शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

Sangli: शेतकऱ्यांच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये का?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 17:12 IST

उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब..

इस्लामपूर : घरी बसून सरकार चालत नाही. राज्यातील महायुतीच्या डबल इंजिन सरकारने लोकाभिमुख कामे केली. शासन आपल्या दारी योजनेतून ४ कोटी ५० लाख जनतेपर्यंत विविध योजनांचे लाभ पोहचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये का, सोन्याचा चमचा घेऊन येणारच हवा का? असा सवाल मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.इस्लामपूर येथे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रम शुक्रवारी झाला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोेलते होते. पालकमंत्री सुरेश खाडे, उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार धैर्यशील माने, आमदार सुधीर गाडगीळ, सदाभाऊ खोत, माजीमंत्री अण्णासाहेब डांगे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार,भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडीक, सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, विक्रम पाटील, गौरव नायकवडी, समित कदम, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आले.शिंदे म्हणाले, आम्ही राज्यकर्त्यांच्या हिताचे नाही तर जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. फडणवीस आणि मी शपथ घेतल्यानंतर पहिला निर्णय दुष्काळी जनतेसाठी दुष्काळी भागात पाणी वळवण्याचा घेतला. आतापर्यंत १५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणाऱ्या १२० सिंचन प्रकल्पांचे निर्णय घेतले. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान लवकरच देणार आहे.पालकमंत्री सुरेश खाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलिसप्रमुख संदीप घुगे, महापालिका आयुक्त सुनील पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब..महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब लावले होते. मग, उद्योग वाढणार कसे? असा सवाल उपस्थित करीत शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत देशात केलेल्या कारभारवर एकही आरोप झालेला नाही. राज्यात उद्योग व गुंतवणूक वाढविण्यासाठी अनुकूल वातावरण महायुती सरकारच्या काळात करण्यात आम्हाला यश आले.

टॅग्स :SangliसांगलीEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्री