शिवसैनिकांनी रस्ते कामातील घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:25 IST2021-02-14T04:25:31+5:302021-02-14T04:25:31+5:30
इस्लामपूर : कोल्हापूर जिल्ह्यातील टोप ते सांगली जिल्ह्यातील दिघंची-आटपाडी पर्यंत सुरू असलेल्या राज्य जोडमार्ग कामातील रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाबसांगतील त्या ...

शिवसैनिकांनी रस्ते कामातील घोटाळा
इस्लामपूर : कोल्हापूर जिल्ह्यातील टोप ते सांगली जिल्ह्यातील दिघंची-आटपाडी पर्यंत सुरू असलेल्या राज्य जोडमार्ग कामातील रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाबसांगतील त्या ठिकाणी रस्त्यावर खुदाई करून त्याची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. बागणी, काकाचीवाडी, आष्टा रोड या ठिकाणी खुदाई करत असताना तेथे मोठ्या खडीचे अस्तरीकरण गायब असल्याचे दिसून आले. यातूक सेनेचे जिल्हाप्रमुख घनश्याम जाधव,भूषणभास्कर महेश पाटील,बाजीराव पाटील, शिवसेनेचे अभियंता, राकेश आटुगडे, रामचंद्र गारे आनंदा सावंत,संजय चव्हाण, युवा सेनेचे विनायक गोंदील,सुनिल पवार,सागर मलगुंडे,महेश पाटील व शिवसैनिकानी घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.
प्रतिसाद नाही..!
शिवसेनेच्या या आंदोलनानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे हे रस्ते काम सदोष असल्याच्या शिवसैनिकांच्या आरोपाला पुष्टीच मिळाली.
सहा महिन्यात चाळण..!
टोपपासून आटपाडीपर्यंतच्या या रस्ते कामासाठी १५ वर्षांची गॅरंटी ठेकेदाराकडून घेण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष रस्ता खोदल्यावर त्यातील ढिसाळ काम समोर आले. मुरमीकरण, खडीकरण आणि त्यावर ४ आणि ३ इंचाचे सिलकोट अशा पद्धतीने हा रस्ता होणार होता. मात्र मुरुमीकरणावर कुठे कमी जाडीचे तर कुठे खडीकरणच नाही अशा प्रकारे हे काम सुरू होते. त्यामुळे सहा महिन्यातच या रस्त्याची चाळण झाल्याचा आरोप शिवसैनिकांचा होता. यातून ठेकेदार,अधिकारी यांची मोठी साखळी असल्याचे समोर आले. त्यामुळे १५ वर्षांची गॅरंटी कुठे गेली?हा मोठा प्रश्न आहे.
फोटो : १३ इस्लामपुर १