पारदर्शक कारभारामुळेच बँकेची यशस्वी वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:41 IST2021-02-23T04:41:23+5:302021-02-23T04:41:23+5:30
पलूस : वसंतरावजी पुदाले (दादा) यांनी सहकारातून सर्वसामान्य माणसांची आर्थिक उन्नती व पारदर्शक कारभार हा सहकारासाठी जो गुरुमंत्र ...

पारदर्शक कारभारामुळेच बँकेची यशस्वी वाटचाल
पलूस : वसंतरावजी पुदाले (दादा) यांनी सहकारातून सर्वसामान्य माणसांची आर्थिक उन्नती व पारदर्शक कारभार हा सहकारासाठी जो गुरुमंत्र दिला आहे, तो जोपासून वाटचाल सुरू आहे. सर्व सभासद व ग्राहक यांच्याशी बँकेचे आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध आहेत, असे प्रतिपादन पलूस सहकारी बँकेचे अध्यक्ष वैभव पुदाले यांनी पलूस येथे केले.
पलूस बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहाने व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, यावेळी वैभव पुदाले बोलत होते. यावेळी रमेश राजमाने, ए. डी. पाटील, पांडुरंग सूर्यवंशी, पांडुरंग मुळे, मानसिंग पाटील, अजित कुलकर्णी, विलास हजारे, आनंदराव पुदाले, काँग्रेस गटनेते सुहास पुदाले, नगरसेवक परशुराम शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल घारे, नारायण सगरे, प्रकाश डाके, चंद्रकांत गोंदिल आदी उपस्थित होते.
वैभव पुदाले म्हणाले, बँकेची १५ हजार ८८२ सभासद संख्या असून, २१ शाखांद्वारे सेवा दिली जात आहे. सहकार क्षेत्रात बिकट अवस्था झालेली आहे. स्पर्धा निर्माण झाली आहे. यातून मार्ग काढत बँकेची वाटचाल सुरू आहे. सहकार टिकला पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. सर्व सभासदांना विश्वासात घेऊनच बँकेच्या हिताचे निर्णय घेतले. कोअर बँकिंग प्रणालीद्वारे सेवा दिली जात आहे. बँकेचा एकूण व्यवसाय ६५३ कोटीपेक्षा अधिक झाला आहे. एकूण ठेवी ३९४ कोटीपेक्षा जास्त, तर कर्जे २५९ कोटीपेक्षापेक्षा जास्त आहेत. बँकेचा एन.पी.ए. १.७३ टक्के आहे. रिझर्व्ह बँकेने बँकेचे कामकाज, दर्जा याबाबतीत समाधान व्यक्त करून गौरवोद्गार काढले आहेत.
बँकेचे उपाध्यक्ष शामराव डाके यांनी प्रास्ताविक केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाजी पाटील, डी. ए. माने, एस. ए. पाटील, नामदेव गावडे, सदाशिव चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी वासंती मेरू, नितीन खारकांडे, महेश कुलकर्णी, विलास हजारे, प्रकाश कचरे, शरद शिंदे, बाळासाहेब पुदाले, प्रकाश पाटील, गणपती सूर्यवंशी, मार्तंड सदामते, रंगराव नलवडे, महिपती जाधव, बजरंग सूर्यवंशी, जगदीश मोहोळकर, कृष्णा इदाटे, लालासाहेब संकपाळ, शिवप्रसाद शिंदे, लक्ष्मी कदम, ज्योती शितापे आदी उपस्थित होते. मुकेश मुळे यांनी सूत्रसंचालन केले. विष्णू सिसाळ यांनी आभार मानले.