शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: सर्व्हर डाऊनमुळे सेतू कार्यालयाचे कामकाज ठप्प; विद्यार्थी, पालकांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 14:31 IST

पंधरा दिवस फेऱ्या मारून नागरिकांना दाखले मिळेनात

सांगली : सेतू कार्यालयातील ऑनलाइन सेवा काही तांत्रिक अडचणींमुळे ठप्प झाली आहे. ज्यामुळे अनेक शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. महा-आयटी विभागाकडून (महा-आयटी विभाग) सॉफ्टवेअर अपग्रेडचे काम सुरू आहे. ज्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नागरिक आपल्या कामांसाठी सेतू कार्यालयात जात आहेत. परंतु त्यांना ऑनलाइन सेवा मिळत नसल्यामुळे तासनतास वाट पाहावी लागत आहे.राज्य सरकारच्या महा-आयटी विभागामार्फत सेतू, महा-ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून शासकीय जात पडताळणी दाखले प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, नागरिकत्व प्रमाणपत्र तसेच अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन देण्यात येतात. गेल्या आठ दिवसांपासून महा ऑनलाइनच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने जिल्ह्यातील सर्व केंद्रांवरील कामकाज तांत्रिक कारणास्तव ठप्प झाले. त्यामुळे इतर कामकाजासाठीदेखील या केंद्रांवर रांगा लावल्याचे दिसून येत आहेत.अनेक केंद्रांत बिघाड असल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. ज्यांनी अगोदरच दाखल्यांसाठी ऑनलाइन अर्ज केला आहे, ते दाखलेही स्वाक्षरीविना प्रलंबित आहेत. सर्व्हर डाऊन असल्यामुळे अधिकाऱ्यांना लॉगइन करता येत नाही. त्यामुळे दाखलाच ओपन होत नसल्याने थंब देणार तरी कसा, असा सवाल अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

आठ दिवसांपासून तक्रारीमहा-आयटीच्या एकाच सर्व्हरमध्ये राज्यातील सर्व संकलित माहिती (डाटा) साठविण्यात येतो. मात्र, यामध्ये तांत्रिक बिघाड असल्याने सर्व्हर बंद पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश केंद्रांची कामे थांबली आहेत. राज्य सरकारच्या महा-आयटी विभागामार्फत महा-ई-सेवा आणि सेतू केंद्रांच्या माध्यमातून प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, नागरिकत्व प्रमाणपत्र तसेच अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन देण्यात येतात. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून या सेवा केंद्रांच्या सर्व्हरला तांत्रिक अडचणी येत आहेत.

विद्यार्थी, पालकांचे हालदाखले मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश, परीक्षांचे अर्ज आणि इतर शैक्षणिक प्रक्रियांना सामोरे जाताना अडथळे येत आहेत. विविध प्रकारचे दाखले मिळण्यासाठी सेतू कार्यालयात सध्या प्रचंड गर्दी दिसत आहे. परंतु तांत्रिक अडचणींमुळे कामकाज ठप्प झाले आहे. अनेक विद्यार्थी आणि पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘आमच्या मुलांचे भविष्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे अंधारले आहे,’ अशा प्रतिक्रिया पालक व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीStudentविद्यार्थी