शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
2
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
3
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
4
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
5
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
6
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
7
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
8
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
9
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
10
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
11
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
12
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
13
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
14
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
15
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
16
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
17
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
18
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
19
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
20
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा

श्रीनगरला अडकलेले गलाई बांधव परतले--अजूनही ३० कुटुंबे श्रीनगरमध्ये...

By admin | Updated: September 16, 2014 23:51 IST

आसू आणि हसू : ८० जणांच्या कुटुंबियांत समाधान

विटा : नभातून कोसळणारा मुसळधार पाऊस... पुराच्या पाण्याची वाढलेली पातळी... घराच्या छताचा आधार... सभोवताली काळाकुट्ट अंधार... समोर दिसत असलेला मृत्यू... आणि नातेवाईकांचा तुटलेला धीर... असा थरार अनुभवत आणि मिळेल ते खाऊन आठ-दहा दिवस मृत्यूचा सामना करीत खानापूर, तासगाव, आटपाडी, खटाव आणि माण तालुक्यातील श्रीनगरच्या पुरात अडकलेले शेकडो मराठी गलाई बांधव आज, मंगळवारी सकाळी विटा येथे आपल्या मायभूमीत दाखल झाले. यावेळी या गलाई बांधवांसह त्यांच्या नातेवाईकांच्याही डोळ्यात आसू आणि चेहऱ्यावर हसू उमटले.खानापूर, आटपाडी, तासगाव, कडेगाव तालुक्यातील हजारो मराठी गलाई बांधव सोने-चांदी व्यवसायानिमित्त जम्मू-काश्मीरमध्ये स्थायिक झाले आहेत. तेथे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून झेलम नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात हे शेकडो गलाई बांधव अडकून पडले होते. गावाकडील नातेवाईकांचाही संपर्क तुटला होता. त्यामुळे नातेवाईक हवालदिल झाले होते. सांगलीचे निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे, विट्याचे प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सौ. अंजली मरोड यांनी विटा व सांगली येथे संपर्क कक्ष सुरू करून, श्रीनगर येथे पुरात अडकलेल्या मराठी गलाई बांधवांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले होते.त्या पार्श्वभूमीवर श्रीनगर प्रशासनाशी संपर्क साधून लाल चौक, महाराजा बझार, कुकर बझार, जैनाकधर आदी भागात पुराच्या पाण्यात अडकलेल्या गलाई बांधवांची यशस्वीरित्या सुटका केली. यावेळी कुर्ली येथील दिल्लीतील गलाई बांधव शहाजीराव पाटील, नेलकरंजीचे गुणवंत भोसले (चंडीगढ), ठाणे येथील हेमंत धनवडे आदींनी प्रयत्न करून पुरात अडकलेल्या गलाई बांधवांना सुखरूप बाहेर काढून त्यांना श्रीनगरहून विशेष विमानाने मुंबई येथे पाठविले.त्यानंतर ठाणे येथील हेमंत धनवडे यांनी स्वखर्चाने सुमारे ८० गलाई बांधव व त्यांच्या कुटुंबियांना खासगी बसने विट्याकडे पाठविले. आज सकाळी विटा येथे बस आल्यानंतर त्यांना पाहताच घोटीखुर्द, रेवणगाव, विसापूर, विटा, सुळेवाडी, ढवळेश्वर, कळंबी, आटपाडी, नेलकरंजी, पळशी, हिवरे या गावांतील नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला. नातेवाईक व गलाई बांधवांच्या डोळ्यात आसू व चेहऱ्यावर हसू दिसून आले. यावेळी विटा येथील सामाजिक कार्यकर्त्या सविता जाधव, हणमंत पाटील, आनंदराव पाटील, रत्नमाला पाटील, संगीता भोसले, वनिता जाधव, प्रवीण मोरे आदींनी गलाई बांधवांचे स्वागत केले. सांगली जिल्हा प्रशासनासह पुराच्या संकटात मदत करणाऱ्या विविध संघटना व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करताना गलाई बांधवांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. (वार्ताहर) सलग दोन ते तीन दिवस पाऊस पडल्याने झेलम नदीला पूर आला होता. नदीपासून अवघ्या ५० ते ७० मीटर अंतरावर लाल चौक आहे. चौथ्या दिवशी अचानक ढगफुटी झाली. त्यामुळे क्षणातच पाण्याचा लोट बाजारपेठेत घुसला. दुकानांची शटर बंद करण्यापूर्वीच पुराचे पाणी पहिल्या मजल्यापर्यंत आले. आम्ही तातडीने जिवाची पर्वा न करता कुटुंबियांसह तिसऱ्या मजल्यावर पोहोचलो. चार ते पाच दिवस आमच्या इमारतीचा दीड मजला पाण्याखाली होता. पाण्यात साहित्याचे मोठे नुकसान झाले. जवानांनी आम्हाला अन्नाची पाकिटे, पाणी, बे्रड पुरविले. ते खाऊन आम्ही सहा दिवस काढले. या सहा दिवसात अंगावर शहारे आणणारा महाप्रलय पाहिला. - धनाजी हसबे, गलाई व्यावसायिक, महाराजा बझार, श्रीनगरअजूनही ३० कुटुंबे श्रीनगरमध्ये...खानापूर, कडेगाव, आटपाडी, माण, खटाव, सांगोला तालुक्यातील एकूण ४० कुटुंबे श्रीनगरच्या लाल चौक, जैनाकधर परिसरात आहेत. नदीचा पूर ओसरल्यानंतर १० कुटुंबे आज, मंगळवारी विटा शहरात दाखल झाली आहेत. उर्वरित गलाई बांधवांची अजून ३० कुटुंबे श्रीनगरमध्ये आहेत. पुराचे पाणी कमी झाल्याने तेथील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले असल्याचे विट्यात दाखल झालेल्या गलाई बांधवांनी सांगितले.