शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
4
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
5
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
6
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
7
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
8
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
11
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
12
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
13
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
14
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
15
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
16
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
17
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
18
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
19
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
20
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला

सहा महिन्यांत ४२४ चोऱ्या

By admin | Updated: July 19, 2015 00:38 IST

लाखोंचा ऐवज लंपास : २७६ उघडकीस

सांगली : जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत दरोडा, वाटमारी, घरफोडी व चोरीचे ४२४ गुन्हे घडल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यात नोंद आहे. चोरट्यांनी लाखो रुपयांच्या ऐवजावर ‘डल्ला’ मारला आहे. यातील २७६ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. पोलिसांची संख्या अपुरी, वाहनांची कमतरता ही कारणे यामागे आहेत. महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारुन लंपास करणे, अंगावर घाण टाकून पैशाची बॅग पळविणे, पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलांचे दागिने लंपास करणे, बँकेतून रोकड काढून बाहेर पडलेल्या ग्राहकांना लुटणे, दागिने खरेदीच्या बहाण्याने हातोहात दागिने लंपास करणे अशाप्रकारे चोरट्यांची गुन्हा करण्याची पद्धत बदलत आहे. अनेकदा चोरीसाठी लहान मुलांचा वापर केला जात आहे. नवीन गुन्हेगार पोलिसांच्या रेकॉर्डवर नाहीत. चोरी झाली की अनेकदा जुन्या गुन्हेगारांवरच संशय व्यक्त केला जातो. त्यांच्याकडून काही माहिती मिळते का याची चाचपणी केली जाते. कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद तसेच कर्नाटक, बिहार व ओरिसा या राज्यातील गुन्हेगारांनी आता जिल्ह्यात शिरकाव केला आहे. गुन्हा केला की, ते निघून जातात. त्यांचा शोध घेणे आव्हान आहे. जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावे २५ ते ४० किलोमीटर अंतरावर आहेत. हद्दही मोठी आहे. रात्रीच्यावेळी गस्त घालण्यासाठी केवळ एक मोटार व चार ते पाच दुचाकी असतात. प्रत्येक गावात पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू असला तरी, ते गल्ली-बोळात जाऊ शकत नाहीत. काही भागात गस्त घालण्याची ठराविक वेळ असते. या वेळेनंतर चोर डाव साधून जातात. पोलीस चौकी व ठाण्याजवळील दुकाने फोडण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे. अनेकदा चोरी गेलेला माल जप्त करताना तारेवरची कसरत करावी लागते. तासगाव, विटा, आटपाडी परिसरात झालेल्या ‘बॅगलिफ्टिंग’च्या नऊ गुन्ह्यांचा चार महिन्यांपूर्वी छडा लावण्यात यश आले. हे गुन्हे करणारी टोळी ओरिसातील होती, पण शहरात घडलेल्या एका गुन्ह्याचा छडा लावता आला नाही. (प्रतिनिधी)