शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: पूरस्थितीमुळे सातारा-कोल्हापूर विशेष रेल्वे धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 20:18 IST

मध्य रेल्वेकडून हिरवा कंदील : १३ ऑगस्टपर्यंत दररोज फेऱ्या.

अविनाश कोळी/सांगली, लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : नागरिक जागृती मंचने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहे. बुधवारी ७ ऑगस्टपासून १३ ऑगस्टपर्यंत सातारा-सांगली-कोल्हापूर विशेष रेल्वे गाडी दररोज धावणार आहे.

सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे २० जुलैपासून कृष्णा, वारणा, कोयना, पंचगंगा, येरळा नद्या भरून वाहत आहेत. तिन्ही जिल्ह्यातील अनेक रस्ते पुराच्या पाण्याखाली आहेत. सध्या पूर ओसरत असला तरी वाहतूक सुरळीत होण्यास काही दिवस लागणार आहेत. पुराच्या काळात सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील अनेक गावांतील एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्या. अजूनही काही मार्गावर फेऱ्या बंद आहेत.

कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात अशीच पुरस्थिती झाल्यानंतर दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाने चार संपर्क क्रांती व ईतर १० रेल्वे गाड्यांना उगारखुर्द व कुडची स्थानकांवर थांबा दिला होता. त्यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी संपर्क क्रांती गाड्या सांगली, भिलवडी, कराड व किर्लोस्करवाडी स्टेशनवर थांबवाव्या तसेच किर्लोस्करवाडी व भिलवडी येथे आणखी दहा गाड्यांना थांबा देण्याची विनंती सांगली जिल्हा नागरीक जागृती मंचने केली होती. पण मध्य रेल्वेने काहीही निर्णय घेतला नाही. त्यामुळे मंचने पंतप्रधानांकडे ऑनलाईन तक्रार केली. त्यावर रेल्वे विभागाने सातारा-सांगली-कोल्हापूर पूर विषेश रेल्वे गाडी सुरू केल्याचे सांगितले.

अशी धावणार सातारा-कोल्हापूर गाडी (क्र. ०१४१२)

सातारा दुपारी २:२०, कोरेगाव २.३३, रहीमतपूर २.४३, तारगाव २.५३, मसूर ३.०५, शिरवडे ३.१५, कराड ३.२५, शेणोली ३.३८, भवानीनगर ३.४५, ताकारी ३.५०, किर्लोस्करवाडी ४, भिलवडी ४.१५, नांद्रे ४.२३, सांगली ४.३८, विश्रामबाग ४.४३, मिरज सायं. ५.२०, जयसिंगपूर ५.३५, हातकणंगले ५.५०, रुकडी ६, वळिवडे ६.०६, कोल्हापूर सायंकाळी ६.३५चौकट

अशी धावणार कोल्हापूर-सातारा गाडी (क्र. ०१४११)कोल्हापूर सकाळी ८.४०, वळीवडे, ८.४८, रुकडी ८.५५, हातकणंगले ९.०५, जयसिंगपूर ९.२०, मिरज सकाळी ९.४५, विश्रामबाग ९.५३, सांगली १०, नांद्रे १०.१५, भिलवडी १०.२५, किर्लोस्करवाडी १०.४०, ताकारी १०.५०, भवानीनगर १०.५५, शेणोली ११.०५, कराड ११.२५, शिरवडे ११.३५, मसूर ११.५०, तारगाव दुपारी १२, रहीमतपूर, १२.१०, कोरेगाव १२.२५, सातारा १,३५

सांगली कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी या विशेष रेल्वे गाडीचा लाभ घ्यावा तसेच सांगली रेल्वे स्टेशनवर या गाडीची येण्याची वेळ सोयीस्कर असल्याने सांगली स्टेशन जवळील मार्केट यार्डमध्ये येणाऱ्या लोकांना मोठा लाभ होणार आहे. सर्व थांबे दिल्याने विश्रामबागपर्यंत येणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांचीही सोय होणार आहे

- सतीश साखळकर, अध्यक्ष नागरिक जागृती मंच

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूरrailwayरेल्वे