शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सुरेश खाडेंनी सांगलीचा मंत्रीपदाचा दुष्काळ संपवला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 18:02 IST

उद्योजक ते भाजपचे मंत्री व्हाया रिपाइं

- श्रीनिवास नागे

सांगली : वर्षानुवर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात ‘हेवीवेट’ मंत्रीपदे सांभाळणाऱ्या सांगलीला २०१४ च्या निवडणुकीत चार आमदार निवडून येऊनही भाजपने सुरुवातीला मंत्रीपद दिले नव्हते. नंतर सदाभाऊ खोत यांच्या रूपाने केवळ एक राज्यमंत्रीपद मिळाले. मंत्रीपदाचा हा दुष्काळ संपणार कधी, असा सवाल विचारणाऱ्या सांगली जिल्ह्याला अवघ्या तीन महिन्यांसाठी का होईना सुरेश खाडे यांच्या रूपाने मंत्रीपद मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना खूश केले आहे.

मोजूनमापून पण रोखठोक बोलणे, धूर्तपणा, लोकांची नस ओळखण्यातील चतुराई ही सुरेश खाडे यांची गुणवैशिष्ट्ये. उद्योग-व्यवसायात जम बसलेला असतानाही ते राजकारणात आले. सांगली जिल्ह्यातील जतमधून एकदा आणि आणि मिरज येथून सलग दोनवेळा त्यांनी आमदारकीवर मोहोर उमटवली आहे. 

तासगाव तालुक्यातील पेड हे त्यांचे मूळगाव. जन्म १ जून १९५८ रोजीचा. गरीब चर्मकार कुटुंबात जन्मलेल्या सुरेश खाडे यांनी प्रतिकूल परिस्थितीत दहावीपर्यंत शिक्षण घेऊन आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केला. व्यवसायाच्या शोधात दत्ता व अशोक या भावांसोबत मुंबईला गेले. समुद्रात तेल उत्खनन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सामग्रीच्या निर्मिती व्यवसायात खाडे बंधूंनी जम बसविला. दास ऑफशोअर या कंपनीची स्थापना केली. दत्ता, अशोक आणि सुरेश या तिन्ही भावांच्या नावांच्या आद्याक्षरावरून ‘दास’चे नामाभिधान झाले.

या कंपनीमार्फत तेल उत्खननासाठी लागणाऱ्या सामग्रीची निर्मिती, स्काय वॉकची उभारणी करण्यात येते. मुंबईतील पहिला स्कायवॉक बांधण्याचा मान ‘दास’नेच पटकावला आहे. खाडे बंधूंनी दुबईतही उद्योग सुरू केला आहे. 

व्यवसायात यश मिळविल्यानंतर सुरेश खाडे यांनी रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. रिपाइंच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. २००४ मध्ये जत राखीव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणुकीची तयारी केली. तेव्हा ते जत येथील डफळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते. जतचे तत्कालीन काँग्रेसचे आमदार उमाजी सनमडीकर यांना तत्कालीन काँग्रेस नेते विलासराव जगताप यांनी जोरदार विरोध केला होता. खाडे यांनी जगतापांच्या मध्यस्थीने गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करून जतसाठी भाजपची उमेदवारी मिळविली. जगताप यांनी उघडपणे प्रचार करून खाडे यांना निवडून आणले आणि जिल्ह्यात प्रथमच जतमध्ये भाजपचा आमदार विजयी झाला! 

२००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेत जत विधानसभा मतदारसंघ खुला होऊन मिरज मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने भाजपने खाडे यांना मिरजेतून उमेदवारी दिली. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मिरजेतूनही खाडे यांनी ५४ हजार मताधिक्याने विजय मिळविला. पुढे भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. 

शेती, नाटक, संगीत व विठ्ठलभक्ती यात खाडे यांना विशेष रूची. पंढरीच्या प्रत्येक वारीला ते विठ्ठलचरणी हजेरी लावतात. पेड येथील शेतीची, द्राक्षबागेची देखभाल करण्याचीही त्यांना आवड आहे. त्यांचे तासगाव येथे स्वत:चे कोल्ड स्टोअरेज आहे. श्रीलंकेतील कोलंबो विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी देऊन त्यांचा सन्मान केला आहे. 

विधानसभेच्या २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार विरोधात असतानाही खाडे यांनी २००९मधील निवडणुकीपेक्षा दहा हजार जादा मताधिक्याने विजय मिळवला. गत विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या दंगलीमुळे, ‘दंगलीमुळे निवडून आलेला आमदार’ असा विरोधकांनी केलेला प्रचार खोडून काढत त्यांनी एकतर्फी विजय नोंदवला. विरोधातील सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली! दहा वर्षे आमदार म्हणून काम करीत असताना विधिमंडळ समिती सदस्य, पंचायत राज समिती सदस्य म्हणून त्यांनी काम केले. राष्ट्रीय चर्मकार संघाचे सल्लागार म्हणूनही ते कार्यरत आहेत.

दणदणीत विजयसुरेश खाडे यांना विधानभेच्या २०१४मधील निवडणुकीत मिरज मतदारसंघातून ९३७९५ मते मिळाली, तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे प्रा. सिद्धार्थ जाधव यांना २९७२८ मतांवर समाधान मानावे लागले होते. सुमारे ६४ हजार मतांनी खाडे यांनी दणदणीत विजय मिळवला होता.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार