शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

टेंभू योजनेच्या चौथ्या टप्प्याची यशस्वी चाचणी : बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:33 IST

खानापूर तालुक्यातील दुष्काळी देवीखिंडी, लेंगरे परिसराला वरदान ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी टेंभू जलसिंचन योजनेच्या चौथ्या टप्प्याची चाचणी गुरूवारी यशस्वी झाली. चौथ्या टप्प्यातील विद्युत पंपाद्वारे कृष्णेचे पाणी कालव्यातून लेंगरे तलावाकडे प्रवास करू लागताच

ठळक मुद्देदुष्काळी लेंगरे परिसरात जल्लोष; शेतकरी, लोकप्रतिनिधींच्या लढ्याला अखेर यशगुरूवारी आ. बाबर व उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या उपस्थितीत चौथ्या टप्प्याची चाचणी घेण्यात आली.

विटा : खानापूर तालुक्यातील दुष्काळी देवीखिंडी, लेंगरे परिसराला वरदान ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी टेंभू जलसिंचन योजनेच्या चौथ्या टप्प्याची चाचणी गुरूवारी यशस्वी झाली. चौथ्या टप्प्यातील विद्युत पंपाद्वारे कृष्णेचे पाणी कालव्यातून लेंगरे तलावाकडे प्रवास करू लागताच शेतकºयांनी जल्लोष केला.

आमदार अनिल बाबर व जि. प. उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्यासह टेंभू अधिकाºयांच्या उपस्थितीत या चौथ्या टप्प्याची चाचणी यशस्वी झाल्याने दुष्काळी भागातील बळीराजा सुखावला आहे.

टेंभू योजनेच्या देवीखिंडी येथील चौथ्या टप्प्याचे काम अपवाद वगळता पूर्ण झाले आहे. घाणंद कालव्यातून भरण कालव्याद्वारे टेंभूचे पाणी देवीखिंडी येथील टप्पा क्र. ४ मध्ये सोडण्यात आले आहे. तेथून हे पाणी भूड येथील पाचव्या टप्प्यात जाणार आहे. यादरम्यान लेंगरे तलावात टेंभूचे पाणी सोडण्यात येणार आहे. त्यासाठी बुधवारी चौथ्या टप्प्यातील एक पंप सुरू करण्यात आला होता. परंतु, गळती असल्याने पंप बंद करून रात्री उशिरापर्यंत गळती काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले.

गुरूवारी आ. बाबर व उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या उपस्थितीत चौथ्या टप्प्याची चाचणी घेण्यात आली. ती पूर्णपणे यशस्वी झाली. त्यामुळे कृष्णामाईने लेंगरे तलावाच्या बाजूने प्रवास सुरू केला.रात्री उशिरा टेंभूचे पाणी लेंगरे तलावात दाखल होईल. टेंभूच्या चौथ्या टप्प्याची चाचणी यशस्वी झाल्याचे समजताच लेंगरे, जोंधळखिंडी, देवीखिंडी, भूड, वाळूज परिसरातील शेतकºयांनी कालव्यावर गर्दी करून जल्लोष केला.मुख्यमंत्र्यांच्याहस्ते लवकरच उद्घाटन...दुष्काळी भागात टेंभूचे पाणी आल्याने शेतकºयांच्या चेहºयावरचा आनंद हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. टेंभू योजनेच्या चौथ्या टप्प्याची चाचणी यशस्वी झाली आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते टेंभू योजनेच्या या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे आ. अनिल बाबर यावेळी बोलताना म्हणाले. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईDamधरणSangliसांगली