शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
7
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
8
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
9
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
10
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
11
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
12
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
13
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
14
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
15
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
19
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
20
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण

खानापूर घाटमाथ्यावर दमदार पाऊस-अग्रणी नदीत पाणी : अनेक तलाव भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 20:30 IST

गेली आठ-दहा वर्षे कसलाच पाऊस नसल्याने खानापूर घाटमाथा दुष्काळाने अक्षरश: होरपळत होता. गेली चार वर्षे टॅँकरशिवाय पाणी मिळत नव्हते. पाणीटंचाईने शेती उद्ध्वस्त झाली होती. पिण्याच्या पाण्यासाठी आटापिटा करावा लागत होता. यामुळे सर्वांचे लक्ष टेंभू योजनेच्या पाचव्या टप्प्याकडे व पावसाकडे लागले होते.

ठळक मुद्देपावसामुळे खरीप हंगामाची दुर्दशा झाली आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने पिके कुजू लागली आहेत.

खानापूर : खानापूर घाटमाथ्यावर गेल्या महिन्यात दाखल झालेले टेंभूचे पाणी आणि गेल्या आठ-दहा दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे ओढे, नाल्याबरोबर अग्रणी नदी वाहती झाली आहे. कायम दुष्काळी असणाऱ्या खानापूर घाटमाथ्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. खानापूर पाझर तलाव तसेच सुलतानगादे साठवण तलाव तुडुंब भरून वाहू लागल्याने आगामी काळात पाणीटंचाई जाणविणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

गेली आठ-दहा वर्षे कसलाच पाऊस नसल्याने खानापूर घाटमाथा दुष्काळाने अक्षरश: होरपळत होता. गेली चार वर्षे टॅँकरशिवाय पाणी मिळत नव्हते. पाणीटंचाईने शेती उद्ध्वस्त झाली होती. पिण्याच्या पाण्यासाठी आटापिटा करावा लागत होता. यामुळे सर्वांचे लक्ष टेंभू योजनेच्या पाचव्या टप्प्याकडे व पावसाकडे लागले होते.

अखेरीस एप्रिलमध्ये टेंभूच्या पाचव्या टप्प्या कार्यान्वित झाला. बलवडीच्या वितरण विहिरीतून टेंभूचे पाणी अग्रणी नदी दाखल झाले आणि नदी वाहती झाली. गेल्या महिन्यात खानापूरच्या पाझर तलावात टेंभूचे पाणी आले. तलाव भरला आणि पापनाशी ओढ्यातून पाणी सुलतानगादे साठवण तलावात दाखल झाले. सुलतानगादे साठवण तलाव टेंभूच्या पाण्याने भरणार तेवढ्यात परतीच्या पावसाने दमदार स्वरूपात हजेरी लावली आणि तलाव तुडुंब भरून वाहू लागला.

गेले आठवडाभर परतीचा पाऊस दमदार स्वरूपात हजेरी लावत आहे. दररोज पडणाºया पावसामुळे घाटमाथ्यावरील ओढे, नाले, अग्रणी नदी वाहू लागली आहे. सर्व बंधारे, तलाव तुडुंब भरले आहेत. विहिरी व कूपनिलकांच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे. यामुळे आगामी रब्बी हंगाम चांगला होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. येत्या द्राक्ष हंगाम चांगला होण्याची अपेक्षा आहे. बागायतदार आॅक्टोबर छाटणीसाठी तयारी करत आहेत. पावसामुळे खरीप हंगामाची दुर्दशा झाली आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने पिके कुजू लागली आहेत. 

 

टॅग्स :Sangliसांगलीriverनदी