शेतकरी व कामगारांच्या सहकार्याने गळीत हंगाम यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:23 IST2021-04-19T04:23:51+5:302021-04-19T04:23:51+5:30
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सांगता समारंभात डॉ. सुरेश भासले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जितेद्र पाटील, सुर्यकांत दळवी, ...

शेतकरी व कामगारांच्या सहकार्याने गळीत हंगाम यशस्वी
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सांगता समारंभात डॉ. सुरेश भासले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जितेद्र पाटील, सुर्यकांत दळवी, संजय पाटील, दयाभाऊ पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरटे : कारखान्याने अनेक अडचणींचा सामना करत सलग सहा वर्षे उत्कृष्टरित्या गळीत हंगाम पार पाडला आहे. शेतकरी सभासद व कामगारांनी केलेल्या सहकार्यामुळेच कारखान्याने यशस्वी वाटचाल केल्याचे गौरवोद्गार अध्यक्ष डॉ. सुरेश भाेसले यांनी काढले.
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ च्या गळीत हंगाम सांगता समारंभात ते बोलत होते. प्रारंभी उपाध्यक्ष जगदीश जगताप व त्यांच्या पत्नी विद्या जगताप यांच्याहस्ते गळीत हंगाम समाप्तीनिमित्त श्री सत्यनारायण पूजा झाली. यावेळी संचालक जितेंद्र पाटील, दयानंद पाटील, संजय पाटील, ब्रिजराज मोहिते, गिरीश पाटील, सुजित मोरे, पांडुरंग होनमाने, दिलीपराव पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपाध्यक्ष जगदीश जगताप म्हणाले, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी चांगली पगारवाढ या संचालक मंडळाने दिली आहे. डॉ. सुरेश भाेसले यांनी शिस्त लावल्यामुळे कारखान्याच्या प्रगतीचा आलेख उंचावत राहिला आहे. कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी म्हणाले, कारखान्याने १५४ दिवसांमध्ये १२ लाख १५ हजार टन उसाचे गळीत केले असून, १४ लाख ७५ हजार क्विंटल साखर निर्मिती केली असून साखर उतारा १२.७५ टक्के राहिला आहे.
सचिव मुकेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. संचालक संजय पाटील यांनी आभार मानले. यावेळी प्रदीप पाटील, मनोज पाटील, प्रमोद पाटील, धनंजय पाटील, कामगार संघाचे अध्यक्ष एम. के. कापूरकर, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील उपस्थिती होते.