शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
6
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
7
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
8
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
9
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
10
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
11
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
13
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
14
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
15
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
16
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
17
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
18
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
19
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
20
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”

विमा जाहीर करण्यापेक्षा झेडपीचे कर्मचारी म्हणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 16:10 IST

पालकमंत्री जयंत पाटील यांनी आशांच्या कामगिरीचे कौतुकही केले. पण, गावचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आशांना शासनाच्या सेवेत घेण्याबाबत ते काहीच बोलले नाहीत, अशी खंत काहींनी व्यक्त केली.

सांगली : ह्यकोरोनाच्या भीतीमुळे घरातून कामासाठी बाहेर पडताना घरच्यांचा राग अनावर होतो. बाहेर पडल्यावर कोणी धड माहिती देत नाही. कोणत्याही घरात जाऊन माहिती गोळा करावी लागते. एवढी मरमर करून उपयोग काय?ह्ण ही व्यथा आहे आशा वर्कर्सची.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या योजनांचा भडिमार होत असताना विमा जाहीर करण्यापेक्षा आम्हाला जिल्हा परिषदेचे कर्मचारी म्हणा आणि महिना किमान चार ते पाच हजार रुपये मानधन तरी द्या, अशी अपेक्षा आशा वर्कर्स व्यक्त करत आहेत.

जिल्ह्यात १९५० आशा आणि ८० गटप्रवर्तक आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यासह अन्य राज्यांतून आलेल्या नागरिकांची संख्या शोधण्यासह त्यांच्या आरोग्याची माहिती संकलनाचे काम त्या करीत आहेत.

या माहितीआधारे शासनदरबारी वेगवेगळ्या योजनांची आखणी सुरू आहे. शासनाकडून महिन्याला पगार मिळत नाही की मानधन मिळत नाही. तरीही ५९ प्रकारच्या सेवा ग्रामीण भागामध्ये त्या देत आहेत. या सेवा दिल्यानंतर महिना फार तर दोन ते तीन हजार रुपये मिळतात.

वाळवा तालुक्यातील इस्लामपूर आणि रेठरेधरणमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्याची घटना घडल्यानंतर प्रथम तिथे आशा वर्कर्सच पोहोचल्या. तेथील आशा वर्कर्सना हातात मोजे, मास्क दिले. पालकमंत्री जयंत पाटील यांनी आशांच्या कामगिरीचे कौतुकही केले. पण, गावचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आशांना शासनाच्या सेवेत घेण्याबाबत ते काहीच बोलले नाहीत, अशी खंत काहींनी व्यक्त केली.

टॅग्स :SangliसांगलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस