शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रत्नागिरी-नागपूर, गुहागर-विजापूर महामार्गांमुळे जिल्ह्यात वाळवंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 00:37 IST

वृक्षतोडीसाठी नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या वृक्ष समित्यांची परवानगी अपेक्षित आहे; पण त्यांना नियमाची माहितीही नसल्याचे आढळले आहे. तोडलेल्या प्रत्येक झाडासाठी नव्याने पाच झाडे लावण्याची अट आहे. त्यासाठी ठेकेदाराची अनामतही ठेवून घेतली आहे.

ठळक मुद्देपुनर्रोपण गेले खड्ड्यात; महामार्गासाठी ४७ हजार झाडांची कत्तल

संतोष भिसे ।सांगली : रत्नागिरी-नागपूर आणि गुहागर-विजापूर महामार्गांसाठी तब्बल ४५ हजारांहून अधिक झाडे तोडली जाणार आहेत. आतापर्यंत सुमारे वीस हजार झाडांची तोड केली आहे. त्यांचे पुनर्रोपण किंवा नव्याने वृक्षलागवडीकडे कोणाचेच लक्ष नाही. पर्यावरणप्रेमींमधूनही त्यावर आवाज उठविला जात नसल्याची स्थिती आहे.

रत्नागिरी-नागपूर महामार्गाचा (एनएच १६६) ६६ किलोमीटर भाग व गुहागर-विजापूर (१६६ ई अणि एनएच २६६) महामार्गाचा सुमारे १९0 किलोमीटर भाग सांगली जिल्ह्यातून जातो. रत्नागिरी-नागपूरची रुंदी ९0 फूट व गुहागर-विजापूर ४६ फूट रुंदीचा रस्ता आहे. त्यासाठी दुतर्फा हजारो झाडे तोडली जात आहेत. सार्वजनिक बांधकाम, वनविभाग, सामाजिक वनीकरण, स्थानिक नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या हद्दीतील झाडे नेस्तनाबूत केली जातील. त्याशिवाय खासगी श्ोतीतील झाडांची संख्याही मोठी आहे.

वृक्षतोडीसाठी नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या वृक्ष समित्यांची परवानगी अपेक्षित आहे; पण त्यांना नियमाची माहितीही नसल्याचे आढळले आहे. तोडलेल्या प्रत्येक झाडासाठी नव्याने पाच झाडे लावण्याची अट आहे. त्यासाठी ठेकेदाराची अनामतही ठेवून घेतली आहे. वृक्ष रुजल्यावर ती परत दिली जाईल; पण सद्य:स्थितीत ठेकेदारांनी कोठेही वृक्षारोपण सुरू केलेले नाही.

१००-२०० वर्षांपूर्वीची झाडेदोन्ही महामार्गांसाठी १७ हजार ७७९ झाडे तोडण्याची परवानगी वनविभागाकडे मागितली आहे. खासगी शेतीतील सुमारे ३० हजार झाडांसाठी कृषी विभागाकडे मूल्यांकनाची विनंती करण्यात आली आहे.

क-हाड, विटा, मिरज, नागज, पलूस, कडेगाव, आष्टा, तासगाव, भिवघाट, जत परिसरातील झाडे तोडली जातील. पैकी मिरज-पंढरपूर मार्गावर वेगाने वृक्षतोड सुरू आहे. बरीच झाडे १००-२०० वर्षांपूर्वीची तसेच संस्थानकाळातील आहेत. ती तोडल्याने अनेक ठिकाणच्या सुंदर कमानी नष्ट झाल्या आहेत. हा रस्ता उजाड बनू लागला आहे.

महामार्गाचे काम गतीने : सांगली जिल्ह्यात मिरज ते भोसेदरम्यान रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. महामार्गाच्या कामात अडथळा ठरणारी झाडे तोडल्याने अशा अनेक नैसर्गिक कमानी इतिहासजमा होत आहेत. दीड-दोनशे वर्षे जुनी वडाची झाडे तोडून त्यांचे ओंडके ठिकठिकाणी टाकले आहेत.

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्गnagpurनागपूरkonkanकोकणRatnagiriरत्नागिरी