शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

पानी फाउंडेशनतर्फे ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ स्पर्धा; कोणत्या पिकांसाठी स्पर्धा, कितीचे बक्षीस.. जाणून घ्या

By अशोक डोंबाळे | Updated: September 27, 2024 19:22 IST

सांगली : महाराष्ट्रातील शेतकरी गटांमार्फत शाश्वत शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून पानी फाउंडेशनतर्फे ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ स्पर्धा ...

सांगली : महाराष्ट्रातील शेतकरी गटांमार्फत शाश्वत शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून पानी फाउंडेशनतर्फे ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा ३६ पिकांसाठी असून, राज्यस्तरीय पहिले बक्षीस २५ लाख रुपयांचे आहे. सर्वोत्कृष्ट महिला गटासाठी पहिले बक्षीस पाच लाख रुपयांचे आहे.शेतीत सतत येणाऱ्या संकटांना एकट्याने नाही तर एकीने लढा देण्यासाठीचा प्रयत्न समृद्ध शेतकरी आणि समृद्ध निसर्ग यांची सांगड घालू पाहणारी एक लोकचळवळ आहे. फार्मर कप म्हणजे गटशेतीची स्पर्धा आहे. गटशेतीमध्ये किमान ११ सदस्य आणि किमान १५ एकर क्षेत्र असणारा कोणताही गट स्पर्धेत सहभागी होऊ शकतो.या स्पर्धेचा प्रमुख हेतू म्हणजे शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे आहे. मजुरी खर्चात बचत करण्यासह स्वस्तात खते आणि बियाण्याची उपलब्धता करण्याचा हेतू आहे, अशी माहिती पानी फाउंडेशनचे प्रशांत गवंडी यांनी दिली. तसेच शेतकऱ्यांनी संघटित शेती करून उत्पादकता वाढविण्यासाठी फार्मर कप स्पर्धा आहे. यात राज्यस्तरीय पहिले बक्षीस २५ लाख रुपयांचे असून, दुसरे बक्षीस १५ लाख रुपये आणि तिसरे बक्षीस १० लाख रुपयांचे असणार आहे.

असे आहे बक्षीसराज्यस्तरीय पहिले बक्षीस २५ लाखदुसरे बक्षीस १५ लाखतिसरे बक्षीस १० लाख

सर्वोत्कृष्ट महिला बचत गटाचे पहिले बक्षीस ५ लाखसर्वोत्कृष्ट महिला बचत गटाचे दुसरे बक्षीस ३ लाखसर्वोत्कृष्ट महिला बचत गटाचे तिसरे बक्षीस २ लाख

तालुकास्तरीय बक्षिसेपहिले बक्षीस ५० हजार रुपयेउत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी २५ हजार रुपये

स्पर्धेत या पिकांचा समावेशस्पर्धेत बाजरी, सोयाबीन, वाटाणा, भेंडी, टोमॅटो, धणे, तूर, गवार, रताळे, मका, कापूस, बटाटा, कांदा, कारले, कोथिंबीर, भुईमूग, नाचणी, दोडके, भात, मूग, कोबी, तोंडली, दुधी भोपळा, मिरची, वांगी, उडीद, पालक, ज्वारी, राजमा-घेवडा, फुलकोबी, ओवा, पडवळ, मेथी, भोपळा, शिमला मिरची, घोसावळी आदी पिकांचा समावेश आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी