शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

सरपंचांच्या फायलींना जिद्दीचा सुगंध : सांगलीत उद्या सकाळी रंगणार सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:25 IST

सांगली : ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातील गावांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. जिल्ह्याच्या कानाकोपºयातील वाड्या-वस्त्यांपासून मोठ्या गावांतील सरपंचांनी प्रस्तावाचा अक्षरश: पाऊस पाडला. अत्यंत कमी कालावधित सव्वातीनशे प्रस्ताव ‘लोकमत’कडे प्राप्त झाले. हा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ सोहळा शुक्रवार, दि. २९ रोजी सांगलीत होणार आहे.या ३२५ प्रस्तावांमधून १३ विजेते निवडण्यासाठी निवड समिती ...

ठळक मुद्देमाजी अतिरिक्त मुख्य सचिव नानासाहेब पाटील, आमदार शिवाजीराव नाईक यांची उपस्थितीआरोग्यदायी गावासाठी केलेले प्रयोग, लसीकरण, साथीच्या रोगांबाबत व्यवस्थापन,

सांगली : ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातील गावांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. जिल्ह्याच्या कानाकोपºयातील वाड्या-वस्त्यांपासून मोठ्या गावांतील सरपंचांनी प्रस्तावाचा अक्षरश: पाऊस पाडला. अत्यंत कमी कालावधित सव्वातीनशे प्रस्ताव ‘लोकमत’कडे प्राप्त झाले. हा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ सोहळा शुक्रवार, दि. २९ रोजी सांगलीत होणार आहे.

या ३२५ प्रस्तावांमधून १३ विजेते निवडण्यासाठी निवड समिती कार्यरत झाली आहे. जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी महालिंग जाधव, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी एन. बी. पाटील, जिल्हा परिषदेच्या महिला-बालकल्याण विभागाच्या माजी सभापती छायाताई खरमाटे, अर्थशास्त्राचे सेवानिवृत्त प्राध्यापक सुभाष दगडे, राज्यशास्त्राचे प्राध्यापक विजय पाटील, शिवाजी विद्यापीठाच्या राष्टÑीय सेवा योजनेचे माजी कार्यक्रम समन्वयक प्रा. संजय ठिगळे यांची निवड समिती सरपंचांनी पाठविलेल्या प्रस्तावांचा बारकाईने अभ्यास करीत आहे.

त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेतील ग्रामपंचायत ही पहिली पायरी असते. गावाचा शाश्वत विकास व्हावा, यासाठी अनेक सुहृदयी स्थानिक राजकारणी अत्यंत कौशल्याने धोरणे ठरवत असतात. अनेक गावे स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करत आहेत. या गावांचा गौरव व्हावा आणि त्यातून इतर गावांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने ‘लोकमत’ने ही आगळी-वेगळी स्पर्धा आयोजित केली आहे.

जलव्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण संवर्धन, प्रशासन, रोजगारनिर्मिती, कृषी तंत्रज्ञान, उदयोन्मुख नेतृत्व, सरपंच आॅफ द इयर या वेगवेगळ्या निकषान्वये प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत तब्बल ३२५ प्रस्ताव ‘लोकमत’ कार्यालयाकडे प्राप्त झाले.

जलव्यवस्थापनात गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी केलेली व्यवस्था, जलसंधारण, पाणी बचत, पाणीपट्टी वसुली पद्धत, सांडपाणी व्यवस्थापन, वीज व्यवस्थापनात गावातील दिवाबत्तीच्या सोयी, वीज बचत, अपारंपरिक ऊर्जेचा वापर, वीजनिर्मितीसाठी केलेले नावीन्यपूर्ण प्रयोग, शैक्षणिक सुविधेत गावातील शैक्षणिक सुविधा, शालेय व्यवस्थापन, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयोग, स्वच्छतेबाबतीत प्रथमदर्शनी दिसणारे गावाचे रूप, कचरा संकलन, मलनि:स्सारण, हागणदारीमुक्ती, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्याच्या सुविधा, कुपोषणाचे प्रमाण, आरोग्यदायी गावासाठी केलेले प्रयोग, लसीकरण, साथीच्या रोगांबाबत व्यवस्थापन, पायाभूत सेवांमध्ये रस्ते, वीज, पाणी, दळणवळण, वाचनालय, मनोरंजन केंद्र, बाजार या सुविधांची निर्मिती, वीज व पाणी बिल भरण्याची सोय, ग्रामरक्षणमध्ये तंटामुक्ती, अवैध धंद्यांना बंदी, महिला, युवती, बालसुरक्षेविषयी केलेले प्रयोग, ग्रामरक्षक दलाची स्थापना, पर्यावरण संवर्धनात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, कुºहाडबंदी, चराईबंदी, जल व वायू प्रदूषण, प्लॅस्टिकबंदी, गौण खनिजाचे रक्षण, प्रशासनामध्ये पंचायतीकडून दिल्या जात असलेल्या आॅनलाईन सेवा, विकास कामांत लोकसहभाग, तर रोजगार निर्मितीमध्ये ग्रामपातळीवर रोजगार निर्मितीसाठी केलेले प्रयत्न, बचत गटांच्या माध्यमातून उभारलेले प्रकल्प, शेती कंपन्या, सामूहिक शेती, कृषी तंत्रज्ञानामध्ये प्रक्रियेत सुधारणा, कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा उपयोग, उदयोन्मुख नेतृत्वामध्ये सरपंचांनी सर्वच कामांत दिलेले योगदान तसेच सरपंच आॅफ द इयरमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली असेल, अशा स्वरुपातील माहितीपूर्ण प्रस्ताव मागविण्यात आले.या इत्यंभूत माहितीसह प्रस्ताव दाखल झाले. गावोगावच्या सरपंचांनी केलेले काम एखाद्या डॉक्युमेंटरीच्या स्वरुपात मांडले.असा होणार सोहळा...‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ प्रदान सोहळा शुक्रवार, दि. २९ डिसेंबररोजी सकाळी १० वाजता सांगलीतील माधवनगर रस्त्यावरील आरटीओ कार्यालयाशेजारी असणाºया डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या हॉलमध्ये होणार आहे. या सोहळ्यास महाराष्टÑाचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव नानासाहेब पाटील आणि पंचायत राज समितीचे माजी अध्यक्ष आ. शिवाजीराव नाईक यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तंटारहित विकासाला प्राधान्यजिल्ह्यातील काही गावांनी तंटामुक्तीच्याबाबतीत चांगले काम केले आहे. गावातील वाद गावातच मिटवून गुण्यागोविंदाने राहण्यासाठी आणि विकास साधण्यासाठी या गावांनी वेगळा पायंडा पाडलेला आहे, हे या प्रस्तावांतून प्रकर्षाने पुढे येताना दिसते.आमची शाळा राखू गुणवत्तापटसंख्येअभावी ओस पडणाºया शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र सांगली जिल्ह्यात वेगळीच परिस्थिती पाहायला मिळते. शाळेची गुणवत्ता वाढावी यासाठी ग्रामशिक्षण समितीच्या माध्यमातून पायाभूत सुविधा पुरविल्या गेल्या आहेत.‘लोकमत सरपंच अवॉर्ड’साठी आलेल्या प्रस्तावांचा बारीक अभ्यास करण्यात दंग असलेली निवड समिती. डावीकडून प्रा. संजय ठिगळे, एन. बी. पाटील, प्रा. सुभाष दगडे, प्रा. विजय पाटील, महालिंग जाधव, छायाताई खरमाटे.