शहरं
Join us  
Trending Stories
1
महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
3
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
4
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
5
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
6
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
7
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
8
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
9
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
10
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
11
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
12
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
13
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
14
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
15
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
16
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
17
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
18
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
19
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
20
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: शेतकऱ्यांच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये का?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 17:12 IST

उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब..

इस्लामपूर : घरी बसून सरकार चालत नाही. राज्यातील महायुतीच्या डबल इंजिन सरकारने लोकाभिमुख कामे केली. शासन आपल्या दारी योजनेतून ४ कोटी ५० लाख जनतेपर्यंत विविध योजनांचे लाभ पोहचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये का, सोन्याचा चमचा घेऊन येणारच हवा का? असा सवाल मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.इस्लामपूर येथे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रम शुक्रवारी झाला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोेलते होते. पालकमंत्री सुरेश खाडे, उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार धैर्यशील माने, आमदार सुधीर गाडगीळ, सदाभाऊ खोत, माजीमंत्री अण्णासाहेब डांगे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार,भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडीक, सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, विक्रम पाटील, गौरव नायकवडी, समित कदम, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आले.शिंदे म्हणाले, आम्ही राज्यकर्त्यांच्या हिताचे नाही तर जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. फडणवीस आणि मी शपथ घेतल्यानंतर पहिला निर्णय दुष्काळी जनतेसाठी दुष्काळी भागात पाणी वळवण्याचा घेतला. आतापर्यंत १५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणाऱ्या १२० सिंचन प्रकल्पांचे निर्णय घेतले. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान लवकरच देणार आहे.पालकमंत्री सुरेश खाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलिसप्रमुख संदीप घुगे, महापालिका आयुक्त सुनील पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब..महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब लावले होते. मग, उद्योग वाढणार कसे? असा सवाल उपस्थित करीत शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत देशात केलेल्या कारभारवर एकही आरोप झालेला नाही. राज्यात उद्योग व गुंतवणूक वाढविण्यासाठी अनुकूल वातावरण महायुती सरकारच्या काळात करण्यात आम्हाला यश आले.

टॅग्स :SangliसांगलीEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्री