शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

सरस्वतीचा दास इलाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:24 IST

कवितेचे हे नवीन दालन, नवीन एक प्रवास सरस्वतीचा दास इलाही सरस्वतीचा दास कधी दोहे, कधी गझल, कधी कविता, तर ...

कवितेचे हे नवीन दालन, नवीन एक प्रवास

सरस्वतीचा दास इलाही सरस्वतीचा दास

कधी दोहे, कधी गझल, कधी कविता, तर कधी मुक्तकांमधून भावनांची वादळे प्रकट करीत रसिकांच्या मनातील भाव-भावनांच्या वादळाशी समरस होण्याचा, त्यांच्या हृदयात वास करण्याचा प्रयत्न गझलकार इलाही जमादार यांनी आयुष्यभर केला. पुस्तकांवर, त्यांच्या गझलांच्या सादरीकरणावर रसिकांकडून प्रकटणारे वेड्यासारखे प्रेम कधीच मावळले नाही. किंबहुना हे वेड भावल्यानेच इलाहींच्या हातून गझलांचा व काव्यप्रकारांचा आविष्कार होत राहिला. काव्यझऱ्यातून प्रकटल्यानंतर सलग ५६ वर्षे अखंडितपणे हा निखळ इलाही प्रवाह वाहता राहिला. त्यांच्या प्रत्येक काव्यजलातून रसिकांची तृषा शांत व्हायची. चार तपांहून अधिक काळ सरस्वतीचा दास बनून २० हून अधिक पुस्तकांमधून त्यांनी गझलविश्वाला समृद्ध केले. इलाही जमादारांनी वेदनांच्या वादळांना कवेत घेत, शब्दांमधून रसिकांशी संवाद साधत मन मोकळे करण्याचा प्रयत्न केला. नकारात्मकतेला सकारात्मक निर्मितीच्या वाटेवरून नेताना त्यांनी एक नवा आदर्श पाठ दिला.

सारी भणंग स्वप्ने, माझ्याच मालकीची

जाळीत आसवांना, प्रत्येक रात गेली

इलाही जमादारांनी आयुष्याच्या वाटेवर अनेक दु:खे भोगली; पण त्या प्रांतात त्यांनी कोणालाही प्रवेश दिला नाही. गझलांमधून त्यांनी अप्रत्यक्ष संवाद साधला. त्यामुळेच मीरा त्यांना त्यांची समदु:खी वाटली. मीरेचा विराणा अनुभवत त्यांनी ‘मला उमगलेली मीरा’ हे पुस्तक लिहिले. मीरेसह महाभारत हा खंडही त्यांना भावला. महाभारतातील अनेक पात्रे त्यांच्या गझलांमधून सतत डोकावत राहिली. महाभारतावर काव्यखंड करण्याचा त्यांचा मानसही मौन बाळगून राहिला.

इलाही जमादार यांनी अनेक नवे गझलप्रकार उर्दू व अन्य भाषांमधून मराठीत आणले. हजल, द्विभाषिक गझल, त्रिवार काफिया गझल, मुस्तजाद गझल, सेमिसरी गझल, जुलकाफिया गझल, मुक्ताबंद गझल, तखल्लूस रदीफ असलेली म्हणजेच कवीचे नाव असलेली गझल, सवतीकाफिया गझल अशा विविध प्रकारांना त्यांनी आपल्या लेखणीतून मराठीत उतरविले. मराठी गझलेतील मक्ता लिहिण्याची मक्तेदारीही त्यांनी मिळवली. दोन-दोन ओळींच्या काव्यपंक्तींतून इतका मोठा भावार्थ प्रकट करणारा हा कवी कुठे आहे, अशी विचारणा प्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम्‌ यांनी केली होती. इलाहींच्या गझलांना एस.पीं.च्या आवाजाची जादू ‘निशिगंध’ या अल्बममधून लाभली. मात्र इलाहींच्या जादूई लिखाणाचा असर एसपींवर झाला. इलाहींनाही त्यांना भेटण्याची इच्छा होती. मात्र ही भेट कधीच झाली नाही. हे दोन्ही तारे निखळले.

ज्या मराठीने एवढे प्रेम दिले, तिची आयुष्यभर सेवा करण्याचा संकल्प इलाहींनी काही पुस्तकांमधून मांडला व तो पूर्णत्वास नेला. रसिकांच्या हृदयअवकाशात त्यांनी शिंपडलेले शब्दांचे चांदणे त्यामुळेच दीर्घकाळ चमकत राहील. मराठी रसिकांना आनंदसागरात सतत न्हाऊ घालणाऱ्या इलाहींच्या आयुष्यातील वादळे अखेरपर्यंत घाेंघावत राहिली. म्हणूनच पहिल्या पुस्तकातील त्यांच्या छायाचित्राखालील शेेर त्यांच्या वेदना प्रकट करून जातो.

‘मेरी उदास रुह को, जिसकी तलाश थी

वो चीज ही अजीब थी, वो मेरी लाश थी’