शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Sangli: तासगावात येरळेतून दाम्पत्य गेले वाहून, एनडीआरएफ पथकाकडून शोधमोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 16:17 IST

तासगाव : येथील तासगाव ते तुरची दरम्यान जुना सातारा रस्त्यावरील येरळा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. या प्रवाहात एक ...

तासगाव : येथील तासगाव ते तुरची दरम्यान जुना सातारा रस्त्यावरील येरळा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. या प्रवाहात एक वृद्ध जोडपे दुचाकीसह वाहून गेले. सोमवारी दुपारी ही घटना घडली. त्यानंतर ‘एनडीआरएफ’ चे पथक शोध घेण्यासाठी दाखल झाले. मात्र शोध लागला नाही. दरम्यान, वाहून गेलेल्या जोडप्याची नेमकी ओळख समजू शकलेली नाही.मागील चार दिवसांपासून तालुक्यात आणि परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे येरळा नदीचे पात्र भरून वाहत आहे. जुना सातारा रस्त्यावरील तासगाव ते तुरचीच्या दरम्यान पुलावर चार दिवसांपासून दीड ते दोन फूट उंचीने पाणी वाहत आहे. प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. मात्र काही नागरिक त्यातूनही वाट काढून पुलावरून ये-जा करत होते.

सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तासगावहून तुरचीच्या दिशेने एक पुरुष आणि महिला दुचाकीवरून जात होते. या पुलावरून जात असताना तिथे उभ्या असणाऱ्या काही तरुणांनी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे जाऊ नका, अशी विनंती केली होती. मात्र त्यातूनही हे जोडपे पाण्यातून पलीकडे जात असताना पाण्याचा प्रवाह वाढला. पुलावरून ते नदीपात्रात पडले आणि वाहून गेले.या घटनेची माहिती तासगाव पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले. त्यानंतर एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले. पथकाने सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत शोध मोहीम राबवली. मात्र, शोध लागला नाही. सायंकाळी ही शोध मोहीम थांबवण्यात आली. वाहून गेलेले जोडपे नेमके कोण आहे, याची माहिती अद्याप लागलेली नाही. तासगाव पोलिसांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Sangliसांगलीdrowningपाण्यात बुडणे