शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अध्यक्ष महोदय पहिल्या, दुसऱ्या टर्मच्या आमदारांना बोलू द्या, विश्वजित कदम यांनी वेधले सभागृहाचे लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 16:23 IST

रात्री १० वाजेपर्यंत बसण्याची तयारी

कडेगाव : पलूस-कडेगावचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात नव्या नगरपंचायत आणि नगरपालिकांना विकासासाठी भरघोस निधी द्या, अशी मागणी लावून धरली. यावेळी त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या टर्मच्या आमदारांना बोलू द्या, असे म्हणत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे लक्ष वेधले.डॉ. कदम म्हणाले, पलूस नगरपालिका आणि कडेगाव नगरपंचायत २०१६ मध्ये स्थापन झाल्या आहेत. नवीन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी राज्य सरकारकडून विकास निधी देण्याची तरतूद आहे. म्हणूनच, राज्य सरकारच्या माध्यमातून त्यासाठी भरीव विकास निधी द्यावा. तसेच, सांगली जिल्ह्यातील मॉडेल स्कूल माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यालाही वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा.सभागृहात बाेलत असताना अध्यक्ष महोदयांनी बेल वाजवली.

रात्री १० वाजेपर्यंत बसायची तयारी यावर विश्वजित कदम म्हणाले, माझी एवढीच विनंती आहे की काही आमदार तासभर बोलतात. ते ज्येष्ठ आहेत. त्यांना राज्यव्यापी विषय बोलायचे असतात. याबाबत आमचा आक्षेप नाही; परंतु पहिल्या व दुसऱ्या टर्मचे जे आमदार आहेत त्यांना त्यांच्या मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील विषय मांडायचे असतात. ते मांडण्याचा अधिकार त्यांना आहे. यामुळे या आमदारांना बोलण्याची संधी मिळाली पाहिजे. आमची रात्री १० वाजेपर्यंत बसायची तयारी आहे. संबंधित मंत्रीही उशिरापर्यंत बसतील. मात्र, नव्या आमदारांना बोलण्यासाठी वेळ द्यावा. असे म्हणत आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.यावेळी सागरेश्वर अभयारण्यातील हरीण, काळवीट, सांबर आदी वन्यप्राणी बाहेर पडून परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे अभयारण्याच्या कुंपणाचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची मागणी आमदार डॉ. कदम यांनी यावेळी केली.

टॅग्स :SangliसांगलीVishwajeet Kadamविश्वजीत कदमMLAआमदारMaharashtra Monsoon Sessionमहाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३