शेरीनाला धुळगाव योजनाच्या जलवाहिनीला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:22 IST2021-01-04T04:22:44+5:302021-01-04T04:22:44+5:30
संजयनगर : सांगलीतून धुळगावकडे (ता. मिरज) जाणाऱ्या शहरी नाल्याच्या जलवाहिनीला जुना बुधगाव मार्गावरील गायत्रीनगर येथे आठ दिवसांपासून गळती ...

शेरीनाला धुळगाव योजनाच्या जलवाहिनीला गळती
संजयनगर : सांगलीतून धुळगावकडे (ता. मिरज) जाणाऱ्या शहरी नाल्याच्या जलवाहिनीला जुना बुधगाव मार्गावरील गायत्रीनगर येथे आठ दिवसांपासून गळती लागली आहे. हे पाणी येथील नागरिकांच्या घरात व मोकळ्या जागेत शिरले आहे. साठलेल्या या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे महानगरपालिका व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.
येथील अशोक पाटील यांच्या दारात सांडपाणी साठले आहे; काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. मोकळ्या जागेतही पाणी साचले आहे. याबाबत नागरिकांनी नगरसेवकांकडे पाठपुरावा केला; परंतु सांडपाण्याचा निचरा झाला नाही. अधिकारी आमचे ऐकत नसल्याचे कारण नगरसेवक देत आहेत.
नगरसेवक व महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी साठलेल्या सांडपाण्याचा निचरा करावा, अशी मागणी होत आहे.
फोटो-०३दुपटे१
फोटो ओळ : सांगली येथील गायत्रीनगरमध्ये शहरी नाल्याच्या जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात सांडपाणी साठले आहे. छाया : सुरेंद्र दुपटे