शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

सिंचन योजनांचा शेतकऱ्यांना आधार, ५४ कोटीचे बिलही शासन भरणार; टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांमुळे दाहकता कमी

By अशोक डोंबाळे | Updated: September 23, 2023 18:22 IST

टँकर, छावण्यांवरचा खर्चही वाचला 

अशोक डोंबाळे

सांगली : जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस केवळ ४६ टक्केच झाला आहे. दुष्काळी तालुक्यांना तर पूर्णत: पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. या दुष्काळाच्या तीव्र झळांमध्ये टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांचा शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. सप्टेंबर २०२३ पर्यंत चालविलेल्या योजनांचे वीजबील ५४ कोटी ७१ लाख रुपये आले आहे.जिल्ह्यात १ जून ते २१ सप्टेंबरपर्यंत ४९१.५ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. पण, केवळ २०७.१ मिलीमीटर पाऊस झाला असून जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्यांसह मिरज पूर्व भागात ४२.१ टक्केच पाऊस झाल्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. खरीप हंगाम वाया गेला असून रब्बीची पेरणी होणेही कठीण आहे.या दुष्काळाच्या तीव्र टंचाईत टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनेतून पाणी सोडून ७०० पाझर तलाव, बंधारे भरून घेतले आहेत. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज पूर्व, कडेगाव, खानापूर तालुक्यातील काही गावे आणि वाड्या-वस्त्यांवरील पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे. सिंचन योजनांमधून पाणी सोडले नसते तर दुष्काळाची तीव्रता आणखी भीषण झाली असती, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.

असे उचलले पाणी

म्हैसाळ योजना १८ जुलैपासून चालविली असून तीन टीएमसी ८७६.६५ दशलक्ष घनफूट पाणी उचलले आहे. यासाठी महावितरणचे २८ कोटी सात लाख रुपयांचे वीजबील आले आहे. टेंभू योजना २१ जुलैपासून चालू असून चार टीएमसी ३५ दशलक्ष घनफूट पाणी उचलले असून १८ कोटी ३१ लाख रुपयांचे वीजबील आले आहे. ताकारी योजना २२ जुलैला चालू झाली असून एक टीएमसी ३७२.५७ दशलक्ष घनफूट पाणी उचलले असून सात कोटी ३३ लाख रुपये वीजबील आहे. ताकारी योजना ३१ ऑगस्टला बंद केली आहे.

सातशे तलाव, बंधारे भरलेम्हैसाळ योजनेतून मिरज, कवठेमहांकाळ, जत, तासगाव तालुक्यातील ४३२, टेंभू योजनेतून कडेगाव, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, सांगोला तालुक्यातील १६५ आणि ताकारी योजनेतून कडेगाव, तासगावसह सहा तालुक्यातील १३४ तलाव, बंधारे भरून घेतले आहे. यामुळे पिण्याचे पाणी व पशुधनाच्या चारा टंचाईचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी