शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
2
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
3
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
4
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
5
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
6
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
7
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
8
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
9
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
10
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
11
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
12
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
13
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
14
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
15
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
16
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
17
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
18
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
19
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
20
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश खाडेंनी सांगलीचा मंत्रीपदाचा दुष्काळ संपवला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 18:02 IST

उद्योजक ते भाजपचे मंत्री व्हाया रिपाइं

- श्रीनिवास नागे

सांगली : वर्षानुवर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात ‘हेवीवेट’ मंत्रीपदे सांभाळणाऱ्या सांगलीला २०१४ च्या निवडणुकीत चार आमदार निवडून येऊनही भाजपने सुरुवातीला मंत्रीपद दिले नव्हते. नंतर सदाभाऊ खोत यांच्या रूपाने केवळ एक राज्यमंत्रीपद मिळाले. मंत्रीपदाचा हा दुष्काळ संपणार कधी, असा सवाल विचारणाऱ्या सांगली जिल्ह्याला अवघ्या तीन महिन्यांसाठी का होईना सुरेश खाडे यांच्या रूपाने मंत्रीपद मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना खूश केले आहे.

मोजूनमापून पण रोखठोक बोलणे, धूर्तपणा, लोकांची नस ओळखण्यातील चतुराई ही सुरेश खाडे यांची गुणवैशिष्ट्ये. उद्योग-व्यवसायात जम बसलेला असतानाही ते राजकारणात आले. सांगली जिल्ह्यातील जतमधून एकदा आणि आणि मिरज येथून सलग दोनवेळा त्यांनी आमदारकीवर मोहोर उमटवली आहे. 

तासगाव तालुक्यातील पेड हे त्यांचे मूळगाव. जन्म १ जून १९५८ रोजीचा. गरीब चर्मकार कुटुंबात जन्मलेल्या सुरेश खाडे यांनी प्रतिकूल परिस्थितीत दहावीपर्यंत शिक्षण घेऊन आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केला. व्यवसायाच्या शोधात दत्ता व अशोक या भावांसोबत मुंबईला गेले. समुद्रात तेल उत्खनन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सामग्रीच्या निर्मिती व्यवसायात खाडे बंधूंनी जम बसविला. दास ऑफशोअर या कंपनीची स्थापना केली. दत्ता, अशोक आणि सुरेश या तिन्ही भावांच्या नावांच्या आद्याक्षरावरून ‘दास’चे नामाभिधान झाले.

या कंपनीमार्फत तेल उत्खननासाठी लागणाऱ्या सामग्रीची निर्मिती, स्काय वॉकची उभारणी करण्यात येते. मुंबईतील पहिला स्कायवॉक बांधण्याचा मान ‘दास’नेच पटकावला आहे. खाडे बंधूंनी दुबईतही उद्योग सुरू केला आहे. 

व्यवसायात यश मिळविल्यानंतर सुरेश खाडे यांनी रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. रिपाइंच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. २००४ मध्ये जत राखीव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणुकीची तयारी केली. तेव्हा ते जत येथील डफळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते. जतचे तत्कालीन काँग्रेसचे आमदार उमाजी सनमडीकर यांना तत्कालीन काँग्रेस नेते विलासराव जगताप यांनी जोरदार विरोध केला होता. खाडे यांनी जगतापांच्या मध्यस्थीने गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करून जतसाठी भाजपची उमेदवारी मिळविली. जगताप यांनी उघडपणे प्रचार करून खाडे यांना निवडून आणले आणि जिल्ह्यात प्रथमच जतमध्ये भाजपचा आमदार विजयी झाला! 

२००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेत जत विधानसभा मतदारसंघ खुला होऊन मिरज मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने भाजपने खाडे यांना मिरजेतून उमेदवारी दिली. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मिरजेतूनही खाडे यांनी ५४ हजार मताधिक्याने विजय मिळविला. पुढे भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. 

शेती, नाटक, संगीत व विठ्ठलभक्ती यात खाडे यांना विशेष रूची. पंढरीच्या प्रत्येक वारीला ते विठ्ठलचरणी हजेरी लावतात. पेड येथील शेतीची, द्राक्षबागेची देखभाल करण्याचीही त्यांना आवड आहे. त्यांचे तासगाव येथे स्वत:चे कोल्ड स्टोअरेज आहे. श्रीलंकेतील कोलंबो विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी देऊन त्यांचा सन्मान केला आहे. 

विधानसभेच्या २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार विरोधात असतानाही खाडे यांनी २००९मधील निवडणुकीपेक्षा दहा हजार जादा मताधिक्याने विजय मिळवला. गत विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या दंगलीमुळे, ‘दंगलीमुळे निवडून आलेला आमदार’ असा विरोधकांनी केलेला प्रचार खोडून काढत त्यांनी एकतर्फी विजय नोंदवला. विरोधातील सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली! दहा वर्षे आमदार म्हणून काम करीत असताना विधिमंडळ समिती सदस्य, पंचायत राज समिती सदस्य म्हणून त्यांनी काम केले. राष्ट्रीय चर्मकार संघाचे सल्लागार म्हणूनही ते कार्यरत आहेत.

दणदणीत विजयसुरेश खाडे यांना विधानभेच्या २०१४मधील निवडणुकीत मिरज मतदारसंघातून ९३७९५ मते मिळाली, तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे प्रा. सिद्धार्थ जाधव यांना २९७२८ मतांवर समाधान मानावे लागले होते. सुमारे ६४ हजार मतांनी खाडे यांनी दणदणीत विजय मिळवला होता.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार