शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

शेतकऱ्यांच्या रानात उभे राहून शिवसैनिक करणार नुकसानीचे पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 17:53 IST

farmar, rain, shivsena, sanglinews, गेल्या तीन दिवसात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्व शेतकऱ्यांना मदतीचे दिलासादायक आश्वासन दिले असून आता गावोगावच्या शिवसैनिकांनी आपापल्या परिसरातील शेतकऱ्यांचे पंचनामे रानात उभे राहून पूर्ण करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी केले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या रानात उभे राहून शिवसैनिक करणार नुकसानीचे पंचनामे संजय विभूते यांची माहिती : जिल्हाभर अभियान सुरु

सांगली : गेल्या तीन दिवसात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्व शेतकऱ्यांना मदतीचे दिलासादायक आश्वासन दिले असून आता गावोगावच्या शिवसैनिकांनी आपापल्या परिसरातील शेतकऱ्यांचे पंचनामे रानात उभे राहून पूर्ण करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी केले आहे.पत्रकात विभूते यांनी म्हटले आहे की, राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणारे उध्दव ठाकरे यांच्यासारखे प्रामाणिक नेतृत्व मुख्यमंत्रीपदी विराजमान आहे. यापूर्वीही त्यांनी शेतकऱ्यांना पिकविम्या द्वारे मदत मिळावी म्हणून तत्कालीन भाजप सरकारवर आणि कंपन्यांवर दबाव वाढवून शेतकऱ्यांचे हित साधले होते. ती कृती महाराष्ट्र विसरलेला नाही.

मुख्यमंत्र्यांनी आताही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन साथ देईल असे जाहीर केले आहे. मात्र लोकांचे नुकसान किती झाले याचा खरा अंदाज येण्यासाठी पंचनामे ही आवश्यक बाब आहे. यंत्रणा याकामी आपली जबाबदारी पार पाडत असली तरी शिवसेना हा सत्ताधारी पक्ष आहे आणि त्या पक्षाचा गावचा घटक म्हणून प्रत्येक शिवसैनिकांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. ८० टक्के समाजकारण हे शिवसेनेचे ब्रीद आहे. आपण त्याला जागून आपली जबाबदारी पार पाडीत राहूया.

सांगली जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यांचा आधार बनून त्यांचा भाऊ म्हणून शिवसैनिकांनी आपली जबाबदारी पार पाडावी तसेच आपल्या गावातील किती लोकांचे पंचनामे झाले, किती राहिले, किती दिवसात पूर्ण होणार याची माहिती आपल्याकडे ठेवावी.

यासाठी सहकार्य केले नाही अशा शासकीय कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत योग्य समज देण्याचे काम आपण करू. मात्र एकही शेतकऱ्याचा पंचनामा झाला नाही असे होऊ नये यासाठी सर्व शिवसैनिकांनी जागृकपणे कार्य करावे तसेच कोणाचा पंचनामा राहीला तरी काळजी न करता स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन संजय विभूते व आनंदराव पवार यांनी केले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली