शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

उसाची एफआरपी कर्जमाफीच्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 10:53 IST

दुष्काळ, महापूर आणि अवकाळीने संपूर्ण राज्यातील शेतकरी पिचून गेला. खरिपाचा सगळा हंगाम वाया गेला, हाती काही लागले नाही. आता ऊस गाळपासाठी गेला, तर कारखानदार एफआरपी देण्याचे नाव काढत नाहीत. या कावेबाजपणाला त्यांनी सरकारच्या कर्जमाफीची किनार जोडली आहे. एफआरपी दिली तर, सोसायटी वसुली होणार, त्यामुळे शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची वाट पहात बसावे लागणार आहे.

ठळक मुद्देउसाची एफआरपी कर्जमाफीच्या कचाट्यातकर्जमाफीचा मुद्दा साखर कारखानदारांच्या पथ्यावर

युनूस शेख इस्लामपूर : दुष्काळ, महापूर आणि अवकाळीने संपूर्ण राज्यातील शेतकरी पिचून गेला. खरिपाचा सगळा हंगाम वाया गेला, हाती काही लागले नाही. आता ऊस गाळपासाठी गेला, तर कारखानदार एफआरपी देण्याचे नाव काढत नाहीत. या कावेबाजपणाला त्यांनी सरकारच्या कर्जमाफीची किनार जोडली आहे. एफआरपी दिली तर, सोसायटी वसुली होणार, त्यामुळे शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची वाट पहात बसावे लागणार आहे.शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. अनेक चमत्कार घडत सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर आले. या सरकारने कर्जमाफीच्या विषयाला हात घातला आहे. राज्याच्या सहकार आयुक्तांनी १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतच्या शेती कर्जाचा तपशील २० जानेवारीपर्यंत देण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे सोसायटी पातळीवर अहवाल तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.गाळप झालेल्या उसाचा दर मिळणार, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना आता सरकारच्या कर्जमाफीची वाट पहात बसावे लागणार आहे. कर्जमाफीची प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने जानेवारी महिनासुद्धा निघून जाण्याची शक्यता आहे.

शेती कर्जाचा तपशील २० जानेवारीपर्यंत सरकारला मिळणार आहे. त्यानंतर कर्जमाफीची घोषणा होईल. अशा परिस्थितीत एफआरपी दिली तर, त्या पैशावर अगोदरच वसुली याद्या तयार करून बसलेल्या सोसायट्यांचा हक्क लागणार आहे. त्यामुळे सरकारच्या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही. नेमका हाच मुद्दा साखर कारखानदारांच्या पथ्यावर पडला आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून या कर्जमाफीच्या आडून एफआरपी देण्याची घोषणा केली नाही. यात शेतकरी कर्जमाफी की एफआरपी अशा कचाट्यात सापडला आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSangliसांगली