शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

नेर्ले येथे जवानाच्या पत्नीची दोन मुलांसह पेटवून घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:49 PM

मलकापूर : नेर्ले (ता. शाहूवाडी) येथील विवाहितेने आपल्या दोन लहान मुलांसह पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. स्वाती महेश ...

मलकापूर : नेर्ले (ता. शाहूवाडी) येथील विवाहितेने आपल्या दोन लहान मुलांसह पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. स्वाती महेश पाटील (वय २८), विभावरी महेश पाटील (४), देवांश महेश पाटील (१) अशी या दुर्दैवी माय-लेकरांची नावे आहेत. आत्महत्येमागचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. आत्महत्येचा हा प्रकार गुरुवारी सकाळी दहा वाजता घडला.पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, नेर्ले (ता. शाहूवाडी) येथील शिवाजी बापू पाटील हे पत्नी नंदा, सून स्वाती, नात विभावरी, नातू देवांशसह ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागील बंगल्यात एकत्र राहतात. त्यांचा मुलगा व स्वातीचा पती महेश सन २००८ मध्ये सैन्यात भरती झाला असून सध्या तो जैसलमेर (राजस्थान) येथे सेवेत आहे. भाटशिरगाव (ता. शिराळा) येथे स्वातीचे माहेर असून तिचे वडील कृष्णा धुमाळ हे व्यवसायानिमित्त सध्या पत्नीसह मुंबईत राहतात. सन २०१३ मध्ये स्वातीचा महेशशी विवाह झाला. सव्वा वर्षांपूर्वी दुसऱ्या मुलाच्या प्रसूतीसाठी स्वाती गावी आली होती. चार वर्षांची मुलगी विभावरी कोकरूड येथील नर्सरी स्कूलमध्ये शिकत होती, तर लहान देवांश नुकताच एक वर्षाचा झाला होता.दरम्यान, शिवाजी पाटील यांच्या घरातील किचनच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. गुरुवारी सकाळी सासू नंदा या साफसफाई उरकून दोन्ही नातवंडांसह शेजारीच असलेल्या नातलगांकडे गेल्या तर सासरे गावातील साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले. दरम्यान, सासू नंदा यांच्याकडे येऊन स्वातीने खाऊ भरविण्याच्या निमित्ताने दोन्ही मुलांना घरी नेले. साखरपुड्याच्या कार्यक्रमावरून सासरे शिवाजी परतल्यानंतर बंगल्याबाहेर झाडाच्या कट्ट्यावर येऊन बसले असता त्यांना काहीतरी जळाल्याचा वास आला. खिडकीतून धूर येऊ लागल्याने घरात शॉर्टसर्किट झाले का म्हणून त्यांनी पत्नीला पाहण्यास सांगितले. यावेळी खोलीचा दरवाजा आतून बंद होता. घरी आलेली मुले व सून दिसत नसल्याने व शंका आल्यामुळे सासूने आरडाओरडा सुरू केला. जमलेल्या नागरिकांनी खोलीचा दरवाजा तोडून आत पाहिले तर स्वातीसह दोन्हीही लहान मुले भाजून निपचित पडली होती. यावेळी स्वाती व विभावरी दोघीही गतप्राण झाल्या होत्या तर लहान देवांशची किंचित हालचाल जाणवल्याने त्याला उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले परंतु वाटेतच त्याचाही मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाचे छायाचित्रण केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठविले. खबरदारीचा उपाय म्हणून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी स्ट्रायकिंग फोर्सला घटनास्थळी पाचारण केले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांत घटनेची नोंद झाली नव्हती.