शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

नवाब मलिकांना शेती केव्हापासून कळू लागली, चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 13:19 IST

किराणा स्टोअर्स, माॅलमधील वाईन विक्रीविरोधात आम्ही राज्यभर रस्त्यावरची लढाई लढणार

सांगली : शेतकऱ्यांच्या धान्याची दारू करायची आणि त्यांच्याच पोरांना पाजायची, असा प्रकार महाविकास आघाडी सरकाने सुरू केला आहे. किराणा स्टोअर्स, माॅलमधील वाईन विक्रीविरोधात आम्ही राज्यभर रस्त्यावरची लढाई लढणार आहोत, शिवाय न्यायालयातही दाद मागू. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना केव्हापासून शेती कळू लागली, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत लगावला.

पाटील म्हणाले की, राज्यात काँग्रेसची इतके वर्षे सत्ता होती, पण इतका भीषण निर्णय कधीच घेतला नाही. तरुण पिढी बरबाद करण्याचा हा डाव आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळणार असल्याचा जावईशोध आघाडी सरकारने लावला आहे. शेतकऱ्यांच्या धान्याची दारू करायची आणि त्यांच्याच पोरांना पाजायची, असा प्रकार होईल. नवाब मलिकांनी वाईन विक्रीची घोषणा केली. त्यांना शेतीतील केव्हापासून कळू लागले. कुणाच्या इंटरेस्टमुळे हा निर्णय घेतला, असा सवालही त्यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयाने बारा आमदारांचे निलंबन घटनाबाह्य ठरवले. राज्यात घटना पायदळी तुडवली जात आहे. केवळ दारू विक्रीच नव्हे तर सरकार बरखास्त करण्यासाठी अनेक कारणे आहेत, असेही पाटील म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप कार्यकर्त्यांना मनोरुग्णांचे औषध पाठवले, त्यावर पाटील म्हणाले की, माणूस स्वत: मनोरुग्ण झाला की त्याला आपण कसले औषध पाठवतो, हे कळत नाही. त्यामुळे ते पटोले काहीही करत असतात.

शिवसेना - काँग्रेसला राष्ट्रवादी खाणार

राष्ट्रवादीने काँग्रेस व शिवसेनेचे अनेक नेते पळवले. मालेगावातील नगरसेवकांचा मोठा गट पक्षात घेतला. शिवसेना व काँग्रेसला हे सारे कळते आहे. फोडाफोडी करण्यात जयंत पाटील प्रसिद्ध आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना खाल्ल्याशिवाय राहणार नाही, असे भाकीतही पाटील यांनी केले.

टॅग्स :Sangliसांगलीnawab malikनवाब मलिकchandrakant patilचंद्रकांत पाटील