शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

राज्य शासनाचे अधिकारी परप्रांतीय ठेकेदारांना सामील, मंत्री उदय सामंतांचा सरकारला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 13:56 IST

कामगार मंडळातही राजकारण सुरु आहे. कामगार कल्याण निधीचे १३ हजार कोटी रुपये या मंडळाकडे पडून आहेत. ते राज्य सरकारने कामगारांसाठी खर्च केले पाहिजेत.

सांगली : कामगार विभागातील अधिकारी हे परप्रांतीय ठेकेदारांना ताकद देत असल्याने स्थानिक कामगारांवर अन्याय होत आहे. शिवसेना म्हणून आम्ही हे खपवून घेणार नाही. प्रसंगी कामगारांच्या आंदोलन मी स्वत: उतरेन, असा इशारा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिला.कुपवाड येथील चाणक्य चौकात शिवसेनेच्यावतीने काल, रविवारी कामगार मेळावा पार पडला. यावेळी मंत्री सामंत बोलत होते. मेळाव्यास आमदार अनिल बाबर, जिल्हाप्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार, बजरंग पाटील, शंभोराज काटकर आदी उपस्थित होते.मंत्री सामंत यांनी भाषणातून राष्ट्रवादीकडे असलेल्या कामगार खात्याला घरचा आहेर दिला. ते म्हणाले की, कामगार खात्यातील अधिकारी हे कामगारांमध्ये आपसांत भांडणे लावतात. असे अधिकारी हे परप्रांतीय ठेकेदारांना मोठी ताकत देत असल्याचे दिसून आले आहे. मी कामगारमंत्री नसलो तरी शिवसेनेचा मंत्री म्हणून स्थानिकांवर अन्याय खपवून घेणार नाही. स्थानिकांच्या खच्चीकरणाची भूमिका ठेकेदारांनी घेतली आणि अधिकारी जर सामील असतील तर शिवसेना गप्प बसणार नाही.ते म्हणाले की, काही उपद्रवी लोकांचा उल्लेख याठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला, मात्र मी येथील पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की मी सिंधुदुर्गचा पालकमंत्री आहे. या गोष्टीत सर्व प्रश्नांची उत्तरे आली. काही लोकांचा उल्लेख करुन त्यांना मोठे करण्याची गरज नाही.

विद्यापीठ कामगारांसाठी लवकरच चांगला निर्णय

सामंत म्हणाले की, कामगार कायद्यानुसार कामगारांना जे कायदे लागू आहेत, ते सर्व कायदे यापुढे विद्यापीठातील सफाईकाम, माळी काम करणाऱ्या कामगारांना तसेच कंत्राटी कामगारांना लागू केले जातील. त्यामुळे त्यांना किमान वेतनही मिळणार आहे. येत्या १५ दिवसात हा निर्णय राज्यसरकार घेणार आहे.

१३ हजार कोटी खर्च करासामंत म्हणाले की, कामगार मंडळातही राजकारण सुरु आहे. कामगार कल्याण निधीचे १३ हजार कोटी रुपये या मंडळाकडे पडून आहेत. ते राज्य सरकारने कामगारांसाठी खर्च केले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांना सांगून आम्ही हा निधी खर्च करायला लावू. तसे झाले तर राज्यातील संपूर्ण कामगार वर्ग कायम उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहील.

पंचनामे का नाहीत?

सामंत म्हणाले की, भोसे येथील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांशी मी संवाद साधला. त्यावेळी त्यांच्या शेतीचे पंचनामे अद्याप झाले नसल्याचे कळाले. ही शोकांतिका आहे. अधिकाऱ्यांनी तत्परतेने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे.

टॅग्स :SangliसांगलीUday Samantउदय सामंतuniversityविद्यापीठ