शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्ष महोदय पहिल्या, दुसऱ्या टर्मच्या आमदारांना बोलू द्या, विश्वजित कदम यांनी वेधले सभागृहाचे लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 16:23 IST

रात्री १० वाजेपर्यंत बसण्याची तयारी

कडेगाव : पलूस-कडेगावचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात नव्या नगरपंचायत आणि नगरपालिकांना विकासासाठी भरघोस निधी द्या, अशी मागणी लावून धरली. यावेळी त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या टर्मच्या आमदारांना बोलू द्या, असे म्हणत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे लक्ष वेधले.डॉ. कदम म्हणाले, पलूस नगरपालिका आणि कडेगाव नगरपंचायत २०१६ मध्ये स्थापन झाल्या आहेत. नवीन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी राज्य सरकारकडून विकास निधी देण्याची तरतूद आहे. म्हणूनच, राज्य सरकारच्या माध्यमातून त्यासाठी भरीव विकास निधी द्यावा. तसेच, सांगली जिल्ह्यातील मॉडेल स्कूल माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यालाही वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा.सभागृहात बाेलत असताना अध्यक्ष महोदयांनी बेल वाजवली.

रात्री १० वाजेपर्यंत बसायची तयारी यावर विश्वजित कदम म्हणाले, माझी एवढीच विनंती आहे की काही आमदार तासभर बोलतात. ते ज्येष्ठ आहेत. त्यांना राज्यव्यापी विषय बोलायचे असतात. याबाबत आमचा आक्षेप नाही; परंतु पहिल्या व दुसऱ्या टर्मचे जे आमदार आहेत त्यांना त्यांच्या मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील विषय मांडायचे असतात. ते मांडण्याचा अधिकार त्यांना आहे. यामुळे या आमदारांना बोलण्याची संधी मिळाली पाहिजे. आमची रात्री १० वाजेपर्यंत बसायची तयारी आहे. संबंधित मंत्रीही उशिरापर्यंत बसतील. मात्र, नव्या आमदारांना बोलण्यासाठी वेळ द्यावा. असे म्हणत आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.यावेळी सागरेश्वर अभयारण्यातील हरीण, काळवीट, सांबर आदी वन्यप्राणी बाहेर पडून परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे अभयारण्याच्या कुंपणाचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची मागणी आमदार डॉ. कदम यांनी यावेळी केली.

टॅग्स :SangliसांगलीVishwajeet Kadamविश्वजीत कदमMLAआमदारMaharashtra Monsoon Sessionमहाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३