शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सांगलीत डाएटच्या कर्मचाऱ्यांचा वेतनासाठी आत्मदहनाचा इशारा

By संतोष भिसे | Updated: July 31, 2023 19:29 IST

तीन वर्षांपासून नियमित वेतन नाही, शासनाकडून जबाबदारीची टाळाटाळ

सांगली : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण (डाएट) संस्थेतील कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. सरकारी दप्तरात राजपत्रित अधिकारी म्हणून नोंद असतानाही त्यांना वेतनासाठी झगडावे लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी १५ ऑगस्टनंतर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून डाएट कर्मचाऱ्यांचा वेतनासाठी संघर्ष सुरु आहे. या काळात त्यांचे वेतन कधीही नियमितपणे झालेले नाही. कधी तीन महिन्यांनी, तर कधी पाच महिन्यांनी वेतन मिळाले आहे. शालेय शिक्षण विभागाचे कर्मचारी असूनही त्यांच्या वेतनाची जबाबदारी मात्र या विभागाने स्वीकारलेली नाही. केंद्र सरकारने सन २०१२ मध्ये डाएट विभाग सुरु केला. कालांतराने तो राज्य सरकारकडे सोपवला. राज्य शासनाने कर्मचारी स्वीकारताना त्यांच्या वेतनाची जबाबदारी मात्र लोंबकळत ठेवली. कर्मचारी आक्रमक झाल्यानंतर दोन-तीन महिन्यांनी केव्हातरी वेतन काढले जाते.

सध्या मे महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी १५ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. पहिल्या टप्प्यात काळ्या फिती लावून काम केले जाईल. नंतर काम बंद आंदोलन व शेवटी आत्मदहन असे आंदोलनाचे पुढील टप्पे आहेत. 

वर्षाला ७५ कोटींचा खर्च

वेतनासाठी अंदाजपत्रक तरतूद नसेल, तर प्रशासनात आमचे समायोजन करावे अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. सध्या शिक्षण विभागात अनेक पदे रिक्त  आहेत. डाएटमधून ती भरणे शक्य आहे. यामुळे वेतनाचा प्रश्नही निकाली निघणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वर्षाकाठी अवघे ७५ कोटी रुपये खर्च होतात, तरीही शासन जबाबदारी टाळत असल्याचा संघटनेचा आरोप आहे.

राज्यभरात डाएटच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या दीड हजार आहे. शैक्षणिक गुणवत्तावाढीची महत्वाची जबाबदारी आमच्याकडे आहे. शासन कामासाठी आमच्या पाठीवर शाबासकीची थाप मारते, वेतन देताना मात्र पाठ फिरवते अशी अवस्था आहे. याच्या निषेधार्थ आम्ही आंदोलनाच्या पावित्र्यात आहोत.- डॉ. राजेंद्र भोई, विभागीय उपाध्यक्ष, राजपत्रित अधिकारी संघटना.

टॅग्स :Sangliसांगलीagitationआंदोलन