शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

'पवार आणि त्यांच्या पाळीव शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांचे हक्क हिरावून घेणारा कायदा आणला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 13:10 IST

केंद्र आणि राज्य सरकार शेतकरीविरोधी आहे. शेतकऱ्यांचे वाटोळे करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. त्यामुळे केंद्र, राज्यातील सरकारला सळो की पळो करा.

इस्लामपूर : केंद्र आणि राज्य सरकार शेतकरीविरोधी आहे. शेतकऱ्यांचे वाटोळे करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. शरद पवार आणि त्यांच्या पाळीव शेतकरी संघटनांनी २००९मध्ये एसएमपीचा कायदा रद्द करून शेतकऱ्यांचे हक्क हिरावून घेणारा एफआरपीचा कायदा आणला. शेतकऱ्याला दर मागण्यासाठी कोणत्याही तरतुदी ठेवल्या नाहीत. त्यामुळे केंद्र, राज्यातील सरकारला सळो की पळो करा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले.

येथील निर्मला सांस्कृतिक भवनमध्ये राज्यव्यापी शेतकरी मेळावा झाला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष ॲड. अजित काळे, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष वर्षा काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी स्वागत केले.

पाटील म्हणाले, शेती क्षेत्राला खुल्या अर्थव्यवस्थेचे वारे लागल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. सर्व शेतीमालावरील निर्यातबंदी उठली पाहिजे. दोन कारखान्यांमधील अंतराची अट रद्द झाली पाहिजे. या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला गावात फिरकू दिले जाणार नाही.

धनंजय काकडे म्हणाले, कारखान्यांच्या माध्यमातून राजकारणी दलाल झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी शेतकऱ्यांचे कधीही भले केले नाही.

ऊस नियंत्रण समितीचे सदस्य बाळासाहेब पठारे म्हणाले, मूठभर लोकांच्या हाती कारखानदारी आहे, तोपर्यंत शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही. महाराष्ट्रात राजकारण्यांनी सहकारी कारखानदारी मोडीत काढून खासगी कारखानदारी ताब्यात घेतली आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीSharad Pawarशरद पवार