शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

अध्यक्ष महोदय पहिल्या, दुसऱ्या टर्मच्या आमदारांना बोलू द्या, विश्वजित कदम यांनी वेधले सभागृहाचे लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 16:23 IST

रात्री १० वाजेपर्यंत बसण्याची तयारी

कडेगाव : पलूस-कडेगावचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात नव्या नगरपंचायत आणि नगरपालिकांना विकासासाठी भरघोस निधी द्या, अशी मागणी लावून धरली. यावेळी त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या टर्मच्या आमदारांना बोलू द्या, असे म्हणत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे लक्ष वेधले.डॉ. कदम म्हणाले, पलूस नगरपालिका आणि कडेगाव नगरपंचायत २०१६ मध्ये स्थापन झाल्या आहेत. नवीन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी राज्य सरकारकडून विकास निधी देण्याची तरतूद आहे. म्हणूनच, राज्य सरकारच्या माध्यमातून त्यासाठी भरीव विकास निधी द्यावा. तसेच, सांगली जिल्ह्यातील मॉडेल स्कूल माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यालाही वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा.सभागृहात बाेलत असताना अध्यक्ष महोदयांनी बेल वाजवली.

रात्री १० वाजेपर्यंत बसायची तयारी यावर विश्वजित कदम म्हणाले, माझी एवढीच विनंती आहे की काही आमदार तासभर बोलतात. ते ज्येष्ठ आहेत. त्यांना राज्यव्यापी विषय बोलायचे असतात. याबाबत आमचा आक्षेप नाही; परंतु पहिल्या व दुसऱ्या टर्मचे जे आमदार आहेत त्यांना त्यांच्या मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील विषय मांडायचे असतात. ते मांडण्याचा अधिकार त्यांना आहे. यामुळे या आमदारांना बोलण्याची संधी मिळाली पाहिजे. आमची रात्री १० वाजेपर्यंत बसायची तयारी आहे. संबंधित मंत्रीही उशिरापर्यंत बसतील. मात्र, नव्या आमदारांना बोलण्यासाठी वेळ द्यावा. असे म्हणत आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.यावेळी सागरेश्वर अभयारण्यातील हरीण, काळवीट, सांबर आदी वन्यप्राणी बाहेर पडून परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे अभयारण्याच्या कुंपणाचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची मागणी आमदार डॉ. कदम यांनी यावेळी केली.

टॅग्स :SangliसांगलीVishwajeet Kadamविश्वजीत कदमMLAआमदारMaharashtra Monsoon Sessionमहाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३