शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
2
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
3
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
4
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
5
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
6
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
7
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
8
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
9
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
10
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
11
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
12
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
13
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
14
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
15
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
16
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
17
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
18
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
19
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
20
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?

सांगलीच्या मातीनं सातासमुद्रापार पोहोचवलं

By admin | Updated: January 11, 2016 00:44 IST

स्मृती मानधना : लोकमत’शी साधलेला हा दिलखुलास संवाद...

धुवॉँधार फलंदाजी करून सांगली जिल्ह्याचे नाव राज्यभर करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाची अव्वल खेळाडू आणि महाराष्ट्राची आघाडीची फलंदाज स्मृती श्रीनिवास मानधना हिची आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. ती मूळची सांगलीशेजारच्या माधवनगरची. अष्टपैलू खेळीने स्मृतीने अनेक सामने गाजवले आहेत. धावांचे डोंगर रचले. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारी ती सांगलीची एकमेव महिला क्रिकेटपटू आहे. क्रीडानगरी सांगलीचे नाव सातासमुद्रापार नेताना तिचा प्रवास कसा झाला, भारतीय क्रिकेट संघातील तिचे अनुभव, मुलींना क्रिकेटमध्ये उपलब्ध असलेल्या संधी, मुलींचा क्रिकेटमधील सहभाग यांसह विविध विषयांवर स्मृती मानधना हिने ‘लोकमत’शी साधलेला हा दिलखुलास संवाद...आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तुझी तयारी कशी सुरू आहे?- आॅस्ट्रेलिया दौरा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. यापूर्वी मी इंग्लंड व बांगलादेश इथं भारतीय महिला क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील निवड ही माझ्यासाठी परदेशात क्रिकेट खेळण्याची हॅटट्रीक ठरली आहे. आॅस्ट्रेलियातील वन-डे आणि ट्वेंटी-२० या दोन्ही सामन्यात मी खेळणार आहे. २६ जानेवारीपासून या स्पर्धा सुरू होणार आहेत. भारतासाठी सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. त्यासाठी रोज न चुकता सराव सुरू आहे. नवीन कौशल्यं आत्मसात करण्याचा प्रयत्नही सुरू आहे. आता जबाबदारी वाढली आहे. मुलींना क्रिकेटमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध आहेत का?- हो खूप चांगल्या संधी आहेत. मुलींनी क्रिकेटमध्ये यावं, खेळावं. अनेक खासगी कंपन्यांचं सहकार्य लाभत आहे. अद्ययावत क्रीडा साहित्य मिळते. बीसीसीआयची मदत होते. भारतातील सर्वोत्तम खेळाडूंशी बीसीसीआय करार करते. माझ्याशी बीसीसीआयनं दहा लाखाचा करार केला आहे. हा ग्लॅमरस खेळ आहे. त्यामुळं राज्य, राष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे थेट टीव्हीवर प्रक्षेपण होतं. मानसन्मान मिळतो. प्रसिध्दी मिळते. उत्तम कामगिरी केलेल्या मुलींना राज्य, केंद्र शासनासह एमसीए व बीसीसीआयचे पुरस्कारही मिळतात. फक्त मुलींनी धाडसानं खेळायची गरज आहे. क्रिकेटमध्ये करिअरच्या सुवर्णसंधी आहेत. मुलींनी क्रिकेट खेळावं. मुलींचा सहभाग कसा आहे?- बरा आहे. मुलींच्या खेळातील सहभागाबाबत समाजात जागृतीची गरज आहे. पालकांनी मुलींना खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. शाळा, महाविद्यालयांतूनही मुलींना सहकार्य मिळालं पाहिजे. देशातील विविध राज्यांचे महिला क्रिकेट संघ आहेत. हळूहळू मुलींचा क्रिकेटमधील सहभाग वाढतोय. यात आलेल्या मुलींनी चिकाटीनं सराव करावा. या खेळातील तुझी पुढची वाटचाल काय असेल?- क्रिकेटनं आजवर मला खूप काही दिलं आहे. एमसीए आणि बीसीसीआयचा ‘वुमेन क्रिकेटर आॅफ द इयर’ पुरस्कारही मिळाला. सध्या सांगलीतील चिंतामणराव व्यापार महाविद्यालयात बी. कॉम.च्या प्रथम वर्षात शिकत आहे. अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. सध्या सरावावर लक्ष केंद्रित केलं आहे. सर्वोत्तम फलंदाजी कशी करता येईल, फलंदाजीतील नवनवीन कौशल्यं काय आहेत याची माहिती घेऊन त्याचा सराव करत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघात निवड होण्याची ही सहावी वेळ आहे. दमदार खेळ करून प्रत्येक वेळी आम्ही विजयश्री खेचून आणली आहे. आॅस्ट्रेलिया दौऱ्यात कस लागणार आहे. भारताचा महिला संघही अनुभवी आहे. मला विश्वास आहे की, आम्ही आॅस्ट्रेलियामध्ये भारताचा तिरंगा नक्की फडकवू. सांगली आणि क्रिकेटविषयी तू काय सांगशील?- सांगलीच्या मातीनंच मला घडवलं आणि सातासमुद्रापार पोहोचवलं. वडील आणि भावाच्या प्रेरणेनं मी क्रिकेट खेळू लागले. छत्रपती शिवाजी स्टेडियम व चिंतामणराव महाविद्यालयाचं मैदान ही माझी कर्मभूमी. सांगलीकरांनी प्रेम दिलं. माझ्या यश, निवडीबद्दल माझे ठिकठिकाणी सत्कारही झाले. सांगलीकरांची अशी आपुलकीची थाप माझी ‘एनर्जी’ ठरत गेली. अकराव्या वर्षी मी क्रिकेटची बॅट हातात धरली. सांगलीतील अनंत तांबवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत गेले. खेळत गेले. जिद्दीनं क्रिकेटमधील कौशल्यं शिकली. बरे-वाईट अनुभव आले. त्यातून जग कळालं. मनाची चिकाटी आणि आत्मविश्वास कधीच ढळू दिला नाही. जिल्हास्तरीय ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांपर्यंतच्या प्रवासानं बरंच शिकवलं. प्रत्येक स्पर्धेला मी एक आव्हान म्हणूनच स्वीकारलं. सरावातील सातत्यामुळं यश मिळत गेलं. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं प्रत्येक वेळी सहकार्य लाभलं. बीसीसीआयनंही माझ्यातील गुणवत्ता ओळखली आणि सकारात्मकता दाखवत मदत केली. भारतीय महिला संघातून खेळायचा अनुभव चांगला आहे. बडोदा इथं २०१२ मध्ये झालेल्या सामन्यात १९ वर्षाखालील गटात मी नाबाद २२४ धावांचा विक्रम केला होता. दिवसभर डोक्यात क्रिकेटच असतं. क्रिकेटसाठी अजून बरंच करायचं आहे. आदित्यराज घोरपडे