शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

किसान सभेतर्फे येत्या बुधवारी अकोले ते लोणी राज्यस्तरीय पायी मोर्चा, मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास लढा तीव्र करणार

By अशोक डोंबाळे | Updated: April 24, 2023 18:08 IST

केंद्राच्या चुकीच्या धोरणाने दुग्ध व्यवसाय अडचणीत

सांगली : नैसर्गिक आपत्ती व राज्यात सुरू असलेल्या नीतिभ्रष्ट राजकारणाचा परिणाम म्हणून शेतकरी आणि श्रमिकांचे मूलभूत प्रश्न अत्यंत तीव्र झाले आहेत. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे विकासाचे प्रश्न बाजूला फेकले आहेत. पक्ष फोडण्याची राजकीय आमिषे व तुरुंगाच्या भीतीमुळे प्रस्थापित राजकीय नेते व पक्ष अडचणीत आहेत. जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नसल्यामुळे किसान सभेच्या पुढाकाराने दि. २६ एप्रिलपासून अकोले ते लोणी असा राज्यव्यापी पायी मोर्चा काढणार आहे, अशी माहिती किसान सभेचे राज्याध्यक्ष कॉ. उमेश देशमुख यांनी सांगलीत दिली.कॉ. देशमुख म्हणाले, किसान सभा, सीटू, बांधकाम कामगार फेडरेशन, अखिल गुरव समाज संघटना, शेतमजूर युनियन, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, एसएफआय या समविचारी संघटनांच्या सहभागाने मोर्चा काढणार आहे. दि. २६ ते २८ असे तीन दिवस पायी चालून, महसूल व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर धडकणार आहे.मोर्चातील मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मोर्चाचे रूपांतर लोणी येथे बेमुदत महामुक्काम आंदोलनात करून लढा तीव्र करणार आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. सरकारने या पिकांना नुकसानभरपाई देण्याच्या घोषणा केल्या. प्रत्यक्षात मदत केली नाही. वन जमिनी, देवस्थान, इनाम, वक्फ, गायरान व घरांच्या तळ जमिनी नावे करण्याची आश्वासने दिली आहेत. जमीन नावे करण्याऐवजी पोलिस व वन विभागाचा दुरुपयोग करत गरीब श्रमिकांना अमानुषपणे मारहाण करून घरे व जमिनींवरून हुसकावून काढण्याच्या मोहिमा सुरू केल्या आहेत. जबरदस्तीने व अत्यल्प मोबदला देत शेतकऱ्यांच्या जमिनी रस्ते, कॉरीडोर, विमानतळ व तथाकथित विकासकामांसाठी हडप केल्या जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.आंदोलनात डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, डॉ. अजित नवले, किसन गुजर, सुभाष चौधरी, चंद्रकांत घोरखाना, डॉ. उदय नारकर, सावळीराम पवार, सुनील मालुसरे आदींसह हजारो शेतकरी सहभागी असणार आहेत.केंद्राच्या चुकीच्या धोरणाने दुग्ध व्यवसाय अडचणीतकोरोना संकटात १७ रूपये लिटरप्रमाणे दूध विकावे लागल्याने हतबल झालेले दूध उत्पादक आता थोडे व्यवसायात पुन्हा उभे राहू लागले आहेत. तोपर्यंत पुन्हा एकदा केंद्र सरकारने दुग्धपदार्थ आयात करण्याच्या हालचाली सुरू करून दुग्ध उत्पादकांचे जिणे हैराण केले आहे, असा आरोपही उमेश देशमुख यांनी केला.

टॅग्स :SangliसांगलीKisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्च