शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
5
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
6
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
7
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
8
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
9
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
11
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
12
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
13
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
14
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
15
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
16
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
17
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
18
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
19
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
20
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी

सोनसळकरांचा हातच ‘लय भारी’

By admin | Updated: August 17, 2015 00:13 IST

कवठेमहांकाळात राजकारण तापले: राष्ट्रवादीचे संस्थान खालसाची वेळ-कवठेमहांकाळचे कुरुक्षेत्र -३

अर्जुन कर्पे-  कवठेमहांकाळ  सांगली बाजार समितीच्या निवडणुकीत ‘महांकालीच्या कुरुक्षेत्रावर’ वाळव्याच्या वाघाच्या डरकाळीपेक्षा सोनसळच्या साहेबांचा ‘हातच लय भारी’ ठरला असून, त्या दुष्काळी पट्ट्यात राष्ट्रवादीचे संस्थान काबीज करण्यासाठी सोनसळच्या साहेबांनी जोरदार खालसा धोरण राबवण्याचा धडाका सुरू केला. मात्र खालसा धोरणामुळे याचा फटका राष्ट्रवादी व कॉँगेसच्या गटालाही बसला. असे असले तरी या निवडणुकीच्या माध्यमातून सोनसळच्या डॉ. पतंगराव कदम साहेबांचा जिल्ह्यातील साम्राज्य विस्तार वाढू लागला आहे, हे स्पष्ट झाले आहे. तर वाळव्याच्या वाघाचा कायमच वेगात असणारा अश्वरथ मात्र ऐन लढाईवेळी दुष्काळी कुरुक्षेत्रावर गटवारी, नाराजी अन् जिरवाजिरवीच्या राजकीय गाळात रुतला.बाजार समितीच्या निवडणुकीत भविष्यातील राजकारणाची अनेक बीजे पेरली गेली आणि ही बीजे पुढील राजकारणाची दिशा बदलणारी ठरणार आहेत, हे निश्चित.या निवडणुकीच्या माध्यमातून कवठेमहांकाळ, जत, मिरज या दुष्काळी टापूत साम्राज्य विस्ताराचे धोरण राष्ट्रवादीचे राज्यस्तरीय नेते जयंत पाटील, तर कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांनी राबवले. यामध्ये डॉ. पतंगराव कदम यांच्या राजकीय समीकरणाला यश आल्याने साहजीकच या दुष्काळी टापूत सोनसळच्या साहेबांचा राजकीय वारू सुसाट धावू लागला आहे.‘आबा’ हे माझे लहान बंधू आहेत, असे सांगत सोनसळच्या साहेबांनी थेट दुष्काळी टापूत ‘हात’ घतला. त्यामुळे या निवडणुकीत आबांनी सांभाळलेले काही मोहरे सोनसळच्या साहेबांच्या ‘हाताला’ लागले आहेत. यातील काही मोहऱ्यांनी या निवडणुकीत ‘राजकीय हात धुऊन’ही घेतले, तर काही नाराज मोहरेही साहेबांच्या या निवडणुकीच्या माध्यमातून संपर्कात आहेत. मुळात सोनसळच्या साहेबांनी एका निशाणात अनेक राजकीय उद्दिष्ट्ये साध्य केली आहेत. त्यांनी तालुक्यात राष्ट्रवादीला तर हादरा दिलाच, परंतु खोलवर राजकीय विचार करता गटा-तटाच्या राजकारणातही ते सर्वांनाच भारी पडले आहेत. कॉँग्रेसमध्येसुद्धा गटा-तटाच्या राजकारणाचा विचार करता, तालुक्यात सोनसळकरांचा राजकीय दबदबा वाढण्यास सुरुवात झाली आहे. वसंतदादा गट बॅकफुटवर!या निवडणुकीत प्रतीक पाटील व विशाल पाटील तालुक्यात कुठेच लोकांच्या चर्चेत दिसले नाहीत. त्यामुळे भविष्यातील जिल्ह्याच्या गटा-तटाच्या राजकारणात कवठेमहांकाळ तालुक्यात ‘दादा गटाला’ बॅकफुटवर यावे लागणार, हे स्पष्ट झाले आहे. कवठेमहांकाळ, जत, मिरज या तालुक्यात जयंतराव पाटील यांना मात्र ही निवडणूक ‘दगा’ देणारी ठरली आहे. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आजपर्यंत सात अश्वांचा धावणारा जयंत पाटील यांचा राजकीय रथ या निवडणुकीत पतंगरावांनी रोखला. एकूणच या निवडणुकीत वाळव्याच्या वाघाच्या डरकाळीला ‘सोनसळच्या साहेबांचा हातच’ लय भारी ठरला आहे.