शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
4
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
5
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
6
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
7
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
8
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
9
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
10
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
11
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
12
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
13
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
15
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
16
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
17
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
18
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
19
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
20
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
Daily Top 2Weekly Top 5

खानापूर घाटमाथ्यावर दमदार पाऊस-अग्रणी नदीत पाणी : अनेक तलाव भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 20:30 IST

गेली आठ-दहा वर्षे कसलाच पाऊस नसल्याने खानापूर घाटमाथा दुष्काळाने अक्षरश: होरपळत होता. गेली चार वर्षे टॅँकरशिवाय पाणी मिळत नव्हते. पाणीटंचाईने शेती उद्ध्वस्त झाली होती. पिण्याच्या पाण्यासाठी आटापिटा करावा लागत होता. यामुळे सर्वांचे लक्ष टेंभू योजनेच्या पाचव्या टप्प्याकडे व पावसाकडे लागले होते.

ठळक मुद्देपावसामुळे खरीप हंगामाची दुर्दशा झाली आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने पिके कुजू लागली आहेत.

खानापूर : खानापूर घाटमाथ्यावर गेल्या महिन्यात दाखल झालेले टेंभूचे पाणी आणि गेल्या आठ-दहा दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे ओढे, नाल्याबरोबर अग्रणी नदी वाहती झाली आहे. कायम दुष्काळी असणाऱ्या खानापूर घाटमाथ्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. खानापूर पाझर तलाव तसेच सुलतानगादे साठवण तलाव तुडुंब भरून वाहू लागल्याने आगामी काळात पाणीटंचाई जाणविणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

गेली आठ-दहा वर्षे कसलाच पाऊस नसल्याने खानापूर घाटमाथा दुष्काळाने अक्षरश: होरपळत होता. गेली चार वर्षे टॅँकरशिवाय पाणी मिळत नव्हते. पाणीटंचाईने शेती उद्ध्वस्त झाली होती. पिण्याच्या पाण्यासाठी आटापिटा करावा लागत होता. यामुळे सर्वांचे लक्ष टेंभू योजनेच्या पाचव्या टप्प्याकडे व पावसाकडे लागले होते.

अखेरीस एप्रिलमध्ये टेंभूच्या पाचव्या टप्प्या कार्यान्वित झाला. बलवडीच्या वितरण विहिरीतून टेंभूचे पाणी अग्रणी नदी दाखल झाले आणि नदी वाहती झाली. गेल्या महिन्यात खानापूरच्या पाझर तलावात टेंभूचे पाणी आले. तलाव भरला आणि पापनाशी ओढ्यातून पाणी सुलतानगादे साठवण तलावात दाखल झाले. सुलतानगादे साठवण तलाव टेंभूच्या पाण्याने भरणार तेवढ्यात परतीच्या पावसाने दमदार स्वरूपात हजेरी लावली आणि तलाव तुडुंब भरून वाहू लागला.

गेले आठवडाभर परतीचा पाऊस दमदार स्वरूपात हजेरी लावत आहे. दररोज पडणाºया पावसामुळे घाटमाथ्यावरील ओढे, नाले, अग्रणी नदी वाहू लागली आहे. सर्व बंधारे, तलाव तुडुंब भरले आहेत. विहिरी व कूपनिलकांच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे. यामुळे आगामी रब्बी हंगाम चांगला होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. येत्या द्राक्ष हंगाम चांगला होण्याची अपेक्षा आहे. बागायतदार आॅक्टोबर छाटणीसाठी तयारी करत आहेत. पावसामुळे खरीप हंगामाची दुर्दशा झाली आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने पिके कुजू लागली आहेत. 

 

टॅग्स :Sangliसांगलीriverनदी