शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

रत्नागिरी-नागपूर, गुहागर-विजापूर महामार्गांमुळे जिल्ह्यात वाळवंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 00:37 IST

वृक्षतोडीसाठी नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या वृक्ष समित्यांची परवानगी अपेक्षित आहे; पण त्यांना नियमाची माहितीही नसल्याचे आढळले आहे. तोडलेल्या प्रत्येक झाडासाठी नव्याने पाच झाडे लावण्याची अट आहे. त्यासाठी ठेकेदाराची अनामतही ठेवून घेतली आहे.

ठळक मुद्देपुनर्रोपण गेले खड्ड्यात; महामार्गासाठी ४७ हजार झाडांची कत्तल

संतोष भिसे ।सांगली : रत्नागिरी-नागपूर आणि गुहागर-विजापूर महामार्गांसाठी तब्बल ४५ हजारांहून अधिक झाडे तोडली जाणार आहेत. आतापर्यंत सुमारे वीस हजार झाडांची तोड केली आहे. त्यांचे पुनर्रोपण किंवा नव्याने वृक्षलागवडीकडे कोणाचेच लक्ष नाही. पर्यावरणप्रेमींमधूनही त्यावर आवाज उठविला जात नसल्याची स्थिती आहे.

रत्नागिरी-नागपूर महामार्गाचा (एनएच १६६) ६६ किलोमीटर भाग व गुहागर-विजापूर (१६६ ई अणि एनएच २६६) महामार्गाचा सुमारे १९0 किलोमीटर भाग सांगली जिल्ह्यातून जातो. रत्नागिरी-नागपूरची रुंदी ९0 फूट व गुहागर-विजापूर ४६ फूट रुंदीचा रस्ता आहे. त्यासाठी दुतर्फा हजारो झाडे तोडली जात आहेत. सार्वजनिक बांधकाम, वनविभाग, सामाजिक वनीकरण, स्थानिक नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या हद्दीतील झाडे नेस्तनाबूत केली जातील. त्याशिवाय खासगी श्ोतीतील झाडांची संख्याही मोठी आहे.

वृक्षतोडीसाठी नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या वृक्ष समित्यांची परवानगी अपेक्षित आहे; पण त्यांना नियमाची माहितीही नसल्याचे आढळले आहे. तोडलेल्या प्रत्येक झाडासाठी नव्याने पाच झाडे लावण्याची अट आहे. त्यासाठी ठेकेदाराची अनामतही ठेवून घेतली आहे. वृक्ष रुजल्यावर ती परत दिली जाईल; पण सद्य:स्थितीत ठेकेदारांनी कोठेही वृक्षारोपण सुरू केलेले नाही.

१००-२०० वर्षांपूर्वीची झाडेदोन्ही महामार्गांसाठी १७ हजार ७७९ झाडे तोडण्याची परवानगी वनविभागाकडे मागितली आहे. खासगी शेतीतील सुमारे ३० हजार झाडांसाठी कृषी विभागाकडे मूल्यांकनाची विनंती करण्यात आली आहे.

क-हाड, विटा, मिरज, नागज, पलूस, कडेगाव, आष्टा, तासगाव, भिवघाट, जत परिसरातील झाडे तोडली जातील. पैकी मिरज-पंढरपूर मार्गावर वेगाने वृक्षतोड सुरू आहे. बरीच झाडे १००-२०० वर्षांपूर्वीची तसेच संस्थानकाळातील आहेत. ती तोडल्याने अनेक ठिकाणच्या सुंदर कमानी नष्ट झाल्या आहेत. हा रस्ता उजाड बनू लागला आहे.

महामार्गाचे काम गतीने : सांगली जिल्ह्यात मिरज ते भोसेदरम्यान रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. महामार्गाच्या कामात अडथळा ठरणारी झाडे तोडल्याने अशा अनेक नैसर्गिक कमानी इतिहासजमा होत आहेत. दीड-दोनशे वर्षे जुनी वडाची झाडे तोडून त्यांचे ओंडके ठिकठिकाणी टाकले आहेत.

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्गnagpurनागपूरkonkanकोकणRatnagiriरत्नागिरी