शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

सोनसळकरांचा हातच ‘लय भारी’

By admin | Updated: August 17, 2015 00:13 IST

कवठेमहांकाळात राजकारण तापले: राष्ट्रवादीचे संस्थान खालसाची वेळ-कवठेमहांकाळचे कुरुक्षेत्र -३

अर्जुन कर्पे-  कवठेमहांकाळ  सांगली बाजार समितीच्या निवडणुकीत ‘महांकालीच्या कुरुक्षेत्रावर’ वाळव्याच्या वाघाच्या डरकाळीपेक्षा सोनसळच्या साहेबांचा ‘हातच लय भारी’ ठरला असून, त्या दुष्काळी पट्ट्यात राष्ट्रवादीचे संस्थान काबीज करण्यासाठी सोनसळच्या साहेबांनी जोरदार खालसा धोरण राबवण्याचा धडाका सुरू केला. मात्र खालसा धोरणामुळे याचा फटका राष्ट्रवादी व कॉँगेसच्या गटालाही बसला. असे असले तरी या निवडणुकीच्या माध्यमातून सोनसळच्या डॉ. पतंगराव कदम साहेबांचा जिल्ह्यातील साम्राज्य विस्तार वाढू लागला आहे, हे स्पष्ट झाले आहे. तर वाळव्याच्या वाघाचा कायमच वेगात असणारा अश्वरथ मात्र ऐन लढाईवेळी दुष्काळी कुरुक्षेत्रावर गटवारी, नाराजी अन् जिरवाजिरवीच्या राजकीय गाळात रुतला.बाजार समितीच्या निवडणुकीत भविष्यातील राजकारणाची अनेक बीजे पेरली गेली आणि ही बीजे पुढील राजकारणाची दिशा बदलणारी ठरणार आहेत, हे निश्चित.या निवडणुकीच्या माध्यमातून कवठेमहांकाळ, जत, मिरज या दुष्काळी टापूत साम्राज्य विस्ताराचे धोरण राष्ट्रवादीचे राज्यस्तरीय नेते जयंत पाटील, तर कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांनी राबवले. यामध्ये डॉ. पतंगराव कदम यांच्या राजकीय समीकरणाला यश आल्याने साहजीकच या दुष्काळी टापूत सोनसळच्या साहेबांचा राजकीय वारू सुसाट धावू लागला आहे.‘आबा’ हे माझे लहान बंधू आहेत, असे सांगत सोनसळच्या साहेबांनी थेट दुष्काळी टापूत ‘हात’ घतला. त्यामुळे या निवडणुकीत आबांनी सांभाळलेले काही मोहरे सोनसळच्या साहेबांच्या ‘हाताला’ लागले आहेत. यातील काही मोहऱ्यांनी या निवडणुकीत ‘राजकीय हात धुऊन’ही घेतले, तर काही नाराज मोहरेही साहेबांच्या या निवडणुकीच्या माध्यमातून संपर्कात आहेत. मुळात सोनसळच्या साहेबांनी एका निशाणात अनेक राजकीय उद्दिष्ट्ये साध्य केली आहेत. त्यांनी तालुक्यात राष्ट्रवादीला तर हादरा दिलाच, परंतु खोलवर राजकीय विचार करता गटा-तटाच्या राजकारणातही ते सर्वांनाच भारी पडले आहेत. कॉँग्रेसमध्येसुद्धा गटा-तटाच्या राजकारणाचा विचार करता, तालुक्यात सोनसळकरांचा राजकीय दबदबा वाढण्यास सुरुवात झाली आहे. वसंतदादा गट बॅकफुटवर!या निवडणुकीत प्रतीक पाटील व विशाल पाटील तालुक्यात कुठेच लोकांच्या चर्चेत दिसले नाहीत. त्यामुळे भविष्यातील जिल्ह्याच्या गटा-तटाच्या राजकारणात कवठेमहांकाळ तालुक्यात ‘दादा गटाला’ बॅकफुटवर यावे लागणार, हे स्पष्ट झाले आहे. कवठेमहांकाळ, जत, मिरज या तालुक्यात जयंतराव पाटील यांना मात्र ही निवडणूक ‘दगा’ देणारी ठरली आहे. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आजपर्यंत सात अश्वांचा धावणारा जयंत पाटील यांचा राजकीय रथ या निवडणुकीत पतंगरावांनी रोखला. एकूणच या निवडणुकीत वाळव्याच्या वाघाच्या डरकाळीला ‘सोनसळच्या साहेबांचा हातच’ लय भारी ठरला आहे.