शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

राज्य शासनाचे अधिकारी परप्रांतीय ठेकेदारांना सामील, मंत्री उदय सामंतांचा सरकारला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 13:56 IST

कामगार मंडळातही राजकारण सुरु आहे. कामगार कल्याण निधीचे १३ हजार कोटी रुपये या मंडळाकडे पडून आहेत. ते राज्य सरकारने कामगारांसाठी खर्च केले पाहिजेत.

सांगली : कामगार विभागातील अधिकारी हे परप्रांतीय ठेकेदारांना ताकद देत असल्याने स्थानिक कामगारांवर अन्याय होत आहे. शिवसेना म्हणून आम्ही हे खपवून घेणार नाही. प्रसंगी कामगारांच्या आंदोलन मी स्वत: उतरेन, असा इशारा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिला.कुपवाड येथील चाणक्य चौकात शिवसेनेच्यावतीने काल, रविवारी कामगार मेळावा पार पडला. यावेळी मंत्री सामंत बोलत होते. मेळाव्यास आमदार अनिल बाबर, जिल्हाप्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार, बजरंग पाटील, शंभोराज काटकर आदी उपस्थित होते.मंत्री सामंत यांनी भाषणातून राष्ट्रवादीकडे असलेल्या कामगार खात्याला घरचा आहेर दिला. ते म्हणाले की, कामगार खात्यातील अधिकारी हे कामगारांमध्ये आपसांत भांडणे लावतात. असे अधिकारी हे परप्रांतीय ठेकेदारांना मोठी ताकत देत असल्याचे दिसून आले आहे. मी कामगारमंत्री नसलो तरी शिवसेनेचा मंत्री म्हणून स्थानिकांवर अन्याय खपवून घेणार नाही. स्थानिकांच्या खच्चीकरणाची भूमिका ठेकेदारांनी घेतली आणि अधिकारी जर सामील असतील तर शिवसेना गप्प बसणार नाही.ते म्हणाले की, काही उपद्रवी लोकांचा उल्लेख याठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला, मात्र मी येथील पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की मी सिंधुदुर्गचा पालकमंत्री आहे. या गोष्टीत सर्व प्रश्नांची उत्तरे आली. काही लोकांचा उल्लेख करुन त्यांना मोठे करण्याची गरज नाही.

विद्यापीठ कामगारांसाठी लवकरच चांगला निर्णय

सामंत म्हणाले की, कामगार कायद्यानुसार कामगारांना जे कायदे लागू आहेत, ते सर्व कायदे यापुढे विद्यापीठातील सफाईकाम, माळी काम करणाऱ्या कामगारांना तसेच कंत्राटी कामगारांना लागू केले जातील. त्यामुळे त्यांना किमान वेतनही मिळणार आहे. येत्या १५ दिवसात हा निर्णय राज्यसरकार घेणार आहे.

१३ हजार कोटी खर्च करासामंत म्हणाले की, कामगार मंडळातही राजकारण सुरु आहे. कामगार कल्याण निधीचे १३ हजार कोटी रुपये या मंडळाकडे पडून आहेत. ते राज्य सरकारने कामगारांसाठी खर्च केले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांना सांगून आम्ही हा निधी खर्च करायला लावू. तसे झाले तर राज्यातील संपूर्ण कामगार वर्ग कायम उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहील.

पंचनामे का नाहीत?

सामंत म्हणाले की, भोसे येथील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांशी मी संवाद साधला. त्यावेळी त्यांच्या शेतीचे पंचनामे अद्याप झाले नसल्याचे कळाले. ही शोकांतिका आहे. अधिकाऱ्यांनी तत्परतेने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे.

टॅग्स :SangliसांगलीUday Samantउदय सामंतuniversityविद्यापीठ