शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

सत्तेसाठी भाजप नेत्यांचे स्वार्थी राजकारण; जनतेकडूनच खिल्ली : पृथ्वीराज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 7:29 PM

मोठ्या प्रमाणात गर्दी असणाऱ्या मुंबईतही तात्काळ उपाययोजना सुरू केल्या. कोणत्याही राज्यात झाल्या नाहीत इतक्या गतीने मोठ्या प्रमाणात कोरोना टेस्ट केल्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, गृहमंत्री, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे सर्व मंत्री व आमदार खासदार पदाधिकारी जनतेत उतरून काम करीत आहेत.

ठळक मुद्देजनतेने फिरवली पाठ - भाजपच्या आंदोलनाची जनतेकडूनच खिल्ली

सांगली : कोरोनाच्या महाभयंकर संकटातही केवळ स्वार्थी राजकारण करीत आंदोलनाचे आवाहन करीत महाराष्ट्राबद्दल उसनं प्रेम दाखवत आंदोलनाचे नाटक करणारी भाजप उघडी पडली असून सामान्य जनता महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारबरोबर असल्याचे स्पष्ट झाले आहे. सामान्य जनतेने भाजपच्या आंदोलनाकडे पूर्णपणे पाठ फिरवली असून सोशल मिडियावर तर या आंदोलनाची जोरदार खिल्ली उडवण्यात आली आहे, असा टोला काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना लगावला. 

 

ते म्हणाले की, भाजप नेते हे सत्तेविना तडफडत आहेत. वास्तविक कोरोनाबाबत सर्वाधिक गतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रकीया राबवली आहे. कोरोनाचे गांभीर्य ओळखून पंतप्रधानांनी जाहीर करण्यापूर्वीच लाॅकडाऊनचा मार्ग स्विकारला आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी असणाऱ्या मुंबईतही तात्काळ उपाययोजना सुरू केल्या. कोणत्याही राज्यात झाल्या नाहीत इतक्या गतीने मोठ्या प्रमाणात कोरोना टेस्ट केल्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, गृहमंत्री, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे सर्व मंत्री व आमदार खासदार पदाधिकारी जनतेत उतरून काम करीत आहेत. केवळ कामाचे प्रदर्शन न करता परिणामाकारक काम केले जात आहे. जनताही त्यावर समाधानी आहे. वास्तविक या संकटाने सारं जग अडचणीत आले आहे, अशावेळी महाराष्ट्रही त्याला बळी पडत आहे. मात्र महाआघाडी सरकार व प्रशासनाच्या अचूक नियोजन व कामामुळे बरीच हानी टाळता आली आहे.

इतक्या मोठ्या संकटात सरकार विरोधात कांगावा करीत बसण्यापेक्षा सरकारसोबत चर्चा करून प्रश्न कसे सोडवता येतील, काय करावे लागेल यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. मात्र भाजपला ते करायचेच नाही. प्रश्न अधिक कसे तयार होतील व आपल्याला त्यावर राजकीय पोळी कशी भाजता येईल याचाच प्रयत्न भाजप करीत आहे.

भाजपच्या या राजकीय खेळीला जनतेने ओळखले आहे. त्यामुळेच मोजके कार्यकर्ते व पदाधिकारी वगळता सामान्य जनतेने याकडे पाहिलेसुद्धा नाही. सोशल मिडियावरही या भाजप आंदोलनास खडे बोल सुनावले आहेत. एकुणच जनतेनेच हे आंदोलन बेदखल केले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcongressकाँग्रेस