शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांच्या विचारधारेपेक्षा स्थिर सरकार महत्त्वाचे -विश्वजित कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 10:00 IST

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून वीस दिवस झाले तरी, सरकार स्थापन होत नाही, ही दु:खाची गोष्ट आहे. ज्या पक्षाकडे सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत तयार होते, त्यांनी सरकार स्थापन करण्यास नकार देऊन राज्यावर वेगळी परिस्थिती आणली आहे.

सांगली : पक्षांच्या वेगवेगळ््या विचारधारा असणे हा तात्त्विक मुद्दा आहे. विचारधारा किंवा सरकार स्थापनेच्या मुद्द्यापेक्षा लोकहिताचा संयुक्तिक कार्यक्रम घेऊन स्थिर सरकार देणे महत्त्वाचे आहे, असे मत कॉँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. विश्वजित कदम यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच कदम सांगलीत आले होते. त्यांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्फूर्तीस्थळास अभिवादन केले. यावेळी ते म्हणाले की, भाजप विचारसरणी नसलेला पक्ष आहे. अनेक राज्यात स्वत: वेगवेगळया आघाड्या करायच्या, मात्र इतरांनी तशी कृती केली की टीका करायची, असे त्यांचे धोरण आहे. सध्या राष्ट्रवादी, कॉँग्रेस आणि इतर पक्षांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे लवकरच राज्यात स्थिर सरकार स्थापन होईल. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून वीस दिवस झाले तरी, सरकार स्थापन होत नाही, ही दु:खाची गोष्ट आहे. ज्या पक्षाकडे सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत तयार होते, त्यांनी सरकार स्थापन करण्यास नकार देऊन राज्यावर वेगळी परिस्थिती आणली आहे. अशा परिस्थितीत राज्याला स्थिर सरकार कसे देता येईल, यासाठी राष्ट्रवादी, कॉँग्रेसच्या नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे. येत्या काही दिवसात या प्रयत्नांना यश मिळेल.

भाजपने आजवर अनेक राज्यात अत्यंत कमी संख्येने आमदार निवडून आलेले असतानाही, वेगवेगळ््या मार्गाने सत्ता बळकावली आहे. विचारधारा हा तात्त्विक मुद्दा आहे. आता सरकार बनवणे हा मुद्दा महत्त्वाचा नाही. तर येणाऱ्या पाच वर्षात सरकार स्थिर राहणे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. राज्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न कसे सुटले जातील, हे पाहिले पाहिजे. विशेष करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे. शेतकरी मोठ्या संकटात आहे. दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे, महापुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मदत देणे, ही गरजेची बाब आहे. त्यासाठी कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांची चर्चा सुरू आहे. लवकरात लवकर महाराष्ट्रात स्थिर सरकार उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Governmentसरकारcongressकाँग्रेसSangliसांगली