शिराळ्याच्या सुशोभिकरणासाठी ‘टाकाऊपासून टिकाऊ’ उपक्रम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:09 IST2020-12-05T05:09:21+5:302020-12-05T05:09:21+5:30
शिराळा : शिराळा नगरपंचायतीमार्फत माझी वसुंधरा अभियानअंतर्गत ‘टाकाऊपासून टिकाऊ’ वस्तू बनविल्या जाणार आहेत. शहरातील चौकात, प्रवेशद्वार आदी ठिकाणी विविध ...

शिराळ्याच्या सुशोभिकरणासाठी ‘टाकाऊपासून टिकाऊ’ उपक्रम’
शिराळा : शिराळा नगरपंचायतीमार्फत माझी वसुंधरा अभियानअंतर्गत ‘टाकाऊपासून टिकाऊ’ वस्तू बनविल्या जाणार आहेत. शहरातील चौकात, प्रवेशद्वार आदी ठिकाणी विविध प्लास्टिकच्या कचऱ्यातून शोभेचे पुतळे व कमानी बसविण्यात येणार आहेत. यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलेल, अशी माहिती तहसीलदार तथा प्रशासक गणेश शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, माजी नगराध्यक्षा अर्चना शेटे, माजी उपनगराध्यक्ष कीर्तीकुमार पाटील, विद्यमान नगरसेवक, पदाधिकारी, नागरिक, विविध संस्था यांच्या सहकार्याने नो व्हेईकल डे, स्वच्छता अभियान आदी उपक्रम चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. शहरातील गोळा होणारा प्लास्टिक कचरा, लोखंडी सळया, पाण्याच्या बाटल्या गोळा करून हा उपक्रम राबविला जाणार आहे.
ते म्हणाले, शहराच्या प्रवेशद्वारावर स्वागत फलक, विविध पुतळे, आयफेल टॉवर, हत्ती, नाग आदींचे प्लास्टिक पुतळे तयार करण्यात येणार आहेत. तसेच खराब टायरच्या माध्यमातून बसण्यासाठी स्टूल तयार करणे, नगरपंचायत इमारतीच्या प्रवेशद्वारावर स्वागत करणाऱ्या व्यक्तींचे पुतळे तयार करण्यात येणार आहेत. कचरा, लोखंडी सळया, बार, प्लास्टिक साहित्य, कागदी पुठ्ठे, टायर आदी टाकाऊ वस्तूंपासून बनविलेल्या वस्तूंमुळे शहराचा चेहरामोहरा बदलेल.