शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Sangli: ताकारी योजनेचे रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन सुरू, १८ हजार हेक्टर लाभक्षेत्राला दिलासा 

By हणमंत पाटील | Updated: January 23, 2024 13:22 IST

प्रताप महाडिक कडेगाव : ताकारी योजनेचे यावर्षीचे तिसरे व रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन सोमवारी रात्री सुरू झाले. या योजनेच्या ...

प्रताप महाडिककडेगाव : ताकारी योजनेचे यावर्षीचे तिसरे व रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन सोमवारी रात्री सुरू झाले. या योजनेच्या १८ हजार हेक्टर लाभक्षेत्राला दिलासा मिळाला आहे. आवर्तन सुरू झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. ताकारी योजनेचे यावर्षीचे पहिले आवर्तन खरीप हंगामात दिले होते.रब्बी हंगामातील पहिले व यावर्षीचे दुसरे आवर्तन ५ नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आले होते. ते आवर्तन सुरू झाल्यानंतर अनेक वेळा तांत्रिक बिघाड व अवकाळी पावसामुळे योजना बंद ठेवावी लागली. त्यामुळे ३५ दिवस चालणारे आवर्तन तब्बल ५० दिवस चालवावे लागले. या कालावधीत कृष्णा नदीतून एक पॉइंट एक टीएमसी पाणी उचलण्यात आले. या माध्यमातून ताकारी योजनेच्या सर्व लाभक्षेत्राला पुरेसे पाणी उपलब्ध झाले.

मिरज तालुक्यातील सोनीपर्यंत १४४ किलोमीटरपर्यंतच्या सर्व लाभक्षेत्राला पाणी दिल्यानंतर ते आवर्तन बंद केले होते. ताकारी योजनेच्या वाट्याचे यावर्षीचे ३.६ टीएमसी पाणी उचलणे बाकी आहे. आता चालू आवर्तन ३० ते ३५ दिवस देण्याचे नियोजन आहे, असे ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी सांगितले.सक्षमपणे योजना आणि समृद्ध शेतीताकारी उपसा सिंचन सक्षमपणे कार्यरत असून, या योजनेचे आवर्तनही विहीत वेळेत मिळत आहे. योजनेची पाणीपट्टी आकारणी व वसुली नियमितपणे होत आहे. यामुळे वीजबिल थकबाकीचा प्रश्न उद्भवत नाही. योजना सक्षमपणे चालत असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेती समृद्ध झाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी