शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
4
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
5
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
6
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
7
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
8
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
9
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
10
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
11
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
12
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
14
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
15
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
16
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
17
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
18
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
19
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
20
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?

सुफियाचे सांगलीत स्वागत - : श्रीनगर ते कन्याकुमारीपर्यंत धाव; शांततेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 23:59 IST

केवळ शांततेचा संदेश देत श्रीनगर ते कन्याकुमारी असे ३ हजार ६५८ किलोमीटरचे अंतर धावत पार करण्याचा उपक्रम राजस्थानच्या सुफिया खानने सुरू केला आहे. मंगळवारी सांगलीत तिचे शहीद अशोक कामटे

ठळक मुद्दे अनोखा उपक्रम

सांगली : केवळ शांततेचा संदेश देत श्रीनगर ते कन्याकुमारी असे ३ हजार ६५८ किलोमीटरचे अंतर धावत पार करण्याचा उपक्रम राजस्थानच्या सुफिया खानने सुरू केला आहे. मंगळवारी सांगलीत तिचे शहीद अशोक कामटे स्मृती फाऊंडेशन व शहीद मॅरेथॉन रनरच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले.

जगात शांतता नांदावी म्हणून राजस्थान येथील सुफिया खान ही तरुणी श्रीनगर ते कन्याकुमारी असे ३ हजार ६५८ कि.मी.चे अंतर धावत प्रवास करीत आहे. तिने दोन महिन्यांपूर्वी श्रीनगर येथून धावण्यास सुरुवात केली आहे. तिच्याबरोबर हरियाणा येथील विकाससिंग सोबत आहेत. तब्बल ६२ दिवस सतत धावत तिने मंगळवारी पहाटे सांगली गाठली. वाठार (ता. कºहाड) येथे तिचे स्वागत करण्यात आले. या ग्रुपच्या १०० हून अधिक सदस्यांनी व सांगलीच्या सायकलस्नेही ग्रुपच्या सदस्यांनी तिच्याबरोबर वाठार ते कोल्हापूरपर्यंत असा प्रवास केला.

आपुलकीच्या स्वागताने सुफिया भारावून गेली. जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या अनेक महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या कार्याला पुढे नेताना आनंद वाटत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील संघटनांनी दिलेले हे प्रेम सोबत राहील, असे तिने सांगितले. तिच्या या प्रवासाची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डनेही दखल घेतली असून, या उपक्रमाची नोंद पुस्तकात होणार आहे. सांगली जिल्ह्यात कासेगाव, पेठ, नेर्र्ले, येडेनिपाणी, येलूर, कणेगाव येथे तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. तिच्या या प्रवासात डॉ. चंद्रशेखर हळिंगळे, श्रीकांत कुंभार, अक्रम मुजावर, देवीदास चव्हाण, गणपत पवार, संतोष जाधव, सुधीर भगत, प्रदीप सुतार, श्वेता चिखली, अमित कांबळे, डॉ. मनालाल अंबीकाटक आदी सहभागी झाले होते. कर्नाटक, तामिळनाडूमार्गे ती जाणार आहे. 

टॅग्स :SangliसांगलीIndiaभारत