शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
2
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
3
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
6
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
7
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
8
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
9
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
10
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
11
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
12
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
13
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
14
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
15
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
16
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
17
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
18
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
19
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
20
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

खानापूर घाटमाथ्यावर दमदार पाऊस-अग्रणी नदीत पाणी : अनेक तलाव भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 20:30 IST

गेली आठ-दहा वर्षे कसलाच पाऊस नसल्याने खानापूर घाटमाथा दुष्काळाने अक्षरश: होरपळत होता. गेली चार वर्षे टॅँकरशिवाय पाणी मिळत नव्हते. पाणीटंचाईने शेती उद्ध्वस्त झाली होती. पिण्याच्या पाण्यासाठी आटापिटा करावा लागत होता. यामुळे सर्वांचे लक्ष टेंभू योजनेच्या पाचव्या टप्प्याकडे व पावसाकडे लागले होते.

ठळक मुद्देपावसामुळे खरीप हंगामाची दुर्दशा झाली आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने पिके कुजू लागली आहेत.

खानापूर : खानापूर घाटमाथ्यावर गेल्या महिन्यात दाखल झालेले टेंभूचे पाणी आणि गेल्या आठ-दहा दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे ओढे, नाल्याबरोबर अग्रणी नदी वाहती झाली आहे. कायम दुष्काळी असणाऱ्या खानापूर घाटमाथ्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. खानापूर पाझर तलाव तसेच सुलतानगादे साठवण तलाव तुडुंब भरून वाहू लागल्याने आगामी काळात पाणीटंचाई जाणविणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

गेली आठ-दहा वर्षे कसलाच पाऊस नसल्याने खानापूर घाटमाथा दुष्काळाने अक्षरश: होरपळत होता. गेली चार वर्षे टॅँकरशिवाय पाणी मिळत नव्हते. पाणीटंचाईने शेती उद्ध्वस्त झाली होती. पिण्याच्या पाण्यासाठी आटापिटा करावा लागत होता. यामुळे सर्वांचे लक्ष टेंभू योजनेच्या पाचव्या टप्प्याकडे व पावसाकडे लागले होते.

अखेरीस एप्रिलमध्ये टेंभूच्या पाचव्या टप्प्या कार्यान्वित झाला. बलवडीच्या वितरण विहिरीतून टेंभूचे पाणी अग्रणी नदी दाखल झाले आणि नदी वाहती झाली. गेल्या महिन्यात खानापूरच्या पाझर तलावात टेंभूचे पाणी आले. तलाव भरला आणि पापनाशी ओढ्यातून पाणी सुलतानगादे साठवण तलावात दाखल झाले. सुलतानगादे साठवण तलाव टेंभूच्या पाण्याने भरणार तेवढ्यात परतीच्या पावसाने दमदार स्वरूपात हजेरी लावली आणि तलाव तुडुंब भरून वाहू लागला.

गेले आठवडाभर परतीचा पाऊस दमदार स्वरूपात हजेरी लावत आहे. दररोज पडणाºया पावसामुळे घाटमाथ्यावरील ओढे, नाले, अग्रणी नदी वाहू लागली आहे. सर्व बंधारे, तलाव तुडुंब भरले आहेत. विहिरी व कूपनिलकांच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे. यामुळे आगामी रब्बी हंगाम चांगला होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. येत्या द्राक्ष हंगाम चांगला होण्याची अपेक्षा आहे. बागायतदार आॅक्टोबर छाटणीसाठी तयारी करत आहेत. पावसामुळे खरीप हंगामाची दुर्दशा झाली आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने पिके कुजू लागली आहेत. 

 

टॅग्स :Sangliसांगलीriverनदी