शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

Sangli: शेतकऱ्यांच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये का?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 17:12 IST

उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब..

इस्लामपूर : घरी बसून सरकार चालत नाही. राज्यातील महायुतीच्या डबल इंजिन सरकारने लोकाभिमुख कामे केली. शासन आपल्या दारी योजनेतून ४ कोटी ५० लाख जनतेपर्यंत विविध योजनांचे लाभ पोहचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये का, सोन्याचा चमचा घेऊन येणारच हवा का? असा सवाल मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.इस्लामपूर येथे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रम शुक्रवारी झाला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोेलते होते. पालकमंत्री सुरेश खाडे, उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार धैर्यशील माने, आमदार सुधीर गाडगीळ, सदाभाऊ खोत, माजीमंत्री अण्णासाहेब डांगे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार,भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडीक, सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, विक्रम पाटील, गौरव नायकवडी, समित कदम, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आले.शिंदे म्हणाले, आम्ही राज्यकर्त्यांच्या हिताचे नाही तर जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. फडणवीस आणि मी शपथ घेतल्यानंतर पहिला निर्णय दुष्काळी जनतेसाठी दुष्काळी भागात पाणी वळवण्याचा घेतला. आतापर्यंत १५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणाऱ्या १२० सिंचन प्रकल्पांचे निर्णय घेतले. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान लवकरच देणार आहे.पालकमंत्री सुरेश खाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलिसप्रमुख संदीप घुगे, महापालिका आयुक्त सुनील पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब..महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब लावले होते. मग, उद्योग वाढणार कसे? असा सवाल उपस्थित करीत शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत देशात केलेल्या कारभारवर एकही आरोप झालेला नाही. राज्यात उद्योग व गुंतवणूक वाढविण्यासाठी अनुकूल वातावरण महायुती सरकारच्या काळात करण्यात आम्हाला यश आले.

टॅग्स :SangliसांगलीEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्री