शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

सांगली शेरीनाल्याचे पाणी पुन्हा कृष्णा नदीत गटार फुटली : काँग्रेसकडून कारभाराचा पंचनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:58 IST

सांगलीकरांच्या पाचवीला पूजलेल्या शेरीनाल्याचे सांडपाणी पुन्हा एकदा कृष्णा नदीत मिसळू लागले आहे. अमरधाम स्मशानभूमीजवळ शेरीनाल्याचे पाणी वाहून नेणारी गटार फुटल्याने कृष्णेच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. महापालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर, संजय चव्हाण, नितीन चव्हाण यांनी

सांगली : सांगलीकरांच्या पाचवीला पूजलेल्या शेरीनाल्याचे सांडपाणी पुन्हा एकदा कृष्णा नदीत मिसळू लागले आहे. अमरधाम स्मशानभूमीजवळ शेरीनाल्याचे पाणी वाहून नेणारी गटार फुटल्याने कृष्णेच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. महापालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर, संजय चव्हाण, नितीन चव्हाण यांनी गुरुवारी शेरीनाल्याची पाहणी करून प्रशासनाच्या कारभाराचा पंचनामा केला.

शेरीनाल्यातील सांडपाणी धुळगाावमधील शेतीला देण्याची योजना राबविण्यात आली. पण ही योजना आता फोल ठरली आहे. कृष्णा नदीकाठी बंधारा बांधून तेथून तीन मोटारीद्वारे सांडपाणी उचलण्यात येत होते; पण गेल्या वर्षभरापासून एक मोटार नादुरुस्त आहे. मोटार दुरुस्तीचा मुहूर्त प्रशासनाला लागलेला नाही. त्यात काही दिवसांपूर्वी दुसरी मोटार बंद पडली. एकाच मोटारीद्वारे सांडपाण्याचा उपसा सुरू होता. आता मोटारी दुरूस्त करून पुन्हा शेरीनाल्याचे सांडपाणी उचलून सांगली बंधाऱ्यापुढे सोडण्यात येत आहे.

हे सांडपाणी वाहून नेण्यासाठी विष्णू घाटापर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली आहे. तेथून मोठी गटार काढून त्यात पाणी सोडले जाते. हीच गटार फुटली असून, शेरीनाल्याचे पाणी थेट नदीपात्रात मिसळत आहे. त्यामुळे आयर्विन पूल ते विष्णू घाट, अमरधाम घाटमार्गे संपूर्ण सांडपाणी नदीत फेसाळून मिसळत होते. त्यात नदीत वाहते पाणी नाही. बंधाºयात पाणी अडविले असून, त्याच पाण्यात सांडपाणी मिसळत असल्याने नदी प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे.

महापालिका प्रशासनाकडून शेरीनाल्याच्या पलीकडेच कर्नाळ रस्त्यावरील जॅकवेलपासून पाण्याचा उपसा केला जातो. त्यामुळे शहराला दूषित पाणी मिळत नसल्याचा दावा केला जातो. परंतु गुरुवारी संपूर्ण सांडपाणी परतीच्यामार्गे जॅकवेलपर्यंत पसरल्याचे दिसून आले. त्यामुळे पुन्हा सांगलीकरांना हेच गटारगंगेचे पाणी पाजले जात असल्याचा आरोप उत्तम साखळकर यांनी केला.

सतीश साखळकर म्हणाले, एकीकडे शेरीनाला थेट कृष्णेत मिसळून प्रदूषण वाढत आहे. दुसरीकडे स्टेशन चौकात ड्रेनेज तुंबून शहरात गटारगंगा निर्माण होऊ लागली आहे. तरीही महापालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा डांगोरा पिटला जात आहे. ही गटारगंगा म्हणजे महापालिकेच्या कारभाराचा आरसा आहे. त्याबाबत प्रशासनाला गांभीर्य नाही. ड्रेनेज अभियंता पंधरा दिवस रजा टाकून गायब आहेत. सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या नेत्यांनाही याचे गांभीर्य दिसून येत नाही.अधिकाºयांना सांडपाणी पाजू : साखळकरविरोधी पक्षनेते उत्तम साखळकर म्हणाले की, शेरीनाल्याचे पंप सुरू करून लाखो रुपयांचा विजेचा बोजा तिजोरीवर टाकला जात आहे. शहरात दूषित पाणीपुरवठा होऊ लागला आहे. परंतु याकडे सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी, महापालिकेच्या अधिकाºयांचे जराही लक्ष नाही. मिरजेप्रमाणे गॅस्ट्रोची साथ पसरून नागरिकांचे बळी गेल्यावर यंत्रणा जागी होणार आहे. येत्या दोन दिवसांत महापालिका प्रशासनाने उपाययोजना केल्या नाहीत तर, हेच सांडपाणी अधिकाºयांना पाजणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

अमरधाम स्मशानभूमीजवळ शेरीनाल्याचे पाणी वाहून नेणारी गटार फुटल्याने कृष्णेच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी मिसळत आहे. त्यामुळे नदी परिसरात दुर्गंधी पसरली असून प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीriverनदीpollutionप्रदूषण