‘अनमोल गोष्टी सांगा’ स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: December 24, 2015 00:50 IST2015-12-23T23:53:10+5:302015-12-24T00:50:07+5:30
‘लोकमत बाल विकास मंच’चे आयोजन : इस्लामपुरात तीन गटात १८८ स्पर्धकांचा सहभाग

‘अनमोल गोष्टी सांगा’ स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
इस्लामपूर : ‘लोकमत’ बालविकास मंच आणि स्वराज्य फौंडेशनच्यावतीने ‘अनमोल गोष्टी’ स्पर्धा उत्साहात झाल्या. तीन गटात झालेल्या या स्पर्धेत १८८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. कष्टाचे फळ, पर्यावरण, श्रध्दा, खरे बोल, वृक्षारोपण, पालकांवरील विश्वास अशा वेगवेगळ्या विषयांवर स्पर्धकांनी गोष्टी सांगितल्या.येथील यशवंत हायस्कूलमध्ये या स्पर्धा झाल्या. नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी स्वराज्यच्या अध्यक्षा संगीता शहा, मुख्याध्यापक डी. टी. पाटील, आर. पी. बल्लाळ, संदेश शहा, कविता शहा उपस्थित होते.झिंजाड म्हणाले, ‘लोकमत’ बालविकास मंचच्या या व्यासपीठामुळे गोष्टी सांगण्याच्या मुलांच्या जिव्हाळ्याच्या विषयाला प्रोत्साहन मिळत आहे. आजीच्या गोष्टींचा हा अनमोल ठेवा जपण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. या स्पर्धा पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी व सातवी ते नववी अशा तीन गटात झाल्या. स्पर्धकांनी दोन मिनिटांच्या अवधित तात्पर्यासह गोष्टी सांगून उपस्थितांना थक्क करुन सोडले. स्पर्धकांनी सर्व विषयांवरील गोष्टींचे सदारीकरण केले. माजी मुख्याध्यापक अण्णासाहेब यादव, डी. बी. पाटील, गौरी परमणे, रोमा पारेख यांनी परीक्षण केले.
स्पर्धेतील विजेत्यांना जय जिनेंद्र गु्रपचे राकेश कोठारी, नीलेश शहा, राहुल पारेख, भूषण शहा यांच्याहस्ते अनुक्रमे एक हजार, ५0१ व ३0१ रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नैना शहा, पल्लवी शहा, नेहा शहा यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
स्पर्धेतील गटनिहाय विजेते :
श्रावणी तोडकर (प्रथम), आर्यन मोरे (द्वितीय), प्रांजली पाटील (तृतीय). चौथी ते सहावी- श्रावणी जाधव (प्रथम), स्वप्नील केसरे (द्वितीय), सम्राज्ञी दळवी (तृतीय). सातवी ते नववी- अभिषेक पाटील (प्रथम), शर्वरी पाटील (द्वितीय) व अभिषेक रोकडे (तृतीय).