शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

पक्षांच्या विचारधारेपेक्षा स्थिर सरकार महत्त्वाचे -विश्वजित कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 10:00 IST

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून वीस दिवस झाले तरी, सरकार स्थापन होत नाही, ही दु:खाची गोष्ट आहे. ज्या पक्षाकडे सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत तयार होते, त्यांनी सरकार स्थापन करण्यास नकार देऊन राज्यावर वेगळी परिस्थिती आणली आहे.

सांगली : पक्षांच्या वेगवेगळ््या विचारधारा असणे हा तात्त्विक मुद्दा आहे. विचारधारा किंवा सरकार स्थापनेच्या मुद्द्यापेक्षा लोकहिताचा संयुक्तिक कार्यक्रम घेऊन स्थिर सरकार देणे महत्त्वाचे आहे, असे मत कॉँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. विश्वजित कदम यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच कदम सांगलीत आले होते. त्यांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्फूर्तीस्थळास अभिवादन केले. यावेळी ते म्हणाले की, भाजप विचारसरणी नसलेला पक्ष आहे. अनेक राज्यात स्वत: वेगवेगळया आघाड्या करायच्या, मात्र इतरांनी तशी कृती केली की टीका करायची, असे त्यांचे धोरण आहे. सध्या राष्ट्रवादी, कॉँग्रेस आणि इतर पक्षांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे लवकरच राज्यात स्थिर सरकार स्थापन होईल. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून वीस दिवस झाले तरी, सरकार स्थापन होत नाही, ही दु:खाची गोष्ट आहे. ज्या पक्षाकडे सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत तयार होते, त्यांनी सरकार स्थापन करण्यास नकार देऊन राज्यावर वेगळी परिस्थिती आणली आहे. अशा परिस्थितीत राज्याला स्थिर सरकार कसे देता येईल, यासाठी राष्ट्रवादी, कॉँग्रेसच्या नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे. येत्या काही दिवसात या प्रयत्नांना यश मिळेल.

भाजपने आजवर अनेक राज्यात अत्यंत कमी संख्येने आमदार निवडून आलेले असतानाही, वेगवेगळ््या मार्गाने सत्ता बळकावली आहे. विचारधारा हा तात्त्विक मुद्दा आहे. आता सरकार बनवणे हा मुद्दा महत्त्वाचा नाही. तर येणाऱ्या पाच वर्षात सरकार स्थिर राहणे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. राज्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न कसे सुटले जातील, हे पाहिले पाहिजे. विशेष करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे. शेतकरी मोठ्या संकटात आहे. दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे, महापुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मदत देणे, ही गरजेची बाब आहे. त्यासाठी कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांची चर्चा सुरू आहे. लवकरात लवकर महाराष्ट्रात स्थिर सरकार उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Governmentसरकारcongressकाँग्रेसSangliसांगली