शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

Sangli: ताकारी योजनेचे रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन सुरू, १८ हजार हेक्टर लाभक्षेत्राला दिलासा 

By हणमंत पाटील | Updated: January 23, 2024 13:22 IST

प्रताप महाडिक कडेगाव : ताकारी योजनेचे यावर्षीचे तिसरे व रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन सोमवारी रात्री सुरू झाले. या योजनेच्या ...

प्रताप महाडिककडेगाव : ताकारी योजनेचे यावर्षीचे तिसरे व रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन सोमवारी रात्री सुरू झाले. या योजनेच्या १८ हजार हेक्टर लाभक्षेत्राला दिलासा मिळाला आहे. आवर्तन सुरू झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. ताकारी योजनेचे यावर्षीचे पहिले आवर्तन खरीप हंगामात दिले होते.रब्बी हंगामातील पहिले व यावर्षीचे दुसरे आवर्तन ५ नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आले होते. ते आवर्तन सुरू झाल्यानंतर अनेक वेळा तांत्रिक बिघाड व अवकाळी पावसामुळे योजना बंद ठेवावी लागली. त्यामुळे ३५ दिवस चालणारे आवर्तन तब्बल ५० दिवस चालवावे लागले. या कालावधीत कृष्णा नदीतून एक पॉइंट एक टीएमसी पाणी उचलण्यात आले. या माध्यमातून ताकारी योजनेच्या सर्व लाभक्षेत्राला पुरेसे पाणी उपलब्ध झाले.

मिरज तालुक्यातील सोनीपर्यंत १४४ किलोमीटरपर्यंतच्या सर्व लाभक्षेत्राला पाणी दिल्यानंतर ते आवर्तन बंद केले होते. ताकारी योजनेच्या वाट्याचे यावर्षीचे ३.६ टीएमसी पाणी उचलणे बाकी आहे. आता चालू आवर्तन ३० ते ३५ दिवस देण्याचे नियोजन आहे, असे ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी सांगितले.सक्षमपणे योजना आणि समृद्ध शेतीताकारी उपसा सिंचन सक्षमपणे कार्यरत असून, या योजनेचे आवर्तनही विहीत वेळेत मिळत आहे. योजनेची पाणीपट्टी आकारणी व वसुली नियमितपणे होत आहे. यामुळे वीजबिल थकबाकीचा प्रश्न उद्भवत नाही. योजना सक्षमपणे चालत असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेती समृद्ध झाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी