शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या रानात उभे राहून शिवसैनिक करणार नुकसानीचे पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 17:53 IST

farmar, rain, shivsena, sanglinews, गेल्या तीन दिवसात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्व शेतकऱ्यांना मदतीचे दिलासादायक आश्वासन दिले असून आता गावोगावच्या शिवसैनिकांनी आपापल्या परिसरातील शेतकऱ्यांचे पंचनामे रानात उभे राहून पूर्ण करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी केले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या रानात उभे राहून शिवसैनिक करणार नुकसानीचे पंचनामे संजय विभूते यांची माहिती : जिल्हाभर अभियान सुरु

सांगली : गेल्या तीन दिवसात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्व शेतकऱ्यांना मदतीचे दिलासादायक आश्वासन दिले असून आता गावोगावच्या शिवसैनिकांनी आपापल्या परिसरातील शेतकऱ्यांचे पंचनामे रानात उभे राहून पूर्ण करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी केले आहे.पत्रकात विभूते यांनी म्हटले आहे की, राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणारे उध्दव ठाकरे यांच्यासारखे प्रामाणिक नेतृत्व मुख्यमंत्रीपदी विराजमान आहे. यापूर्वीही त्यांनी शेतकऱ्यांना पिकविम्या द्वारे मदत मिळावी म्हणून तत्कालीन भाजप सरकारवर आणि कंपन्यांवर दबाव वाढवून शेतकऱ्यांचे हित साधले होते. ती कृती महाराष्ट्र विसरलेला नाही.

मुख्यमंत्र्यांनी आताही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन साथ देईल असे जाहीर केले आहे. मात्र लोकांचे नुकसान किती झाले याचा खरा अंदाज येण्यासाठी पंचनामे ही आवश्यक बाब आहे. यंत्रणा याकामी आपली जबाबदारी पार पाडत असली तरी शिवसेना हा सत्ताधारी पक्ष आहे आणि त्या पक्षाचा गावचा घटक म्हणून प्रत्येक शिवसैनिकांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. ८० टक्के समाजकारण हे शिवसेनेचे ब्रीद आहे. आपण त्याला जागून आपली जबाबदारी पार पाडीत राहूया.

सांगली जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यांचा आधार बनून त्यांचा भाऊ म्हणून शिवसैनिकांनी आपली जबाबदारी पार पाडावी तसेच आपल्या गावातील किती लोकांचे पंचनामे झाले, किती राहिले, किती दिवसात पूर्ण होणार याची माहिती आपल्याकडे ठेवावी.

यासाठी सहकार्य केले नाही अशा शासकीय कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत योग्य समज देण्याचे काम आपण करू. मात्र एकही शेतकऱ्याचा पंचनामा झाला नाही असे होऊ नये यासाठी सर्व शिवसैनिकांनी जागृकपणे कार्य करावे तसेच कोणाचा पंचनामा राहीला तरी काळजी न करता स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन संजय विभूते व आनंदराव पवार यांनी केले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली