शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
2
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेश महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
4
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
5
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
6
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
7
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल
8
४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
9
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
10
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
11
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
12
अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
13
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
14
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
15
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
16
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
17
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
18
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
19
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
20
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'

Sangli News: ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर पेटवले; सांगली जिल्ह्यात एकरकमी एफआरपीचे आंदोलन हिंसक वळणावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 09:38 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपी मिळावी अशी मागणी केली आहे. या मागणीला कोल्हापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र सांगली जिल्ह्यात राजारामबापू, क्रांती आणि विश्वास काहीच भूमिका घ्यायला तयार नाहीत.

सांगली : सांगली जिल्ह्यात एकरकमी एफआरपीचे आंदोलन हिंसक वळणावर पोहोचले आहे. गुरुवारी उशिरा रात्री ऊस वाहतूक करणारे राजारामबापू, क्रांती या साखर कारखान्यांचे ट्रॅक्टर पेटविण्यात आले, तर विश्वास कारखान्याच्या ट्रॅक्टर पेटविण्याचा प्रयत्न झाला यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

राजारामबापू कारखान्याचे सर्वेसर्वा जलसंपदा मंत्री जयंत पाटील आहेत. क्रांती कारखान्याचे आ. अरुण लाड तर विश्वास कारखान्याचे आ. मानसिंगराव नाईक अध्यक्ष आहेत. राजारामबापू कारखान्याचा ट्रॅक्टर वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथे पेटविण्यात आला तर क्रांती कारखान्याचा ट्रॅक्टर कडेगाव तालुक्यात बळवडी फाटा येथे गुरुवारी रात्री उशिरा पेटविण्यात आला. तसेच विश्वास कारखान्याचा ट्रॅक्टरही तांदुळवाडी येथेच  पेटविण्याचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपी मिळावी अशी मागणी केली आहे. या मागणीला कोल्हापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र सांगली जिल्ह्यात दत्त इंडिया आणि दालमिया या दोन कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली आहे. तर अन्य दोन कारखाने जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. मात्र राजारामबापू, क्रांती आणि विश्वास काहीच भूमिका घ्यायला तयार नाहीत. त्यामुळेच स्वाभिमानीचे कार्यकर्ते पेटून उठले आहेत. बुधवारी राजारामबापू कारखान्याच्या ३५ वाहनांची हवा सोडण्यात आली. यापूर्वी तासगाव तालुक्यात कुमठे फाटा, कडेगाव तालुक्यात रामापूर फाटा याठिकाणी वाहनाची हवा सोडून वाहतूक बंद पाडली आहे.

 याच प्रश्नावर  जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात दोनवेळा सर्व कारखान्यावर मोटारसायकल रॅली काढण्यात आली आहे, तरीही एकरकमी एफआरपी जाहीर होत नाही. त्यामुळे आंदोलन हिंसक वळणावर पोहचले आहे. आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे.याबाबत जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याला जे जमते, ते सांगली जिल्ह्यातील कारखानदारांना का जमत नाही? दोन्ही जिल्ह्यात किती अंतर आहे? त्या ठिकाणी सहकारी आणि खासगी अशा दोन्ही कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली तर सांगली जिल्ह्यात केवळ दोन खासगी कारखान्यांनी एकरकमी एफ आर पी जाहीर केली आहे. दत्त इंडिया आणि दालमिया हे दोन्ही कारखाने केवळ पाच वर्षे चालविले जात आहेत. सहकारातील २० ते २५ वर्षे सुरू असलेले कारखाने शेतकऱ्यांना लुटण्याचे काम करत आहेत. त्यामुळे आमचे कार्यकर्ते आणि शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यातूनच पेटवा पेटवी सुरू आहे. आमचे कार्यकर्ते नाइलाजाने हे करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचा अंत न बघता तात्काळ एक कमी एफ आर पी जाहीर करावी.

टॅग्स :Sangliसांगली