनराव कदम यांना देण्यात आले. २२ एप्रिल रोजी होणाऱ्या बैठकीत कॉँग्रेस निवडणुकीबाबतचा अंतिम निर्णय घेणार असून, उमेदवारही निश्चित केले जाणार आहेत. बैठकीस कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, मदन पाटील, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, सत्यजित देशमुख, नामदेवराव मोहिते तसेच सर्व तालुकाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. पदाधिकारी तसेच तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड न करण्याची भूमिका मांडली. एकजुटीने काम केले तर कॉँग्रेसचे बहुमत होऊ शकते. त्यामुळे निर्णय प्रक्रियेतील पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर ही निवडणूक लढवावी, अशी मागणी करण्यात आली. काहींनी आघाडी करायची की स्वबळावर लढायचे, याचा निर्णय नेत्यांनीच घेतलेला बरा, असे मत मांडले. आ. विलासराव जगताप यांनी केलेल्या आरोपाबाबतही कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. त्यावेळी मोहनराव कदम म्हणाले की, त्या माणसाची दखलसुद्धा घेण्याची गरज नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्या आरोपांकडे फारसे लक्ष देऊ नये. बहुतांशी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचाच नारा यावेळी दिला. दीड तास चाललेल्या बैठकीत प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. येत्या २२ एप्रिल रोजी कॉँग्रेसची पुन्हा बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत स्वबळावर लढायचे की आघाडी करून लढायचे, याविषयीचा निर्णय घेतला जाणार आहे. प्रत्येकाचे मत आजमावून घेतल्यानंतर सर्वच तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी मोहनराव व मदन पाटील यांना निर्णयाचे अधिकार दिले. दोन्ही नेत्यांनी मिळून आपसात चर्चा करून जिल्हा बॅँक निवडणुकीविषयीचे धोरण ठरवावे. त्यांनीच उमेदवार निश्चित करावेत. त्यांच्या निर्णयाशी सर्व तालुक्यातील पदाधिकारी बांधिल राहतील, असे सांगितले. सर्वच पक्षात सुरू असलेल्या हालचालींचा अंदाज घेऊन २२ रोजी निर्णय घेतला जाईल, असे कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)