सात लाख मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:28 IST2021-09-21T04:28:58+5:302021-09-21T04:28:58+5:30
डॉ. पाटील पुढे म्हणाले की, दि. १ ते १९ वर्षे वयोगटातील किमान २८ टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमीदोष हा ...

सात लाख मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप होणार
डॉ. पाटील पुढे म्हणाले की, दि. १ ते १९ वर्षे वयोगटातील किमान २८ टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतापासून होतो. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण आहेच. बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटण्याचे कारण ठरते. ही बाब लक्षात घेऊन सर्व शालेय विद्यार्थी (शाळाबाह्य) यांना शाळा व अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे हा राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाच लाख चार हजार ४५५, नगरपालिका क्षेत्रात ६४ हजार ४२१, महापालिका क्षेत्रात एक लाख २१ हजार ५७८ असे एकूण ६ लाख ९० हजार ४५४ मुलांची संख्या आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा, तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षक व सेविका, साधन शिक्षक, आशा वर्कर्स यांचे प्रशिक्षण घेतले आहे. मोहीम अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे.